शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

आता पाणी नाल्यात नाही... मुखात!

By admin | Updated: March 31, 2016 00:11 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश फलदायी : जिल्ह्यातील पोहण्याचे तलाव उद्यापासून बंद

सातारा : संपूर्ण राज्यासह सातारा जिल्ह्यातही आवर्षणग्रस्त स्थिती निर्माण झाली असल्याने पाणी वापरावर निर्बंध आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जलतरण तलावातील पाणी पोहल्यानंतर अशुद्ध होते. पर्यायाने हेच पाणी नाल्यात सोडून द्यावे लागते. आता हेच पाणी दुष्काळग्रस्तांच्या मुखात जाणार आहे.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी २२ मार्च रोजी जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्याधिकारी, तहसीलदार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा क्रीडाधिकारी यांना जलतरण तलाव बंद ठेवण्याचे आदेश काढले. या आदेशानुसार सरकारी मालकीसह खासगी जलतरण तलाव १ एप्रिलपासून बंद ठेवण्यात येणार आहेत. ही कार्यवाही काटेकोरपणे अमलात आणण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. २२ मार्चनंतर होळी, धुळवड व रंगपंचमी असे सण सलगपणे होते. या सणांमध्ये पाण्याचा अनिर्बंध वापर केला जातो. सध्याची भीषण पाणीटंचाई लक्षात घेता, पाणी वाया घालविणे धोक्याचे बनले आहे. पाऊसच कमी प्रमाणात झाल्याने तलावांतील पाणी आटलेले आहे. जलयुक्त शिवार योजनेमध्ये तलावांची कामे झाली असली तरी त्यात पाणी साठायला आॅगस्ट महिना उजडावा लागणार आहे. एप्रिल, मे महिन्यात एखादा जोरदार वळवाचा पाऊस झाला तर हे तलाव भरतील. मात्र, ही बाब अद्याप तरी स्वप्नवत अशीच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचे महत्त्व लक्षात येण्यासारखे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जून महिन्यात जोरदार पाऊस होईल, याचा अंदाज घेऊनच आदेश काढले आहेत. (प्रतिनिधी)६ कोटी लिटर पाणी वाचेलसातारा जिल्ह्यामध्ये ११ तालुके आहेत. या तालुक्यांत प्रत्येकी सरासरी तीन जलतरण तलाव आहेत. यांची संख्या होते ३३. एका जलतरण तलावासाठी साधारणपणे २२ लाख लिटर इतके पाणी रोज लागते. जलतरण तलाव बंद ठेवल्यास अंदाजे ६ कोटी ६ लाख लिटर पाणी बचत होऊ शकते. ‘लोकमत’च्या आवाहनाला यश‘लोकमत’ने कोरडी रंगपंचमी खेळण्याचे आवाहन केले होते. याला प्रत्येक ठिकाणी यश आले. बहुसंख्य तरुण मंडळांनी पुढाकार घेऊन कोरडी रंगपंचमी खेळली. जलतरण तलाव बंद ठेवल्यास जलतरणप्रेमींची थोडी गैरसोय होणार असली तरी पावसाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांचा विचार करणे आवश्यक ठरत आहे.. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी पाणी बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी आम्हाला पत्र दिले होते. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जलतरण तलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या तलावांसाठी लागणारे पाणी लोकांना पिण्यासाठी पुरविले जाणार आहे. राज्य शासनाच्या जलजागृती सप्ताह योजनेचाच हा निर्णय एक भाग आहे. या आदेशाचा परिणाम थोड्याच दिवसांत पुढे दिसून येईल.- अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी