शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
3
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
4
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
5
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
6
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
7
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
8
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
9
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
10
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
11
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
12
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
13
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
14
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
15
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
16
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
17
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
18
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
19
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
20
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप

निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारापेक्षा ‘नोटा’च श्रेष्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:40 IST

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीत लोकांच्या पसंतीस उतरलेल्या उमेदवारांनी गुलालाची उधळण केली तर अनेकांना बुक्यावरच समाधान मानावे लागले; ...

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीत लोकांच्या पसंतीस उतरलेल्या उमेदवारांनी गुलालाची उधळण केली तर अनेकांना बुक्यावरच समाधान मानावे लागले; परंतु धनगरवाडी ग्रामपंचायतीसाठी झालेल्या दोन जागेच्या निवडणुकीत अजब प्रकार घडला. उमेदवारांपेक्षा नोटालाच मतदारांनी पसंती दिल्याने विजयी घोषित कोणाला करावे? असा यक्ष प्रश्न निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाच पडला. त्यामुळे निकालाचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात गेला. निवडणुकीच्या रिंगणात नोटाही श्रेष्ठ ठरू शकतात, हेच समोर दिसून आले.

खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायतीत असलेल्या सात जागांसाठी ग्रामस्थांनी बिनविरोधचा फॉर्म्यूला आणला होता. यामध्ये तीन जागा बिनविरोध झाल्या तर दोन जागा उमेदवाराअभावी रिक्त राहिल्या; मात्र उर्वरित दोन जागांसाठी ३६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वसाधारण जागेसाठी जयवंत मांढरे यांना १९ मते, ज्ञानेश्वर पाचे यांना १३८ मते तर नोटाला २११ मते पडली. तर सर्वसाधारण स्त्री राखीव जागेसाठी चंद्रभागा कदम यांना १२५ मते, चैत्राली कदम यांना २६ मते तर नोटाला २१७ मते मिळाली. त्यामुळे भलताच पेच निर्माण झाला. खंडाळा तालुक्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच असे घडले. याठिकाणी काय निर्णय घ्यावा, याचा पेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पडल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

वास्तविक या दोन्ही जागेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले चारही उमेदवार लोकांच्या पसंतीला उतरले नाहीत. त्यामुळे नोटाला अधिक मतदान केल्यास २०१८ च्या एका निकालानुसार हे उमेदवार बाद ठरतील, असा कयास बांधून ग्रामस्थांनी नोटाचा पर्याय स्वीकारला असावा. आता निर्णय काहीही होवो; पण निवडणुकीत उमेदवार पसंतीचे नसतील तर काय होऊ शकते, याचे उदाहरण समोर आले आहे. त्यामुळे ‘गाव करील ते राव काय करील’ हेच खरे आहे, असे म्हणावे लागेल. कारण वाटलं म्हणून उभा राहिलो तर लोकांसमोर निवडणूक आयोगाने पर्याय निर्माण करून दिला आहे, याची प्रचिती या उदाहरणाने समोर आली आहे.

(चौकट)

निकालाने वेधले लक्ष

वास्तविक धनगरवाडी गाव हे विकासाच्या पथावर चालणारे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. ग्रामपंचायतीमार्फत अनेक विविध योजना राबवून जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे. स्वच्छ ग्राम अभियानात गावाचा डंका दिल्लीपर्यंत पोहोचला होता. याच गावात निवडणुकीत ग्रामस्थांनी असा निर्णय घेतल्याने सर्वांचेच लक्ष वेधले गेले.