शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

‘एटीएम’चा अतिवापर ग्राहकांसाठी आत्ता महागात

By admin | Updated: January 6, 2017 23:07 IST

मोफतची मुदत संपली : पुढील कार्यवाहीबाबत बँकाही आदेशाच्या प्रतीक्षेत

सातारा : नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ‘दिसले एटीएम की काढ पैसे’ अशी सवय लागली आहे. मोफतची मुदत संपल्याने भविष्यात यासाठी शुल्क आकारले जाऊ शकते. त्यामुळे सवयीवर आवर घालावा लागणार आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी चलनातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा ८ नोव्हेंबर रोजी रद्द ठरविल्या. त्यानंतर स्वत:कडील जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी किंवा खात्यात जमा करण्यासाठी ग्राहकांच्या बँकेत रांगा लागल्या होत्या. बँकेतून चलनातील नोटा काढल्या जात होत्या. त्या तुलनेते भरणा होत नसल्याने आर्थिक कोंडी झाली. चलनात आलेल्या पाचशे व दोन हजार रुपयांच्या नवीन नोटांचा आकार वेगळा असल्याने एटीएममधील ट्रे बदलणे गरजेचे होते. त्यामुळे असंख्य एटीएम बंद अवस्थेत होते. या काळात ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत कोणत्याही एटीएममधून पैसे काढले तरी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे एटीएम केंद्र दिसले की, रांगेत उभे राहण्याची सवयच लागली होती. पैसे काढण्यावरही मर्यादा असल्याने त्यावरही अनेकांनी उपाय शोधले आहेत. दोन-तीन बँकांमध्ये खाते उघडून एटीएम घेतले आहेत. प्रत्येक एटीएममधून दररोज पैसे काढले जात होते. सेवानिवृत्ती वेतन व पगार काढण्यासाठी आता पुन्हा बँका व एटीएमसमोर रांगा दिसणार आहेत. कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्यासाठी दिलेली मुदत संपली असल्याने आता पहिल्या ठराविक व्यवहारानंतर शुल्क आकारले जाऊ शकते. त्यामुळे आतापासूनच सावधानता बाळगणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)बंद एटीएमची साठीनोटाबंदीच्या निर्णयाला दोन महिने झाले आहेत. साठ दिवसांनंतरही सातारा जिल्ह्यातील अनेक एटीएम बंद आहेत. त्यामुळे अनेक बँकांच्या ग्राहकांना इतर बँकांच्या एटीएमवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे सर्व एटीएम सुरू केल्यानंतरच हा निर्णय घ्यावा, अशी मागणी आहे.