शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

हरळीत साकारणार आता दुसरे हिवरे बाजार !

By admin | Updated: June 23, 2016 01:02 IST

ग्रामस्थ सज्ज : ‘आमचा गाव आमचा विकास’ योजनेअंतर्गत गावाचा कायापालट करण्याचा ध्यास

खंडाळा : जलसंधारण, पाणलोट विकास, वृक्षारोपण वनसंवर्धन, नाला बांध, ग्रामस्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा निर्मूलन यासह विविध उपक्रम हाती घेऊन गावाचा कायापालट करण्याचा ध्यास हरळी (ता. खंडाळा) येथील तरुणाईसह ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे नव्या प्रकल्पासह हरळीत दुसरे हिवरे बाजार साकारण्यासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. ‘आमचा गाव आमचा विकास’ या योजनेअंतर्गत सातारा जिल्हा परिषद व खंडाळा पंचायत समितीच्या वतीने ग्रामविकास मंत्रालयाच्या सूचनेनुसार हरळीत ग्रामस्थ व अधिकाऱ्यांची तीन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये पहिल्या दिवशी मशालफेरी काढून गावात होणाऱ्या बदलात आपणही सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले. त्यानुसार पुढील तीन दिवस गावच्या प्रमुखांसह तरुण वर्ग या कामासाठी पुढे सरसावला. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगाच्या ग्रामविकास आराखडा, गाव सूक्ष्म नियोजन, गावच्या शिवारासह नकाशा तयार करण्यात आला आहे. चर्चासत्रे आणि लक्ष्य गट चर्चेतून गावात करावयाचा बदल कसा साकारता येईल, याचा आराखडा बांधण्यात आला. यासाठी या योजनेचे तज्ज्ञ मार्गदर्शक संदीप ननावरे यांनी सविस्तर माहिती दिली.गावातील प्राथमिक शाळा, अंगणवाडी सुधारणा, आरोग्य शिक्षण, गावातील प्रमुख रस्ते, स्वच्छता, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, सांडपाणी निचरा, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण योजना राबविण्यासाठी कृतिसत्र घेण्यात आले. गावच्या शिवारातील पाणी गावातच अडविण्यासाठी लोकसहभागातून दोन बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित क्षेत्रातही पाणी साठवणीसाठी योजना सुरू केली जात आहे. हरळी गावाभोवती असणाऱ्या डोंगर उतारावर आडवे चर घेऊन त्यामध्ये वृक्षारोपण करण्याची मोहीम तरुणांनी हाती घेतली आहे. बीजारोपण आणि रोपलागवड मोहिमेसाठी सामाजिक वनीकरण विभागाचे सहकार्य मिळणार आहे. या कार्यशाळेसाठी गटविकास अधिकारी दीपा बापट, विस्ताराधिकारी पवेकर, वनक्षेत्र अधिकारी शिंदे, सरपंच अवंतिका जावळे, उपसरपंच विजय शिंदे, नंदा निकम, कृष्णा बरकडे, अर्चना शिंदे, पूनम बरकडे, आबासो बरकडे, ग्रामसेवक सुनील धायगुडे, संतोष बरकडे, कांतिलाल निकम, राहुल निकम, मोहन जावळे, चंद्रकांत शेलार, वसंत शेलार, संदीप ननावरे, संतोष देशमुख यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी) गावाभोवती जैविक कुंपणया कार्यशाळेदरम्यान तज्ज्ञ मार्गदर्शकांसह ग्रामस्थांनी शिवारफेरी केली. यामध्ये गावच्या शिवारात असणाऱ्या वृक्षसंपदेचा अभ्यास करण्यात आला. गावातील शेतीला वन्यप्राण्यांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी उपलब्ध वनस्पतींचाच वापर करून जैविक कुंपण करण्याची योजना आहे. याशिवाय याच वनराईत उपलब्ध फळांपासून प्रक्रिया उद्योग महिला बचत गटांच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत.हरळी हे गाव छोटीशी लोकवस्ती असणारे आहे. भौगोलिक परिस्थितीचा फायदा गावाला होण्यासाठी काही कामे होणे गरजेचे आहे. तरुणांच्या सहभागातून हे सहजशक्य आहे. गावच्या विकासाला याची मदतच होईल.-विजय शिंदे, उपसरपंच हरळी