शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कट्टे वाटपाला आता तरी मुहूर्त काढा!--निवडणूक झाली, आता कामाचं बोला

By admin | Updated: October 23, 2014 00:10 IST

राजवाडा मंडई : दोन्ही आघाड्यांच्या लपंडावात विक्रेत्यांची गोची

सातारा : पालिकेने शहरात उभारलेल्या टोलेजंग भाजी मंडई व फ्रूट मार्केटचे निवडणुकीआधी थाटात उद्घाटन झाले; परंतु अजूनही विक्रेत्यांना जागा वाटप झालेले नाही. दोन्ही आघाड्यांचा मेळ बसत नसल्याने मंडईतील कट्टे वाटपाचे घोडे अडले आहे.शहरात फूटपाथवर बसून भाजी तसेच फळ विक्री करणाऱ्यांची सोय व्हावी, तसेच शहरातील फूटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे व्हावेत. रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर व्हावी, या हेतूने तत्कालीन नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक यांच्या संकल्पनेतून राजवाडा येथे प्रतापसिंह महाराज फ्रूट मार्केट व भाजी मंडईची उभारणी करण्यात आली. या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी तब्बल दोन कोटी खर्च झाले आहे. तळात प्रशस्त पार्किंग त्यावरच्या मजल्यावर भाजी विक्रेत्यांसाठी कट्टे व दुसऱ्या मजल्यावर फ्रूट मार्केट अशी रचना या इमारतीत आहे.दरम्यान, एवढा निधी खर्च करून उभारलेल्या या इमारतीचे सुमारे चार महिन्यांपूर्वी उद्घाटनही झाले. मात्र, अजूनही या मंडईचा वापर होताना दिसत नाही. पालिकेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कट्टे वाटपाबाबत एकमत होत नसल्याचे कारण पुढे येत आहे. या मंडईत पूर्वी बसणाऱ्या विक्रेत्यांची नावे पालिकेकडे नोंदली गेली आहेत. त्या व्यतिरिक्त आणखी जवळच्या लोकांची सोय मंडईत करावी, यासाठी पालिकेतील एक गट आग्रही असल्याने हा विषय रखडला आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने या मंडईतील कट्टे वाटपाचा ड्रॉ घेतला नाही. आता विधानसभा निवडणूक पार पडली आहे. आता ड्रॉ काढायला कोणती अडचण राहिलेली नाही, तरीही दिरंगाई सुरू आहे. त्यामुळे येथील विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या इमारतीत भाजी मंडईमध्ये १२३ कट्टे आहेत, तर फळविक्रीसाठी ४८ कट्टे आहेत. यापैकी ४८ विक्रेते पादचारी मार्गावरच फळविक्री करतात. त्यांचे या फ्रूटमार्केटमध्ये स्थलांतर झाल्यास फूटपाथ मोकळे होऊन नागरिकांची रस्त्याने चालण्याची सोय होईल. मात्र, पालिकेच्या दिरंगाईमुळे अनेक महिने हा विषय भिजत पडला आहे. (प्रतिनिधी)