शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
4
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
5
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
6
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
7
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
8
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
9
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
10
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
11
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
12
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
13
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
14
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
15
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
16
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
17
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
18
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
19
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
20
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

फोटोसेशन नको, हवाय मदतीचा हात

By admin | Updated: January 8, 2016 00:47 IST

असंवेदनशीलतेचे दर्शन : अपघाताचे चित्रण सोशलमीडियावर ‘पोस्ट’ करण्याचे फॅड

सातारा : सध्याच्या धावपळीच्या युगात माणूस एवढा व्यस्त झाला आहे की, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे सजगतेने पाहायलाही कोणाकडे वेळ नाही. तंत्रज्ञानाच्या या जमान्यात माणूसही यंत्राप्रमाणं भावनाशून्य बनत चालला आहे. माणसाची संवेदनशीलता हरवून गेलीय की काय याचा प्रत्यय रस्त्यावर घडणाऱ्या अपघातावेळी नेहमीच येतो. अपघातातील जखमी रस्त्यावर असह्य वेदनेनं तडफडत असताना त्याला मदत करण्यापेक्षा अपघातग्रस्त वाहनाचे फोटा मोबाईलमध्ये काढण्यात माणसं मश्गुल दिसतात. अशा वेळी मोबाईलमध्ये गुंतलेल्या हातांपेक्षा जखमीला वाचविण्यासाठी मदत करणारे हात पुढे यायला हवेत, अशीच भावना व्यक्त होत आहे.पुणे-राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघात घडतात. कुणी जखमी होतो तर कुणाचा बळी जातो. जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टर सांगतात की, थोडे लवकर आला असता तर कदाचित रुग्ण वाचला असता. अपघातातील जखमीला वेळेवर उपचार मिळणे गरजेचे असते. मात्र पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागेल या भीतीने जमलेल्या गर्दीतून तफडफणाऱ्या जखमीला मदत करण्यास हात पुढे येत नाहीत. जखमींना उचलून रुग्णालयात नेले आणि काही बरेवाईट घडले तर पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागेल. त्यामुळे उगीच अशा फंदात न पडलेले बरे, असाच विचार लोक करतात. पण वेळेत उपचार मिळाल्यास चांगले घडू शकते, याचाही विचार व्हावा. (प्रतिनिधी)सोशलमीडियावर अपघाताचे चित्रणरस्त्यावर अपघात घडल्यानंतर लगेचच बघ्याची गर्दी जमते. मात्र, जखमींना मदत करण्यासाठी सरसावणारा हात एखादाच; पण मोबाईलवर अपघाताचे चित्रण करणारे हातच जास्त पाहायला मिळतात. बुधवारी कृष्णा पुलानजीक झालेल्या अपघातातवेळी हेच पाहायला मिळाले. जो-तो खिशातील मोबाईल काढून अपघातग्रस्त कार, उलटलेला ट्रक, चिरडलेली दुचाकी यांचेच फोटो काढण्यात व्यस्त दिसत होता. चार दिवसांपूर्वी महामार्गावर झालेल्या अपघातात दोन बहिणींना जीव गमवावा लागला. घटना घडल्यानंतर काही वेळातच अपघाताचे फोटो सोशलमिडियावर झळकू लागले. काही तासांनंतर त्या अपघाताची व्हिडिओ क्लिपही दिसू लागली. आजचीजबाबदारीचं भान हवं...काळीज पिळवटून टाकणाऱ्या अशा घटनांचे चित्रण करणं, त्याचे छायाचित्र काढणं आणि ते सोशलमिडियावर प्रसारित करणं, यामागील हेतू ‘माहिती देणं’ हा असला तरी अपघातातील जखमींना मदत करण्याची जबाबदारीही आता स्वीकारायला हवी. माणसानं माणसाची मदत नाही करायची तर कोणाची करायची? केवळ आधुनिकता न मिरविता आपल्यातलं माणूसपण जिवंत ठेवून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, अशी भावना ज्येष्ठ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.