शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

पाण्यासाठी आता वादावादी!

By admin | Updated: September 6, 2015 22:19 IST

विहिरींनी गाठला तळ; कूपनलिका बंद

रेठरे बुद्रुक : गत काही दिवसांपासून वातावरणामध्ये अचानक बदल होत आहे. कधी कडक ऊन तर कधी अचानक आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी गच्च भरून येत आहे. मात्र, एवढे होऊनही पाऊस पडत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत. अशातच विहीर व कूपनलिकांची पाणी पातळी घटल्याने पाणीपुरवठा संस्थेचे पाणी शेतीला मिळविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये हमरीतुमरी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पावसाने दडी मारल्याने अन् उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली असल्यामुळे खरीप हंगामातील बरीचशी पिके कोमेजली आहेत. भात, सोयाबीन, भुईमूग, ऊस आदी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पाऊस चांगल्याप्रकारे झाला होता. त्यादरम्यान बहुतांशी शेतकऱ्यांनी हंगामपूर्व मशागती, बी-बियाणे खरेदी करणे, पेरणी करणे अशी कामे करण्यासाठी बराचसा खर्च करून पिकांची पेरणी, टोकणी, लागण अशी कामे पूर्ण केली. सुरुवातीला एक-दोन पाऊस देखील चांगल्याप्रकारे झाले अन् शेतकरी शेतीच्या कामात मग्न राहिला. पिकांची उगवण चांगल्याप्रकारे झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करून पिकांना खतांचे डोस दिले. दरम्यान, पाऊस पडत नसला तरी चिंता न करता पुन्हा एकदा पाऊस पडेल या आशेवर शेतीची कामे करत पावसाची प्रतीक्षा सुरूच होती. परंतु गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या परिस्थितीमध्ये कृष्णाकाठ तसेच परिसरामध्ये हंगामाच्या सुरुवातीचा पाऊस तसेच इतर स्त्रोतांपासून पाणी उपलब्ध करून लावलेली पिके आता भरण्याची वेळ आली आहे. परंतु वातावरणामध्ये अचानक होणारे बदल कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरण यामुळे पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारे उगवण झालेल्या पिकांना पाण्याची नितांत अवश्यकता आहे. ज्या परिसरात विविध स्त्रोतांचे पाणी उपलब्ध आहे. तेथेही अपुरा वीजपुरवठा तसेच पाण्याची वाढती मागणी, यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. अनेक ठिकाणी रात्री पाणी मिळविण्याच्या प्रयत्नात शेजार-शेजाऱ्यांची हमरीतुमरी देखील होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. (वार्ताहर) कऱ्हाड दक्षिणेतील तलावात ठणठणाट पावसाळ्याचा कालावधी संपत आला तरी पाऊस गायबच असल्याने उंडाळे परिसरासह सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पावसाअभावी अपेक्षित वाढ नसलेली खरीप पिके उन्हाच्या तीव्रतेने कोमेजून जात आहेत. संभाव्य नुकसानाच्या भीतीने बळीराजा पुरता हबकला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी सध्या खालावत असल्याने शिवारातील विहिरीसह गावातील पाणी पुरवठ्याच्या विहिरींनीही तळ गाठला आहे. परिणामी, पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईचे संभाव्य चित्र आ वासून उभे आहे.