शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

हरळीत साकारणार आता दुसरे हिवरे बाजार !

By admin | Updated: June 23, 2016 01:02 IST

ग्रामस्थ सज्ज : ‘आमचा गाव आमचा विकास’ योजनेअंतर्गत गावाचा कायापालट करण्याचा ध्यास

खंडाळा : जलसंधारण, पाणलोट विकास, वृक्षारोपण वनसंवर्धन, नाला बांध, ग्रामस्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा निर्मूलन यासह विविध उपक्रम हाती घेऊन गावाचा कायापालट करण्याचा ध्यास हरळी (ता. खंडाळा) येथील तरुणाईसह ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे नव्या प्रकल्पासह हरळीत दुसरे हिवरे बाजार साकारण्यासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. ‘आमचा गाव आमचा विकास’ या योजनेअंतर्गत सातारा जिल्हा परिषद व खंडाळा पंचायत समितीच्या वतीने ग्रामविकास मंत्रालयाच्या सूचनेनुसार हरळीत ग्रामस्थ व अधिकाऱ्यांची तीन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये पहिल्या दिवशी मशालफेरी काढून गावात होणाऱ्या बदलात आपणही सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले. त्यानुसार पुढील तीन दिवस गावच्या प्रमुखांसह तरुण वर्ग या कामासाठी पुढे सरसावला. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगाच्या ग्रामविकास आराखडा, गाव सूक्ष्म नियोजन, गावच्या शिवारासह नकाशा तयार करण्यात आला आहे. चर्चासत्रे आणि लक्ष्य गट चर्चेतून गावात करावयाचा बदल कसा साकारता येईल, याचा आराखडा बांधण्यात आला. यासाठी या योजनेचे तज्ज्ञ मार्गदर्शक संदीप ननावरे यांनी सविस्तर माहिती दिली.गावातील प्राथमिक शाळा, अंगणवाडी सुधारणा, आरोग्य शिक्षण, गावातील प्रमुख रस्ते, स्वच्छता, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, सांडपाणी निचरा, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण योजना राबविण्यासाठी कृतिसत्र घेण्यात आले. गावच्या शिवारातील पाणी गावातच अडविण्यासाठी लोकसहभागातून दोन बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित क्षेत्रातही पाणी साठवणीसाठी योजना सुरू केली जात आहे. हरळी गावाभोवती असणाऱ्या डोंगर उतारावर आडवे चर घेऊन त्यामध्ये वृक्षारोपण करण्याची मोहीम तरुणांनी हाती घेतली आहे. बीजारोपण आणि रोपलागवड मोहिमेसाठी सामाजिक वनीकरण विभागाचे सहकार्य मिळणार आहे. या कार्यशाळेसाठी गटविकास अधिकारी दीपा बापट, विस्ताराधिकारी पवेकर, वनक्षेत्र अधिकारी शिंदे, सरपंच अवंतिका जावळे, उपसरपंच विजय शिंदे, नंदा निकम, कृष्णा बरकडे, अर्चना शिंदे, पूनम बरकडे, आबासो बरकडे, ग्रामसेवक सुनील धायगुडे, संतोष बरकडे, कांतिलाल निकम, राहुल निकम, मोहन जावळे, चंद्रकांत शेलार, वसंत शेलार, संदीप ननावरे, संतोष देशमुख यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी) गावाभोवती जैविक कुंपणया कार्यशाळेदरम्यान तज्ज्ञ मार्गदर्शकांसह ग्रामस्थांनी शिवारफेरी केली. यामध्ये गावच्या शिवारात असणाऱ्या वृक्षसंपदेचा अभ्यास करण्यात आला. गावातील शेतीला वन्यप्राण्यांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी उपलब्ध वनस्पतींचाच वापर करून जैविक कुंपण करण्याची योजना आहे. याशिवाय याच वनराईत उपलब्ध फळांपासून प्रक्रिया उद्योग महिला बचत गटांच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत.हरळी हे गाव छोटीशी लोकवस्ती असणारे आहे. भौगोलिक परिस्थितीचा फायदा गावाला होण्यासाठी काही कामे होणे गरजेचे आहे. तरुणांच्या सहभागातून हे सहजशक्य आहे. गावच्या विकासाला याची मदतच होईल.-विजय शिंदे, उपसरपंच हरळी