शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅक्टोबर हीट’ नव्हे; पाऊसच ‘हिट’

By admin | Updated: October 5, 2015 00:19 IST

धांदल उडूनही समाधान : सातारा शहरासह विविध ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार; जिल्ह्यात भूजलस्तर वाढणार

सातारा : शहर व तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये परतीच्या पावसाने रविवारी सलग तिसऱ्या दिवशी दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असले, तरी भूजलपातळीत वाढ होणार असल्याने समाधानाचे वातावरण आहे. ‘आॅक्टोबर हीट’चे दिवस असताना सलग तीन दिवस संततधार पडणारा पाऊसच ‘हिट’ ठरला आहे. परतीला जाता-जाता सक्रिय झालेल्या मान्सूनने रविवारी सलग तिसऱ्या दिवशी सातारा शहरासह परिसराला झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते.सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी एकच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.ओढे-नाले भरून वाहिले तर रस्त्यावरही पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागली. रविवारी बाजाराचा दिवस असल्यामुळे जुना मोटार स्टॅण्ड येथील महात्मा गांधी भाजीमंडईत ग्राहक, विक्रेत्यांची गर्दी होती. रस्त्याकडेलाही किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. दुपारी अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे दुकानदारांसह ग्राहकांची त्रेधातिरपिट उडाली. रस्त्याकडेला बसलेल्या शेतकऱ्यांचा माल भिजल्यामुळे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिमझिम सुरूच होती. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. संततधार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. शहराच्या पश्चिमेस डोंगरभागात जोरदार पाऊस पडत आहे. रविवारी सुटी असल्यामुळे कास पुष्प पठारावर हजारो पर्यटकांनी भेट दिली. मात्र, दुपारी एकपासूनच पावसाला सुरुवात झाल्यामुळे पर्यटकांना माघारी फिरावे लागले. (प्रतिनिधी) दुष्काळग्रस्तांसाठी माणगंगेला पान्हा!म्हसवड : माण तालुक्याची वरदायिनी असणाऱ्या मानगंगा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने दुष्काळी बळीराजा सुखावला आहे. माण तालुक्यातील बहुतांशी गावात परतीच्या मान्सूनने हजेरी लावून कृपादृष्टी दाखवल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. यंदाच्या पावसाळ्यात पावसाने हजेरी न लावल्यामुळे येथील बळीराजा चिंतेत होता. त्यातच दुष्काळी परिस्थितीचा सामना येथील नागरिक करीत होते. १६ टँकरने तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू होता. मान्सून पूर्व पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने माणदेशी बळीराजाने खरिपाच्या पेरण्या धूमधडाक्यात केल्या; परंतु नंतर पावसाने डोळे वटारल्यामुळे खरीप हंगामातील पिके पावसावाचून जळून गेली. जिथे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना मात्र वरुणराजाने गत दोन दिवसांपासून परतीच्या मान्सूनच्या पावसाने दुष्काळी जनतेला दिलासा दिल्यामुळे ओढे, नाले, सिमेंट बंधारे तुडुंब भरले आहे. माण नदीला यावर्षी पहिल्यांदाच पाणी आल्याने समाधान व्यक्त होत आहे. यंदा शहरवासीयांनी गणेश विसर्जनाला माण नदी पात्रात पाणी नसल्याने इतरत्र विहिरी व तलावांचा शोध घेऊन पाणी जिथे आहे. तिथे गणेश विसर्जन करावे लागले होते.रविवारी सलग तिसऱ्या दिवशी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरीराजा आनंदित असून, यावर्षीचा खरीप हंगाम वाया गेला तर रब्बी हंगामातील पिके तरी पदरात पडतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)धोम-बलकवडीचा भराव खचलाआदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात आदर्की परिसराला एक तास मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे बंधारे भरून वाहिले, तर आदर्कीच्या ओढ्याला पूर आला. पुराचे पाणी धोम-बलकवडी उजव्या कालव्यात मिसळल्याने कालव्यात पाणी मावले नाही. त्यामुळे कालव्याचा भराव खचला आहे. कापशी-हिंगणगाव, बिबी-कापशी, फलटण-सातारा रस्त्यांच्या फरशी पुलावरून पाणी वाहिल्याने वाहतूक ठप्प झाली. फलटणच्या पश्चिम भागात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम वाया गेला होता. बाजरीची काढणी, मळणी सुरू असतानाच दुपारी दोन ते चार मुसळधार पावसाने हजेरी लावली. आदर्की ओढ्याचे पाणी कालव्यात शिरल्याने मातीच्या भरावावरून तीस फूट वाहून दहा फुटांचा भराव खचला. मात्र मायनर उघडल्याने कालवा फुटण्याचा अनर्थ टळला. मायणी भागात वीजपुरवठा खंडितमायणी : परिसरात रविवारी दुपारी बारा वाजता व सायंकाळी पाच वाजता विजांच्या गडगडासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे मायणी आठवडी बाजारातील व्यापारी, शेतकरी व ग्राहकांची मोठी धांदल उडाली. मायणीसह विखळे, हिवरवाडी, कन्हरवाडी, कानकात्रे, ढोकळवाडी, कलेढोण परिसरात दुपारी बारा वाजल्यापासून विजांच्या गडगडासह सुमारे एक तास जोरदार पाऊस झाला या पावसमुळे परिसरातील ओढे-नाले वाहू लागले तसेच परिसरातील पाझर तलाव, नालाबांध, सिमेंट बंधारे भरून वाहू लागले आहेत. मायणी, कानकात्रे, मुळीकवाडी, पाचवड, विखळे येथील तलावामधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली तेव्हापासून रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता. दुपारी बारा वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत तो सुरळीत झाला नव्हता. आणखी काही दिवस परतीचा मान्सून असाच सुरू राहिल्यास परिसरातील तलाव पूर्ण क्षमतेने भरतील, अशी अशा आहे. (वार्ताहर)