शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

‘आॅक्टोबर हीट’ नव्हे; पाऊसच ‘हिट’

By admin | Updated: October 5, 2015 00:19 IST

धांदल उडूनही समाधान : सातारा शहरासह विविध ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार; जिल्ह्यात भूजलस्तर वाढणार

सातारा : शहर व तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये परतीच्या पावसाने रविवारी सलग तिसऱ्या दिवशी दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असले, तरी भूजलपातळीत वाढ होणार असल्याने समाधानाचे वातावरण आहे. ‘आॅक्टोबर हीट’चे दिवस असताना सलग तीन दिवस संततधार पडणारा पाऊसच ‘हिट’ ठरला आहे. परतीला जाता-जाता सक्रिय झालेल्या मान्सूनने रविवारी सलग तिसऱ्या दिवशी सातारा शहरासह परिसराला झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते.सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी एकच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.ओढे-नाले भरून वाहिले तर रस्त्यावरही पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागली. रविवारी बाजाराचा दिवस असल्यामुळे जुना मोटार स्टॅण्ड येथील महात्मा गांधी भाजीमंडईत ग्राहक, विक्रेत्यांची गर्दी होती. रस्त्याकडेलाही किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. दुपारी अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे दुकानदारांसह ग्राहकांची त्रेधातिरपिट उडाली. रस्त्याकडेला बसलेल्या शेतकऱ्यांचा माल भिजल्यामुळे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिमझिम सुरूच होती. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. संततधार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. शहराच्या पश्चिमेस डोंगरभागात जोरदार पाऊस पडत आहे. रविवारी सुटी असल्यामुळे कास पुष्प पठारावर हजारो पर्यटकांनी भेट दिली. मात्र, दुपारी एकपासूनच पावसाला सुरुवात झाल्यामुळे पर्यटकांना माघारी फिरावे लागले. (प्रतिनिधी) दुष्काळग्रस्तांसाठी माणगंगेला पान्हा!म्हसवड : माण तालुक्याची वरदायिनी असणाऱ्या मानगंगा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने दुष्काळी बळीराजा सुखावला आहे. माण तालुक्यातील बहुतांशी गावात परतीच्या मान्सूनने हजेरी लावून कृपादृष्टी दाखवल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. यंदाच्या पावसाळ्यात पावसाने हजेरी न लावल्यामुळे येथील बळीराजा चिंतेत होता. त्यातच दुष्काळी परिस्थितीचा सामना येथील नागरिक करीत होते. १६ टँकरने तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू होता. मान्सून पूर्व पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने माणदेशी बळीराजाने खरिपाच्या पेरण्या धूमधडाक्यात केल्या; परंतु नंतर पावसाने डोळे वटारल्यामुळे खरीप हंगामातील पिके पावसावाचून जळून गेली. जिथे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना मात्र वरुणराजाने गत दोन दिवसांपासून परतीच्या मान्सूनच्या पावसाने दुष्काळी जनतेला दिलासा दिल्यामुळे ओढे, नाले, सिमेंट बंधारे तुडुंब भरले आहे. माण नदीला यावर्षी पहिल्यांदाच पाणी आल्याने समाधान व्यक्त होत आहे. यंदा शहरवासीयांनी गणेश विसर्जनाला माण नदी पात्रात पाणी नसल्याने इतरत्र विहिरी व तलावांचा शोध घेऊन पाणी जिथे आहे. तिथे गणेश विसर्जन करावे लागले होते.रविवारी सलग तिसऱ्या दिवशी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरीराजा आनंदित असून, यावर्षीचा खरीप हंगाम वाया गेला तर रब्बी हंगामातील पिके तरी पदरात पडतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)धोम-बलकवडीचा भराव खचलाआदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात आदर्की परिसराला एक तास मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे बंधारे भरून वाहिले, तर आदर्कीच्या ओढ्याला पूर आला. पुराचे पाणी धोम-बलकवडी उजव्या कालव्यात मिसळल्याने कालव्यात पाणी मावले नाही. त्यामुळे कालव्याचा भराव खचला आहे. कापशी-हिंगणगाव, बिबी-कापशी, फलटण-सातारा रस्त्यांच्या फरशी पुलावरून पाणी वाहिल्याने वाहतूक ठप्प झाली. फलटणच्या पश्चिम भागात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम वाया गेला होता. बाजरीची काढणी, मळणी सुरू असतानाच दुपारी दोन ते चार मुसळधार पावसाने हजेरी लावली. आदर्की ओढ्याचे पाणी कालव्यात शिरल्याने मातीच्या भरावावरून तीस फूट वाहून दहा फुटांचा भराव खचला. मात्र मायनर उघडल्याने कालवा फुटण्याचा अनर्थ टळला. मायणी भागात वीजपुरवठा खंडितमायणी : परिसरात रविवारी दुपारी बारा वाजता व सायंकाळी पाच वाजता विजांच्या गडगडासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे मायणी आठवडी बाजारातील व्यापारी, शेतकरी व ग्राहकांची मोठी धांदल उडाली. मायणीसह विखळे, हिवरवाडी, कन्हरवाडी, कानकात्रे, ढोकळवाडी, कलेढोण परिसरात दुपारी बारा वाजल्यापासून विजांच्या गडगडासह सुमारे एक तास जोरदार पाऊस झाला या पावसमुळे परिसरातील ओढे-नाले वाहू लागले तसेच परिसरातील पाझर तलाव, नालाबांध, सिमेंट बंधारे भरून वाहू लागले आहेत. मायणी, कानकात्रे, मुळीकवाडी, पाचवड, विखळे येथील तलावामधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली तेव्हापासून रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता. दुपारी बारा वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत तो सुरळीत झाला नव्हता. आणखी काही दिवस परतीचा मान्सून असाच सुरू राहिल्यास परिसरातील तलाव पूर्ण क्षमतेने भरतील, अशी अशा आहे. (वार्ताहर)