शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नाही करत मनुवादाचं गुणगाण; वाढविणार आंबेडकरांची शान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 22:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ‘पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमध्ये असलो तरी मी मनुवादींचा समर्थन करत नाही. मी अजिबात करीत नाही मनुवादींचं गुणगान, मला वाढवायची आहे आंबेडकर, अण्णाभाऊंची शान.. ज्या दिवशी दलितांच्या आरक्षणाला धक्का लावला जाईल, त्या दिवशी आम्ही हे सरकार खाली खेचू,’ अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ‘पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमध्ये असलो तरी मी मनुवादींचा समर्थन करत नाही. मी अजिबात करीत नाही मनुवादींचं गुणगान, मला वाढवायची आहे आंबेडकर, अण्णाभाऊंची शान.. ज्या दिवशी दलितांच्या आरक्षणाला धक्का लावला जाईल, त्या दिवशी आम्ही हे सरकार खाली खेचू,’ अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये दलित महासंघाच्या वतीने आयोजित मैत्री परिषदेत ते बोलत होते. यावेळी दलित महासंघाचे संस्थापक प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, ज्येष्ठ नेते किशोर तपासे, पुष्पलता सकटे, विजय यादव, ‘एमआयएम’चे जिल्हाध्यक्ष अल्ताफ शिकलगार, नगरसेविका माया भोसले, अमर गायकवाड, सादिकभाई शेख, रामभाऊ दाभाडे, भीमराव सावदकर, शरद गायकवाड उपस्थित होते.आठवले म्हणाले, ‘भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे. त्याला भाजपने बदलण्याची भूमिका मांडल्यास आम्ही सत्तेत राहणार नाही, त्यातून बाहेर पडू.’प्रा. डॉ. सकटे म्हणाले, ‘दलित महासंघाची ५ जुलै १९९२ मध्ये कोल्हापुरातील बिंदू चौकात स्थापना झाली. या संघाच्या माध्यमातून काम करताना खूप अनुभव आले. आज खºया अर्थाने चळवळ करायची असेल तर बाबासाहेबांच्या सुटाकडे, बुटाकडे न बघता त्यांच्या बोटाकडे बघून चळवळ करावी लागेल.’प्रकाश वायदंडे यांनी प्रास्ताविक केले. जावेद नायकवडी यांनी आभार मानले. कार्यक्रमास दलित महासंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आठवलेंच्या हाती दिली सकटेंनी कुºहाडआजच्या या मैत्री परिषदेत मंत्री रामदास आठवले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत तर करण्यात आलेच. परंतु दलित महासंघाचे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी त्यांना कुºहाड भेट दिली. याची उपस्थितांमध्ये चर्चा होती.पंतप्रधानांचा नकोय ‘सूट’.. हवाय बाबासाहेबांचा ‘बूट’‘आम्हाला नकोय पंतप्रधान मोदी यांचा पंधरा लाखांचा सूट, हवाय डॉ. बाबासाहेबांचा बूट, हे प्रस्थापित करतायेत फाटाफूट, त्यासाठी हवी आहे आपल्यात एकजूट, उघडण्या मनोवाद्यांची मूठ, मैत्रीची हवी आहे एकत्र वज्रमूठ’ अशी कविता प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी मैत्री परिषदेत सादर केली. त्याला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.बहुजन शिक्षक परिवाराचे निवेदनदुर्गम भागांत काम करणाºया शिक्षकांना विशेष भत्ता करावा, प्रशासकीय टक्केवारीनुसार शिक्षकांच्या बदल्या व्हाव्यात, ४५ वयापुढील शिक्षकांना दुर्गम भागात पाठवू नये, दुर्गम भागात शाळांची संख्या वाढवावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन बहुजन शिक्षक परिवाराच्या वतीने प्रवीण लादे यांनी मंत्री आठवले यांना यावेळी दिले.