शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आता मंत्रीच करतील आंदोलन !

By admin | Updated: April 3, 2016 03:49 IST

पालकमंत्र्यांचा इशारा : दुष्काळ बैठकीत कागदी घोडे; राष्ट्रवादीचे आमदारही प्रचंड संतप्त

सातारा : ‘राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच साताऱ्यालाही दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत. दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांसह कमी पाऊस झालेल्या पश्चिमेकडील तालुक्यांमधूनही पिण्याचे टँकर, चारा छावणी तसेच नळ पाणी योजना, विंधन विहिरींची मागणी आहे. मात्र, कागदी घोडे नाचवत प्रस्ताव दडपून ठेवले जात आहेत. वास्तविक दुष्काळाबाबत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनीच अधिक सजगपणे काम करायला हवे होते; पण तसे घडताना दिसत नसल्याने लोकप्रतिनिधींसह सरकारमधील मंत्र्यांनाही आता आंदोलनात उतरावे लागेल,’ असा संतापजनक इशारा पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिला. पालकमंत्र्यांनी शनिवारी नियोजन भवनात जिल्ह्याची टंचाई आढावा बैठक घेतली. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, उपजिल्हाधिकारी (महसूल) भारत वाघमारे उपस्थित होते. या बैठकीत साताऱ्यातील आमदार पोटतिडकीने दुष्काळी उपाययोजनांची मागणी करत असताना जिल्ह्यातील अधिकारी मात्र दुष्काळ नाही हेच दाखविण्याचा आटापिटा करताना पाहायला मिळत होते. आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आ. प्रभाकर घार्गे, आ. मकरंद पाटील, आ. शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. आनंदराव पाटील यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत अत्यंत अभ्यासपूर्णरीत्या आणि आग्रही मते मांडली. गेल्या दीड महिन्यापासून चारा छावण्या मागण्यांचे प्रस्ताव प्रशासनाकडे पडून आहेत, यावर कोणतीच कार्यवाही केली जात नाही. चाऱ्याबाबतचे प्रशासनाकडील आकडे फसवे आहेत. प्रत्यक्ष सर्व्हे करून गरज असलेल्या तालुक्यांत चारा छावण्या सुरू करा, अशी मागणी आ. जयकुमार गोरे यांनी केली. आ. शशिकांत शिंदे यांच्यासह सर्वच आमदारांनी गोरेंच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावरही आमदारांनी जोरदार ताशेरे ओढले. नळपाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव पाठवूनही ते कार्यकारी अभियंता ए. एस. कोळी यांच्याकडून अडविले जात आहेत. विंधन विहिरींची मागणी असताना भूजल विभाग टाळाटाळ करत आहे. दुष्काळाबाबत या विभागातील अधिकाऱ्यांना गांभीर्य राहिलेले नाही, असे आरोप आमदारांनी केले. तसेच पालकमंत्र्यांनी लक्ष घालून पुन्हा बैठक बोलाविण्याची मागणी केली. उद्या मुंबईत बैठक पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सर्व विभागांनी एकत्र बसून कागदपत्रांची पूर्तता करावी. उद्या, सोमवारी मुंबईत सर्व आमदार, जिल्हाधिकारी यांना सोबत घेऊन बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे. ...सात दिवसांत टँकर अन् छावण्या माण-खटाव तालुक्यांतील तीव्र दुष्काळी परिस्थितीचा विचार करता या दोन तालुक्यांमध्ये चारा छावण्या सुरू करण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले. दरम्यान, मागणीनंतर सात दिवसांत टँकर पुरवठा सुरू करा. दुष्काळाबाबत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.