शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

हरळीत साकारणार आता दुसरे हिवरे बाजार !

By admin | Updated: June 23, 2016 01:02 IST

ग्रामस्थ सज्ज : ‘आमचा गाव आमचा विकास’ योजनेअंतर्गत गावाचा कायापालट करण्याचा ध्यास

खंडाळा : जलसंधारण, पाणलोट विकास, वृक्षारोपण वनसंवर्धन, नाला बांध, ग्रामस्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा निर्मूलन यासह विविध उपक्रम हाती घेऊन गावाचा कायापालट करण्याचा ध्यास हरळी (ता. खंडाळा) येथील तरुणाईसह ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे नव्या प्रकल्पासह हरळीत दुसरे हिवरे बाजार साकारण्यासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. ‘आमचा गाव आमचा विकास’ या योजनेअंतर्गत सातारा जिल्हा परिषद व खंडाळा पंचायत समितीच्या वतीने ग्रामविकास मंत्रालयाच्या सूचनेनुसार हरळीत ग्रामस्थ व अधिकाऱ्यांची तीन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये पहिल्या दिवशी मशालफेरी काढून गावात होणाऱ्या बदलात आपणही सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले. त्यानुसार पुढील तीन दिवस गावच्या प्रमुखांसह तरुण वर्ग या कामासाठी पुढे सरसावला. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगाच्या ग्रामविकास आराखडा, गाव सूक्ष्म नियोजन, गावच्या शिवारासह नकाशा तयार करण्यात आला आहे. चर्चासत्रे आणि लक्ष्य गट चर्चेतून गावात करावयाचा बदल कसा साकारता येईल, याचा आराखडा बांधण्यात आला. यासाठी या योजनेचे तज्ज्ञ मार्गदर्शक संदीप ननावरे यांनी सविस्तर माहिती दिली.गावातील प्राथमिक शाळा, अंगणवाडी सुधारणा, आरोग्य शिक्षण, गावातील प्रमुख रस्ते, स्वच्छता, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, सांडपाणी निचरा, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण योजना राबविण्यासाठी कृतिसत्र घेण्यात आले. गावच्या शिवारातील पाणी गावातच अडविण्यासाठी लोकसहभागातून दोन बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित क्षेत्रातही पाणी साठवणीसाठी योजना सुरू केली जात आहे. हरळी गावाभोवती असणाऱ्या डोंगर उतारावर आडवे चर घेऊन त्यामध्ये वृक्षारोपण करण्याची मोहीम तरुणांनी हाती घेतली आहे. बीजारोपण आणि रोपलागवड मोहिमेसाठी सामाजिक वनीकरण विभागाचे सहकार्य मिळणार आहे. या कार्यशाळेसाठी गटविकास अधिकारी दीपा बापट, विस्ताराधिकारी पवेकर, वनक्षेत्र अधिकारी शिंदे, सरपंच अवंतिका जावळे, उपसरपंच विजय शिंदे, नंदा निकम, कृष्णा बरकडे, अर्चना शिंदे, पूनम बरकडे, आबासो बरकडे, ग्रामसेवक सुनील धायगुडे, संतोष बरकडे, कांतिलाल निकम, राहुल निकम, मोहन जावळे, चंद्रकांत शेलार, वसंत शेलार, संदीप ननावरे, संतोष देशमुख यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी) गावाभोवती जैविक कुंपणया कार्यशाळेदरम्यान तज्ज्ञ मार्गदर्शकांसह ग्रामस्थांनी शिवारफेरी केली. यामध्ये गावच्या शिवारात असणाऱ्या वृक्षसंपदेचा अभ्यास करण्यात आला. गावातील शेतीला वन्यप्राण्यांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी उपलब्ध वनस्पतींचाच वापर करून जैविक कुंपण करण्याची योजना आहे. याशिवाय याच वनराईत उपलब्ध फळांपासून प्रक्रिया उद्योग महिला बचत गटांच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत.हरळी हे गाव छोटीशी लोकवस्ती असणारे आहे. भौगोलिक परिस्थितीचा फायदा गावाला होण्यासाठी काही कामे होणे गरजेचे आहे. तरुणांच्या सहभागातून हे सहजशक्य आहे. गावच्या विकासाला याची मदतच होईल.-विजय शिंदे, उपसरपंच हरळी