शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारापेक्षा ‘नोटा’च श्रेष्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:40 IST

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीत लोकांच्या पसंतीस उतरलेल्या उमेदवारांनी गुलालाची उधळण केली तर अनेकांना बुक्यावरच समाधान मानावे लागले; ...

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीत लोकांच्या पसंतीस उतरलेल्या उमेदवारांनी गुलालाची उधळण केली तर अनेकांना बुक्यावरच समाधान मानावे लागले; परंतु धनगरवाडी ग्रामपंचायतीसाठी झालेल्या दोन जागेच्या निवडणुकीत अजब प्रकार घडला. उमेदवारांपेक्षा नोटालाच मतदारांनी पसंती दिल्याने विजयी घोषित कोणाला करावे? असा यक्ष प्रश्न निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाच पडला. त्यामुळे निकालाचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात गेला. निवडणुकीच्या रिंगणात नोटाही श्रेष्ठ ठरू शकतात, हेच समोर दिसून आले.

खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायतीत असलेल्या सात जागांसाठी ग्रामस्थांनी बिनविरोधचा फॉर्म्यूला आणला होता. यामध्ये तीन जागा बिनविरोध झाल्या तर दोन जागा उमेदवाराअभावी रिक्त राहिल्या; मात्र उर्वरित दोन जागांसाठी ३६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वसाधारण जागेसाठी जयवंत मांढरे यांना १९ मते, ज्ञानेश्वर पाचे यांना १३८ मते तर नोटाला २११ मते पडली. तर सर्वसाधारण स्त्री राखीव जागेसाठी चंद्रभागा कदम यांना १२५ मते, चैत्राली कदम यांना २६ मते तर नोटाला २१७ मते मिळाली. त्यामुळे भलताच पेच निर्माण झाला. खंडाळा तालुक्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच असे घडले. याठिकाणी काय निर्णय घ्यावा, याचा पेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पडल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

वास्तविक या दोन्ही जागेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले चारही उमेदवार लोकांच्या पसंतीला उतरले नाहीत. त्यामुळे नोटाला अधिक मतदान केल्यास २०१८ च्या एका निकालानुसार हे उमेदवार बाद ठरतील, असा कयास बांधून ग्रामस्थांनी नोटाचा पर्याय स्वीकारला असावा. आता निर्णय काहीही होवो; पण निवडणुकीत उमेदवार पसंतीचे नसतील तर काय होऊ शकते, याचे उदाहरण समोर आले आहे. त्यामुळे ‘गाव करील ते राव काय करील’ हेच खरे आहे, असे म्हणावे लागेल. कारण वाटलं म्हणून उभा राहिलो तर लोकांसमोर निवडणूक आयोगाने पर्याय निर्माण करून दिला आहे, याची प्रचिती या उदाहरणाने समोर आली आहे.

(चौकट)

निकालाने वेधले लक्ष

वास्तविक धनगरवाडी गाव हे विकासाच्या पथावर चालणारे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. ग्रामपंचायतीमार्फत अनेक विविध योजना राबवून जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे. स्वच्छ ग्राम अभियानात गावाचा डंका दिल्लीपर्यंत पोहोचला होता. याच गावात निवडणुकीत ग्रामस्थांनी असा निर्णय घेतल्याने सर्वांचेच लक्ष वेधले गेले.