शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

...आता दाखले वेगाने मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 23:07 IST

सातारा : ‘जनतेला जातीचे तसेच जातपडताळणीचे दाखले वेगाने कसे मिळतील, यासाठी शासन आग्रही असून, या दाखल्यांच्याबाबतीत जास्तीत जास्त पारदर्शकता ...

सातारा : ‘जनतेला जातीचे तसेच जातपडताळणीचे दाखले वेगाने कसे मिळतील, यासाठी शासन आग्रही असून, या दाखल्यांच्याबाबतीत जास्तीत जास्त पारदर्शकता कशी येईल, यावर भर दिला जाणार आहे,’ अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.मंत्री डॉ. खाडे म्हणाले, ‘जातीचे तसेच जातपडताळणीचे दाखले वेळेत मिळत नसल्याने अनेकांना शासकीय नोकरी मिळण्यात अडथळे निर्माण होतात. शिक्षणाच्या बाबतीतही या समस्या जाणवतात, त्यामुळे हे दाखले उमेदवारांना लवकरात लवकर कसे मिळतील, यासाठी शासन नियोजन करत आहे. ‘फास्ट ट्रॅक’ यंत्रणेच्या माध्यमातून हे केले जाणार आहे. प्रशासकीय यंत्रणेला ठराविक मुदतीत दाखले देण्याची सक्ती केली जाईल, यासाठी असलेल्या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करून हे दाखले देण्यासाठी पारदर्शकता आणण्यावर भर दिला जाणार आहे.’सामाजिक न्याय खाते हे गरीब लोकांच्या कल्याणासाठी काम करते, सुदैवाने मंत्रिपदाचा पदभार घेताच या खात्यासाठी सरकारने १२०० कोटींची तरतूद केली. गतवर्षीच्या बजेटपेक्षा यंदा ५०० रुपये सामाजिक न्याय खात्याला वाढवून मिळाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गरिबांच्या उथ्थानासाठी नवनवीन योजना राबविण्यावर भर दिला आहे, असेही डॉ. खाडे यांनी सांगितले.दरम्यान, दिव्यांग व्यक्तींना घरकुल बांधून दिले जाणार आहे. ८० टक्के अपंगत्व असणाऱ्या दिव्यांगांना त्याचा लाभ होईल. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण वर्षभर विविध कामे केली जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीही सरकार विशेष योजना राबवत आहे, असेही त्यांनी सांगितले.सातारा जिल्हा परिषदेला पूर्णवेळ समाजकल्याण अधिकारी कधी देणार आहात? या प्रश्नावर मंत्री डॉ. खाडे म्हणाले, ‘संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी ही पदे रिक्त आहे. एका अधिकाºयाकडे दोन पदभार दिले आहेत. ही पदे भरण्यासाठी शासनाने तयारी सुरू केली आहे. लवकरच यासाठी परीक्षा घेतली जाईल.’अण्णा भाऊंच्या वारसांना न्याय देऊलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या वारसांना न्याय मिळवून देण्यासाठी मंगळवार किंवा बुधवारी मंत्रालयात बैठक आयोजित केली जाणार आहे, असेही मंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले.‘न्याय भवन’ बांधकामाची चौकशीसाताºयातील सामाजिक न्याय भवनाच्या बांधकामात दोष असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत विचारले असता डॉ. खाडे यांनी या कामाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.येळगावकरांसोबत काम करूमाण-खटावचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांच्याशी आपली जुनी मैत्री आहे. विरोधात काम करत असताना त्यांनी आणि मी अधिवेशन काळात विधिमंडळ दणाणून सोडले होते. अनेक वृत्तपत्रांच्या हेडलाईन्स आमच्या अनोख्या आंदोलनांनी गाजल्या. आता डॉ. येळगावकरांसोबत पुन्हा काम करण्याची आपली इच्छा आहे, असेही डॉ. खाडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.