शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

फोटोसेशन नको, हवाय मदतीचा हात

By admin | Updated: January 8, 2016 00:47 IST

असंवेदनशीलतेचे दर्शन : अपघाताचे चित्रण सोशलमीडियावर ‘पोस्ट’ करण्याचे फॅड

सातारा : सध्याच्या धावपळीच्या युगात माणूस एवढा व्यस्त झाला आहे की, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे सजगतेने पाहायलाही कोणाकडे वेळ नाही. तंत्रज्ञानाच्या या जमान्यात माणूसही यंत्राप्रमाणं भावनाशून्य बनत चालला आहे. माणसाची संवेदनशीलता हरवून गेलीय की काय याचा प्रत्यय रस्त्यावर घडणाऱ्या अपघातावेळी नेहमीच येतो. अपघातातील जखमी रस्त्यावर असह्य वेदनेनं तडफडत असताना त्याला मदत करण्यापेक्षा अपघातग्रस्त वाहनाचे फोटा मोबाईलमध्ये काढण्यात माणसं मश्गुल दिसतात. अशा वेळी मोबाईलमध्ये गुंतलेल्या हातांपेक्षा जखमीला वाचविण्यासाठी मदत करणारे हात पुढे यायला हवेत, अशीच भावना व्यक्त होत आहे.पुणे-राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघात घडतात. कुणी जखमी होतो तर कुणाचा बळी जातो. जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टर सांगतात की, थोडे लवकर आला असता तर कदाचित रुग्ण वाचला असता. अपघातातील जखमीला वेळेवर उपचार मिळणे गरजेचे असते. मात्र पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागेल या भीतीने जमलेल्या गर्दीतून तफडफणाऱ्या जखमीला मदत करण्यास हात पुढे येत नाहीत. जखमींना उचलून रुग्णालयात नेले आणि काही बरेवाईट घडले तर पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागेल. त्यामुळे उगीच अशा फंदात न पडलेले बरे, असाच विचार लोक करतात. पण वेळेत उपचार मिळाल्यास चांगले घडू शकते, याचाही विचार व्हावा. (प्रतिनिधी)सोशलमीडियावर अपघाताचे चित्रणरस्त्यावर अपघात घडल्यानंतर लगेचच बघ्याची गर्दी जमते. मात्र, जखमींना मदत करण्यासाठी सरसावणारा हात एखादाच; पण मोबाईलवर अपघाताचे चित्रण करणारे हातच जास्त पाहायला मिळतात. बुधवारी कृष्णा पुलानजीक झालेल्या अपघातातवेळी हेच पाहायला मिळाले. जो-तो खिशातील मोबाईल काढून अपघातग्रस्त कार, उलटलेला ट्रक, चिरडलेली दुचाकी यांचेच फोटो काढण्यात व्यस्त दिसत होता. चार दिवसांपूर्वी महामार्गावर झालेल्या अपघातात दोन बहिणींना जीव गमवावा लागला. घटना घडल्यानंतर काही वेळातच अपघाताचे फोटो सोशलमिडियावर झळकू लागले. काही तासांनंतर त्या अपघाताची व्हिडिओ क्लिपही दिसू लागली. आजचीजबाबदारीचं भान हवं...काळीज पिळवटून टाकणाऱ्या अशा घटनांचे चित्रण करणं, त्याचे छायाचित्र काढणं आणि ते सोशलमिडियावर प्रसारित करणं, यामागील हेतू ‘माहिती देणं’ हा असला तरी अपघातातील जखमींना मदत करण्याची जबाबदारीही आता स्वीकारायला हवी. माणसानं माणसाची मदत नाही करायची तर कोणाची करायची? केवळ आधुनिकता न मिरविता आपल्यातलं माणूसपण जिवंत ठेवून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, अशी भावना ज्येष्ठ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.