शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

मताधिक्य नव्हे; आता कामच बोलेल!

By admin | Updated: November 11, 2014 00:03 IST

शिवेंद्रसिंहराजे : पोस्टमॉर्टेम न करता नाराजी दूर करेन

सातारा : ‘मी कधीही मताधिक्याची अपेक्षा ठेवून निवडणूक लढवली नाही. जनतेचा कौल मी स्वीकारला आहे. झाले गेले विसरून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी माझ्या परीने कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे ‘साविआ आणि नविआ’ या दोन्ही आघाड्यांतील नगरसेवकांनी निवडणुकीत कोण कमी पडले आणि कोणी मताधिक्य दिले या चर्चेच्या गुऱ्हाळात न अडकता विकासकामांकडे लक्ष द्यावे,’ असा सल्ला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, ‘२००९ च्या निवडणुकीत मला विक्रमी मते मिळाली होती. सातारा शहरात मला यंदा कमी मते मिळाली; मात्र जनतेचा कौल मी मान्य केला असून, शहरातील समस्या सोडवून मी नागरिकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मला मताधिक्य मिळाले नाही. कोणी काम केले, कोणी केले नाही, मला कमी मते मिळाली का जास्त मिळाली यावर कोणी चर्चा करावी, असे मला वाटत नाही. हा विषय आता कालबाह्य झाला असून, या विषयापेक्षा मी कामाला महत्त्व देतो. त्यामुळे दोन्ही आघाड्यांतील नगरसेवकांनी चुका सुधारून जोमाने कामाला लागावे,’ (प्रतिनिधी)विकासासाठी हातभार लावाकोणाकडून काय चुका झाल्या, हे ज्याचे त्याला माहीत आहे. त्यामुळे झालेल्या गोष्टींचे भांडवल करून या चुका सुधारणार आहेत का? याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. माझ्या मताधिक्यासाठी कोण झटलं आणि कोण कमी पडलं या चर्चेत अडकण्यापेक्षा सर्वांनी साताऱ्याच्या विकासासाठी हातभार लावणे गरजेचे आहे.