शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

कट्टे वाटपाला आता तरी मुहूर्त काढा!--निवडणूक झाली, आता कामाचं बोला

By admin | Updated: October 23, 2014 00:10 IST

राजवाडा मंडई : दोन्ही आघाड्यांच्या लपंडावात विक्रेत्यांची गोची

सातारा : पालिकेने शहरात उभारलेल्या टोलेजंग भाजी मंडई व फ्रूट मार्केटचे निवडणुकीआधी थाटात उद्घाटन झाले; परंतु अजूनही विक्रेत्यांना जागा वाटप झालेले नाही. दोन्ही आघाड्यांचा मेळ बसत नसल्याने मंडईतील कट्टे वाटपाचे घोडे अडले आहे.शहरात फूटपाथवर बसून भाजी तसेच फळ विक्री करणाऱ्यांची सोय व्हावी, तसेच शहरातील फूटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे व्हावेत. रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर व्हावी, या हेतूने तत्कालीन नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक यांच्या संकल्पनेतून राजवाडा येथे प्रतापसिंह महाराज फ्रूट मार्केट व भाजी मंडईची उभारणी करण्यात आली. या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी तब्बल दोन कोटी खर्च झाले आहे. तळात प्रशस्त पार्किंग त्यावरच्या मजल्यावर भाजी विक्रेत्यांसाठी कट्टे व दुसऱ्या मजल्यावर फ्रूट मार्केट अशी रचना या इमारतीत आहे.दरम्यान, एवढा निधी खर्च करून उभारलेल्या या इमारतीचे सुमारे चार महिन्यांपूर्वी उद्घाटनही झाले. मात्र, अजूनही या मंडईचा वापर होताना दिसत नाही. पालिकेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कट्टे वाटपाबाबत एकमत होत नसल्याचे कारण पुढे येत आहे. या मंडईत पूर्वी बसणाऱ्या विक्रेत्यांची नावे पालिकेकडे नोंदली गेली आहेत. त्या व्यतिरिक्त आणखी जवळच्या लोकांची सोय मंडईत करावी, यासाठी पालिकेतील एक गट आग्रही असल्याने हा विषय रखडला आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने या मंडईतील कट्टे वाटपाचा ड्रॉ घेतला नाही. आता विधानसभा निवडणूक पार पडली आहे. आता ड्रॉ काढायला कोणती अडचण राहिलेली नाही, तरीही दिरंगाई सुरू आहे. त्यामुळे येथील विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या इमारतीत भाजी मंडईमध्ये १२३ कट्टे आहेत, तर फळविक्रीसाठी ४८ कट्टे आहेत. यापैकी ४८ विक्रेते पादचारी मार्गावरच फळविक्री करतात. त्यांचे या फ्रूटमार्केटमध्ये स्थलांतर झाल्यास फूटपाथ मोकळे होऊन नागरिकांची रस्त्याने चालण्याची सोय होईल. मात्र, पालिकेच्या दिरंगाईमुळे अनेक महिने हा विषय भिजत पडला आहे. (प्रतिनिधी)