शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

फोटोसेशन नको, हवाय मदतीचा हात

By admin | Updated: January 8, 2016 00:47 IST

असंवेदनशीलतेचे दर्शन : अपघाताचे चित्रण सोशलमीडियावर ‘पोस्ट’ करण्याचे फॅड

सातारा : सध्याच्या धावपळीच्या युगात माणूस एवढा व्यस्त झाला आहे की, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे सजगतेने पाहायलाही कोणाकडे वेळ नाही. तंत्रज्ञानाच्या या जमान्यात माणूसही यंत्राप्रमाणं भावनाशून्य बनत चालला आहे. माणसाची संवेदनशीलता हरवून गेलीय की काय याचा प्रत्यय रस्त्यावर घडणाऱ्या अपघातावेळी नेहमीच येतो. अपघातातील जखमी रस्त्यावर असह्य वेदनेनं तडफडत असताना त्याला मदत करण्यापेक्षा अपघातग्रस्त वाहनाचे फोटा मोबाईलमध्ये काढण्यात माणसं मश्गुल दिसतात. अशा वेळी मोबाईलमध्ये गुंतलेल्या हातांपेक्षा जखमीला वाचविण्यासाठी मदत करणारे हात पुढे यायला हवेत, अशीच भावना व्यक्त होत आहे.पुणे-राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघात घडतात. कुणी जखमी होतो तर कुणाचा बळी जातो. जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टर सांगतात की, थोडे लवकर आला असता तर कदाचित रुग्ण वाचला असता. अपघातातील जखमीला वेळेवर उपचार मिळणे गरजेचे असते. मात्र पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागेल या भीतीने जमलेल्या गर्दीतून तफडफणाऱ्या जखमीला मदत करण्यास हात पुढे येत नाहीत. जखमींना उचलून रुग्णालयात नेले आणि काही बरेवाईट घडले तर पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागेल. त्यामुळे उगीच अशा फंदात न पडलेले बरे, असाच विचार लोक करतात. पण वेळेत उपचार मिळाल्यास चांगले घडू शकते, याचाही विचार व्हावा. (प्रतिनिधी)सोशलमीडियावर अपघाताचे चित्रणरस्त्यावर अपघात घडल्यानंतर लगेचच बघ्याची गर्दी जमते. मात्र, जखमींना मदत करण्यासाठी सरसावणारा हात एखादाच; पण मोबाईलवर अपघाताचे चित्रण करणारे हातच जास्त पाहायला मिळतात. बुधवारी कृष्णा पुलानजीक झालेल्या अपघातातवेळी हेच पाहायला मिळाले. जो-तो खिशातील मोबाईल काढून अपघातग्रस्त कार, उलटलेला ट्रक, चिरडलेली दुचाकी यांचेच फोटो काढण्यात व्यस्त दिसत होता. चार दिवसांपूर्वी महामार्गावर झालेल्या अपघातात दोन बहिणींना जीव गमवावा लागला. घटना घडल्यानंतर काही वेळातच अपघाताचे फोटो सोशलमिडियावर झळकू लागले. काही तासांनंतर त्या अपघाताची व्हिडिओ क्लिपही दिसू लागली. आजचीजबाबदारीचं भान हवं...काळीज पिळवटून टाकणाऱ्या अशा घटनांचे चित्रण करणं, त्याचे छायाचित्र काढणं आणि ते सोशलमिडियावर प्रसारित करणं, यामागील हेतू ‘माहिती देणं’ हा असला तरी अपघातातील जखमींना मदत करण्याची जबाबदारीही आता स्वीकारायला हवी. माणसानं माणसाची मदत नाही करायची तर कोणाची करायची? केवळ आधुनिकता न मिरविता आपल्यातलं माणूसपण जिवंत ठेवून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, अशी भावना ज्येष्ठ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.