शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

पाण्यासाठी आता वादावादी!

By admin | Updated: September 6, 2015 22:19 IST

विहिरींनी गाठला तळ; कूपनलिका बंद

रेठरे बुद्रुक : गत काही दिवसांपासून वातावरणामध्ये अचानक बदल होत आहे. कधी कडक ऊन तर कधी अचानक आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी गच्च भरून येत आहे. मात्र, एवढे होऊनही पाऊस पडत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत. अशातच विहीर व कूपनलिकांची पाणी पातळी घटल्याने पाणीपुरवठा संस्थेचे पाणी शेतीला मिळविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये हमरीतुमरी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पावसाने दडी मारल्याने अन् उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली असल्यामुळे खरीप हंगामातील बरीचशी पिके कोमेजली आहेत. भात, सोयाबीन, भुईमूग, ऊस आदी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पाऊस चांगल्याप्रकारे झाला होता. त्यादरम्यान बहुतांशी शेतकऱ्यांनी हंगामपूर्व मशागती, बी-बियाणे खरेदी करणे, पेरणी करणे अशी कामे करण्यासाठी बराचसा खर्च करून पिकांची पेरणी, टोकणी, लागण अशी कामे पूर्ण केली. सुरुवातीला एक-दोन पाऊस देखील चांगल्याप्रकारे झाले अन् शेतकरी शेतीच्या कामात मग्न राहिला. पिकांची उगवण चांगल्याप्रकारे झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करून पिकांना खतांचे डोस दिले. दरम्यान, पाऊस पडत नसला तरी चिंता न करता पुन्हा एकदा पाऊस पडेल या आशेवर शेतीची कामे करत पावसाची प्रतीक्षा सुरूच होती. परंतु गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या परिस्थितीमध्ये कृष्णाकाठ तसेच परिसरामध्ये हंगामाच्या सुरुवातीचा पाऊस तसेच इतर स्त्रोतांपासून पाणी उपलब्ध करून लावलेली पिके आता भरण्याची वेळ आली आहे. परंतु वातावरणामध्ये अचानक होणारे बदल कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरण यामुळे पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारे उगवण झालेल्या पिकांना पाण्याची नितांत अवश्यकता आहे. ज्या परिसरात विविध स्त्रोतांचे पाणी उपलब्ध आहे. तेथेही अपुरा वीजपुरवठा तसेच पाण्याची वाढती मागणी, यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. अनेक ठिकाणी रात्री पाणी मिळविण्याच्या प्रयत्नात शेजार-शेजाऱ्यांची हमरीतुमरी देखील होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. (वार्ताहर) कऱ्हाड दक्षिणेतील तलावात ठणठणाट पावसाळ्याचा कालावधी संपत आला तरी पाऊस गायबच असल्याने उंडाळे परिसरासह सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पावसाअभावी अपेक्षित वाढ नसलेली खरीप पिके उन्हाच्या तीव्रतेने कोमेजून जात आहेत. संभाव्य नुकसानाच्या भीतीने बळीराजा पुरता हबकला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी सध्या खालावत असल्याने शिवारातील विहिरीसह गावातील पाणी पुरवठ्याच्या विहिरींनीही तळ गाठला आहे. परिणामी, पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईचे संभाव्य चित्र आ वासून उभे आहे.