शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

कोसळणाऱ्या दरडीचं कोणालाच नाही दु:ख!

By admin | Updated: August 1, 2014 23:22 IST

पसरणी घाट : प्रवासी तीन तास अडकून पडले; पण मदत पोहोचेना

बावधन : अंगाचा थरकाप उडणाऱ्या माळीण येथील भीषण दुर्घटनेनंतर डोंगर पायथ्याला राहणाऱ्या नागरिकांचा व डोंगर घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांत घाटातून दरड कोसळू लागल्याने वाहनधारक व प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. पसरणी घाटातही गेले काही दिवसांत दोनदा दरड कोसळल्याचे प्रकार घडले आहेत. ही नैसर्गिक आपत्ती असली तरी त्यावर उपाययोजना करण्यास वाईची सार्वजनिक बांधकाम विभाग सपशेल अपशयी ठरल्याचे गुरुवारच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. सुरूर-पोलादपूर राज्य महामार्ग असलेल्या या रस्त्यावर वर्षभर वाहनाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अवघड वळणे असलेल्या पसरणी घाटातून हा रस्ता जातो. घरात एका बाजूला डोंगर कडा तर दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या, अशा अवघड घाटातून प्रवास करणे म्हणजे वाहनधारकाची कसरत होते. सुमारे दहा किलोमीटर घाटात आवश्यक त्या उपाययोजना न झाल्याने यापूर्वी घाटात अनेक अपघात घडले आहेत. २००४ मध्ये तर खासगी बस दरीत कोसळून एकवीसजण ठार झाले होते. यानंतर बांधकाम विभागाने रस्त्यावर रिफ्लेक्टर व संरक्षक कठडे बांधले. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणाव्या तितक्या उपाययोजना न झाल्याचे नंतर घडलेल्या अनेक अपघातावरून स्पष्ट झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यात पसरणी घाटात कुठे ना कुठे दरड कोसळण्याचे प्रकार घडत असतात; परंतु सुदैवाने यामध्ये कसलीही दुर्घटना नसल्याचे बांधकाम विभागाने याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरड कोसळल्यानंतर काही वेळातच या बाबतची कल्पना घाटात अडकलेल्या वाईतील प्रवाशांनी बांधकाम अधिकाऱ्याला दिले होते; परंतु हे कार्यालय साताऱ्यात आल्याचे सांगत माझी माणसे जेसीबी घेऊन घाटात लगेच पाठवतो, असे सांगताच सव्वातीन वाजले होते. यानंतर वारंवार प्रवासी व पोलिसांनी संपर्क साधून तत्काळ जेसीबी पाठविण्याची विनंती केली. काही वेळातच जेसीबी घटनास्थळी पोहोचला तोपर्यंत घाटात अडकून पडलेल्या पर्यटक व स्थानिक प्रवाशांनी संतप्त होत बांधकाम विभागाच्या कारभारावर अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली. अडकून पडलेली शाळकरी मुले अक्षरश: चार-पाच किमी पायी चालत आली. (प्रतिनिधी)बांधकाम विभागासाठी मोठा धडानैसर्गिक आपत्ती कधीही सांगून येत नसली तरी त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना मात्र शक्य तितक्या टाळणे संबंधित यंत्रणेच्या हातात असते. बांधकाम विभागने अगोदरच संभाव्य धोके लक्षात घेऊन खचलेले दगड बाजूला करण्याची आवश्यकता होती. शिवाय वाहतूक ठप्प होऊनही यासाठी घाटात पावसाळ्यात तरी एक जेसीबी सज्ज ठेवण्याची आवश्यकता होती. परंतु यापैकी काहीच काम विभागाचे दिसून आले. यापुढे तरी अधिकाऱ्यांनी घडलेल्या घटनेतून बोध घेऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ अधिकाऱ्यांना येऊ शकते.