शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

स्वच्छतागृह नाही; गावं मात्र निर्मल !

By admin | Updated: June 10, 2015 00:31 IST

चाफळ विभागातील स्थिती : ग्रामपंचायत इमारतीतच वानवा

चाफळ : ग्रामस्वच्छता अभियानाचा डंका सर्वत्र वाजवला जात असला तरी हा सारा खटाटोप करत असताना चाफळसह विभागातील अनेक ग्रामपंचायत कार्यालयात अद्यापही शौचालये नसल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाच्या आदेशाची शासकीय लोकांकडूनच पयमल्ली होताना दिसून येत आहे. चाफळ विभागात सुमारे २० ते २२ स्वतंत्र ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी सुमारे ९० ते ९५ टक्के ग्रामपंचायती संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत निर्मल झाल्याची शासन दप्तरी नोंद आहे. त्यांची बक्षिसेही त्या-त्या गावांना मिळालेली आहेत. परंतु, या बक्षिसपात्र बहुतांशी ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतागृहेच नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना उघड्यावर जावे लागत आहे. संपूर्ण गावांना स्वच्छतेचे धडे देणाऱ्या या ग्रामपंचायतींमधून जनतेने काय बोध घ्यायचा? हा संशोधनाचा विषय होऊन बसला आहे. गाव स्वच्छ झाले पाहिजे, हे खरे असले तरी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून अभियानाची खरी सुरूवात होते. त्या ग्रामपंचायत कार्यालयात शौचालय असणे क्रमप्राप्त आहे. चाफळ विभागातील काही ग्रामपंचायती याला अपवाद ठरत असल्या तरी बहुतांशी ग्रामपंचायतींमध्ये लाखो रूपये खर्च करून बांधलेली इमारत आहे; पण त्यामध्ये शौचालय नाही ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. ‘घर तेथे शौचालय’साठी शासनाचे अधिकारी घरोघरी जाऊन प्रबोधन करतात. प्रत्येक कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करतात. त्याच पध्दतीने शासनाचे आदेश असतानाही ग्रामपंचायत तेथे शौचालय बांधण्यास चालढकल का केली जाते; असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर) पदाधिकाऱ्यांचीही अनास्थाविभागातील अनेक गावे निर्मल झाली. परंतू ग्रामपंचायतींची कार्यालये निर्मल कधी होणार? याची चर्चा सुरू आहे. आजही ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांच्या घरी शौचालये नसल्याचे निदर्शनास येत आहे. तर काही कारभारी घरात शौचालय असतानाही उघड्यावर जात असल्याचे चित्र विभागात पहावयास मिळत आहे.