शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी आता वादावादी!

By admin | Updated: September 6, 2015 22:19 IST

विहिरींनी गाठला तळ; कूपनलिका बंद

रेठरे बुद्रुक : गत काही दिवसांपासून वातावरणामध्ये अचानक बदल होत आहे. कधी कडक ऊन तर कधी अचानक आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी गच्च भरून येत आहे. मात्र, एवढे होऊनही पाऊस पडत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत. अशातच विहीर व कूपनलिकांची पाणी पातळी घटल्याने पाणीपुरवठा संस्थेचे पाणी शेतीला मिळविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये हमरीतुमरी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पावसाने दडी मारल्याने अन् उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली असल्यामुळे खरीप हंगामातील बरीचशी पिके कोमेजली आहेत. भात, सोयाबीन, भुईमूग, ऊस आदी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पाऊस चांगल्याप्रकारे झाला होता. त्यादरम्यान बहुतांशी शेतकऱ्यांनी हंगामपूर्व मशागती, बी-बियाणे खरेदी करणे, पेरणी करणे अशी कामे करण्यासाठी बराचसा खर्च करून पिकांची पेरणी, टोकणी, लागण अशी कामे पूर्ण केली. सुरुवातीला एक-दोन पाऊस देखील चांगल्याप्रकारे झाले अन् शेतकरी शेतीच्या कामात मग्न राहिला. पिकांची उगवण चांगल्याप्रकारे झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करून पिकांना खतांचे डोस दिले. दरम्यान, पाऊस पडत नसला तरी चिंता न करता पुन्हा एकदा पाऊस पडेल या आशेवर शेतीची कामे करत पावसाची प्रतीक्षा सुरूच होती. परंतु गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या परिस्थितीमध्ये कृष्णाकाठ तसेच परिसरामध्ये हंगामाच्या सुरुवातीचा पाऊस तसेच इतर स्त्रोतांपासून पाणी उपलब्ध करून लावलेली पिके आता भरण्याची वेळ आली आहे. परंतु वातावरणामध्ये अचानक होणारे बदल कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरण यामुळे पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारे उगवण झालेल्या पिकांना पाण्याची नितांत अवश्यकता आहे. ज्या परिसरात विविध स्त्रोतांचे पाणी उपलब्ध आहे. तेथेही अपुरा वीजपुरवठा तसेच पाण्याची वाढती मागणी, यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. अनेक ठिकाणी रात्री पाणी मिळविण्याच्या प्रयत्नात शेजार-शेजाऱ्यांची हमरीतुमरी देखील होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. (वार्ताहर) कऱ्हाड दक्षिणेतील तलावात ठणठणाट पावसाळ्याचा कालावधी संपत आला तरी पाऊस गायबच असल्याने उंडाळे परिसरासह सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पावसाअभावी अपेक्षित वाढ नसलेली खरीप पिके उन्हाच्या तीव्रतेने कोमेजून जात आहेत. संभाव्य नुकसानाच्या भीतीने बळीराजा पुरता हबकला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी सध्या खालावत असल्याने शिवारातील विहिरीसह गावातील पाणी पुरवठ्याच्या विहिरींनीही तळ गाठला आहे. परिणामी, पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईचे संभाव्य चित्र आ वासून उभे आहे.