शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

‘प्राधिकरण’चे खड्डे आता पालिकेच्या उरावर!

By admin | Updated: May 7, 2016 00:50 IST

काम करण्यास ठेकेदारांकडून नकार : पाणीपुरवठ्याच्या ढिसाळ कारभारामुळे पालिकेच्या खांद्यावरच एक वर्षापासून बोजा

दत्ता यादव --सातारा  --निधी उपलब्ध होत नसल्याने शहरातील पाणीपुरवठ्यांची कामे करण्यास प्राधिकरणने नकार दिला असून आजपर्यंतची गचाळ कामे दुरूस्त करण्याचा विडा यापुढे पालिकेलाच उचलावा लागणार असल्याचा गौप्यस्फोट मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. तर दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत पालिका अधिकाऱ्यांनीच यापुढे पालिका स्वत: कामे करणार असल्याचे सांगितले आहे, असे स्पष्टीकरण जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता व्ही. एल. कुलकर्णी यांनी दिले.गेल्या काही वर्षांपासून सातत्याने जीवनप्राधिकरणच्या नावाने लोकप्रतिनिधींपासून नगरसेवकापर्यंत सगळ्यांनीच खडे फोडले. कामाची संथगती आणि निकृष्ठ दर्जा, असा आरोपही वारंवार प्राधिकरणवर झाला. वर्षभर शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली होती. सुधारीत पाणी पुरवठा योजना दीड वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा ठराव झाला होता. मात्र प्राधिकरणने या योजनेसाठी तब्बल पाच वर्षे लावली. परंतु अद्यापही या योजनेची कामे अपूर्ण आहेत, असा पालिकेचा आरोप आहे. वर्षभरापूर्वी प्राधिकरणने कामे करण्यास नकार दिल्याने त्या दिवसांपासून शहरातील सर्व पाईपलाईनची कामे पालिकाच करत असल्याचे बापट यांनी सांगितले. प्राधिकरणने अर्धवट कामे सोडल्यामुळे तब्बल साडेसात कोटी वाढीव खर्च झाला असल्याचा गौप्यस्फोटही संबंधितांनी केला.दरम्यान, सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामाची ८ कोटी थकबाकी पालिकेकडून यायची आहे. या योजनेचे काम करत असताना निधीची कमतरता भासत होती. त्यामुळे ठेकेदारांनी कामे बंद केली. साहजिकच ही योजना रखडली गेली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत यापुढील कामे पालिकाच करण्याचा निर्णय झाला असल्याची माहितीही अभियंता कुलकर्णी यांनी दिली.पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट आणि प्राधिकरणचे कुलकर्णी यांनी परस्पर विधाने केल्यामुळे या योजनेमध्ये नेमका गोलमाल काय, हे सातारकरांच्या समजण्यापलिकडे आहे.