शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

‘प्राधिकरण’चे खड्डे आता पालिकेच्या उरावर!

By admin | Updated: May 7, 2016 00:50 IST

काम करण्यास ठेकेदारांकडून नकार : पाणीपुरवठ्याच्या ढिसाळ कारभारामुळे पालिकेच्या खांद्यावरच एक वर्षापासून बोजा

दत्ता यादव --सातारा  --निधी उपलब्ध होत नसल्याने शहरातील पाणीपुरवठ्यांची कामे करण्यास प्राधिकरणने नकार दिला असून आजपर्यंतची गचाळ कामे दुरूस्त करण्याचा विडा यापुढे पालिकेलाच उचलावा लागणार असल्याचा गौप्यस्फोट मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. तर दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत पालिका अधिकाऱ्यांनीच यापुढे पालिका स्वत: कामे करणार असल्याचे सांगितले आहे, असे स्पष्टीकरण जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता व्ही. एल. कुलकर्णी यांनी दिले.गेल्या काही वर्षांपासून सातत्याने जीवनप्राधिकरणच्या नावाने लोकप्रतिनिधींपासून नगरसेवकापर्यंत सगळ्यांनीच खडे फोडले. कामाची संथगती आणि निकृष्ठ दर्जा, असा आरोपही वारंवार प्राधिकरणवर झाला. वर्षभर शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली होती. सुधारीत पाणी पुरवठा योजना दीड वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा ठराव झाला होता. मात्र प्राधिकरणने या योजनेसाठी तब्बल पाच वर्षे लावली. परंतु अद्यापही या योजनेची कामे अपूर्ण आहेत, असा पालिकेचा आरोप आहे. वर्षभरापूर्वी प्राधिकरणने कामे करण्यास नकार दिल्याने त्या दिवसांपासून शहरातील सर्व पाईपलाईनची कामे पालिकाच करत असल्याचे बापट यांनी सांगितले. प्राधिकरणने अर्धवट कामे सोडल्यामुळे तब्बल साडेसात कोटी वाढीव खर्च झाला असल्याचा गौप्यस्फोटही संबंधितांनी केला.दरम्यान, सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामाची ८ कोटी थकबाकी पालिकेकडून यायची आहे. या योजनेचे काम करत असताना निधीची कमतरता भासत होती. त्यामुळे ठेकेदारांनी कामे बंद केली. साहजिकच ही योजना रखडली गेली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत यापुढील कामे पालिकाच करण्याचा निर्णय झाला असल्याची माहितीही अभियंता कुलकर्णी यांनी दिली.पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट आणि प्राधिकरणचे कुलकर्णी यांनी परस्पर विधाने केल्यामुळे या योजनेमध्ये नेमका गोलमाल काय, हे सातारकरांच्या समजण्यापलिकडे आहे.