शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटीनंतर नियमित झालेल्या १८ ग्रामसेवकांना सुरक्षा ठेव नाही परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:19 IST

सातारा : जिल्ह्यात २००३ पासून ८६४ कंत्राटी ग्रामसेवक नियुक्त झाले असून, तीन वर्षांनी बहुतांशीजण सेवेत नियमित झाले. यामध्ये ...

सातारा : जिल्ह्यात २००३ पासून ८६४ कंत्राटी ग्रामसेवक नियुक्त झाले असून, तीन वर्षांनी बहुतांशीजण सेवेत नियमित झाले. यामध्ये २०१२ पासून शासकीय सेवेत आलेल्यांपैकी २९१ जणांना १० हजारांची सुरक्षा ठेव परत करण्यात आली आहे, तर मागील ५ वर्षांत ९५ पैकी ७७ जणांना दिली असून १८ जणांचे प्रस्ताव नसल्याने त्यांना देण्यात आलेली नाही.

शासकीय सेवेत काही ठिकाणी कंत्राटी नोकरभरती होत असते. तर जिल्हा परिषदेंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक म्हणून रुजू होताना प्रत्येक उमेदवाराकडून दहा हजारांची रक्कम सुरक्षा म्हणून घेण्यात येते. तीन वर्षांनंतर काम पाहून संबंधितांना शासकीय सेवेत नियमित करण्यात येते. कंत्राटी ग्रामसेवक असताना सहा हजार रुपये मानधन आणि ११०० रुपये प्रवास भत्ता देण्यात येतो, तर सेवेत नियमित झाल्यावर शासन नियमानुसार वेतन मिळते.

जिल्ह्यात २००३ पासून आतापर्यंत ८६४ कंत्राटी ग्रामसेवक नियुक्त झाले. त्यामधील ६४७ जणांना नियमित करण्यात आले. तर सेवेत नियमित झाल्यानंतर २०१२ पासून २९१ ग्रामसेवकांना दहा हजारांची सुरक्षा ठेव रक्कम परत करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यात एकूण ग्रामसेवक

७६९

कंत्राटी ग्रामसेवक

१७

चौकट :

९५ ग्रामसेवक नियमित सेवेत समाविष्ट...

मागील पाच वर्षांत ९५ कंत्राटी ग्रामसेवकांना शासकीय सेवेत नियमीत करण्यात आले आहे. २०१६ साली ४४ जण नियमित झाले. तर २०१४ साली १६, २०१८ ला १५ आणि २०१९ ला २० जणांना कंत्राटीपदावरून कायमस्वरुपी ग्रामसेवक म्हणून सेवेत घेण्यात आले. २०२० या वर्षात एकालाही कायम करण्यात आले नाही, तर सुरक्षा ठेव रक्कम परत करताना नियमित सेवेत झालेल्या ग्रामसेवकांनी प्रस्ताव द्यायचा असतो. तो स्थायी समिती सभेत मंजूर झाल्यानंतर आदेश होऊन संबंधितांना पैसे परत केले जातात. पाच वर्षांत ९५ जण नियमित झाले आहेत. त्यातील ७७ जणांना त्यांची सुरक्षा ठेव रक्कम परत करण्यात आलेली आहे.

चौकट :

कंत्राटी ग्रामसेवक म्हणून नियुक्त होताना सुरक्षित ठेव घेतली जाते. तीन वर्षांनंतर कामकाजाची तपासणी होते. त्यानंतर ग्रामसेवक म्हणून शासकीय सेवेत कायम केले जाते. सेवेत आल्यानंतर घेतलेली सुरक्षित रक्कम दिली जाते. हा शासन नियम आहे, असे ग्रामसेवक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

कोट :

शासन नियमाप्रमाणे कंत्राटी ग्रामसेवक म्हणून रुजू होताना सुरक्षा ठेव म्हणून रक्कम जमा करण्यात येते. तीन वर्षांनंतर नियमित झाल्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेने संबंधितांना ही सुरक्षा ठेव रक्कम वेळोवेळी परत करण्यात आलेली आहे.

- अविनाश फडतरे,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)

...........................................................