शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

स्वच्छतागृह नाही; गावं मात्र निर्मल !

By admin | Updated: June 10, 2015 00:31 IST

चाफळ विभागातील स्थिती : ग्रामपंचायत इमारतीतच वानवा

चाफळ : ग्रामस्वच्छता अभियानाचा डंका सर्वत्र वाजवला जात असला तरी हा सारा खटाटोप करत असताना चाफळसह विभागातील अनेक ग्रामपंचायत कार्यालयात अद्यापही शौचालये नसल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाच्या आदेशाची शासकीय लोकांकडूनच पयमल्ली होताना दिसून येत आहे. चाफळ विभागात सुमारे २० ते २२ स्वतंत्र ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी सुमारे ९० ते ९५ टक्के ग्रामपंचायती संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत निर्मल झाल्याची शासन दप्तरी नोंद आहे. त्यांची बक्षिसेही त्या-त्या गावांना मिळालेली आहेत. परंतु, या बक्षिसपात्र बहुतांशी ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतागृहेच नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना उघड्यावर जावे लागत आहे. संपूर्ण गावांना स्वच्छतेचे धडे देणाऱ्या या ग्रामपंचायतींमधून जनतेने काय बोध घ्यायचा? हा संशोधनाचा विषय होऊन बसला आहे. गाव स्वच्छ झाले पाहिजे, हे खरे असले तरी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून अभियानाची खरी सुरूवात होते. त्या ग्रामपंचायत कार्यालयात शौचालय असणे क्रमप्राप्त आहे. चाफळ विभागातील काही ग्रामपंचायती याला अपवाद ठरत असल्या तरी बहुतांशी ग्रामपंचायतींमध्ये लाखो रूपये खर्च करून बांधलेली इमारत आहे; पण त्यामध्ये शौचालय नाही ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. ‘घर तेथे शौचालय’साठी शासनाचे अधिकारी घरोघरी जाऊन प्रबोधन करतात. प्रत्येक कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करतात. त्याच पध्दतीने शासनाचे आदेश असतानाही ग्रामपंचायत तेथे शौचालय बांधण्यास चालढकल का केली जाते; असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर) पदाधिकाऱ्यांचीही अनास्थाविभागातील अनेक गावे निर्मल झाली. परंतू ग्रामपंचायतींची कार्यालये निर्मल कधी होणार? याची चर्चा सुरू आहे. आजही ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांच्या घरी शौचालये नसल्याचे निदर्शनास येत आहे. तर काही कारभारी घरात शौचालय असतानाही उघड्यावर जात असल्याचे चित्र विभागात पहावयास मिळत आहे.