शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

पीपीई किट घालून आता कारखान्यांसमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:42 IST

सातारा :‘साखर कारखान्यांना ऊस घातल्यानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना बिल अदा करणे हे एफआरपी कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यातील ...

सातारा :‘साखर कारखान्यांना ऊस घातल्यानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना बिल अदा करणे हे एफआरपी कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी कोरोनाचा फायदा घेऊन चार महिन्यांपासून शेतकऱ्यांना देणी दिली नाहीत. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. कारखान्यांनी दोन दिवसात देणी अदा करावीत. अन्यथा प्रत्येक कारखान्याच्या गेटसमोर कोरोना प्रतिबंधात्मक पीपीई किट घालून आंदोलन करणार आहे,’ असा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात प्रकाश साबळे यांनी म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी थकवली आहेत. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना ऊस पिकाशिवाय इतर उत्पन्नाचे साधन नाही. लागवडीसाठी काढलेले कर्ज तसेच कामगार व उदरनिर्वाह करण्यासाठी बँका व इतर माध्यमातून कर्जे काढावी लागली. त्या कर्जांची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांच्यामागे तगादा सुरू आहे. असे असताना कारखान्यांना ऊस घालून चार महिन्यांचा अवधी उलटूनही अद्याप बिल जमा नाहीत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. आता परिस्थिती सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे. कारखान्यांवर कारवाई करण्याचे अधिकार असलेली यंत्रणा गप्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःची लढाई स्वतः लढावी लागणार असून त्यादृष्टीने आता दोन दिवसात कारखान्यांनी देणी अदा करावीत अन्यथा कोरोनाचे सर्व नियम पाळून व कोरोना प्रतिबंधात्मक पीपीई किट घालून आंदोलन करणार आहे.