शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

यापुढे लोकसभेपुरते नाही तर कायमस्वरुपी मनोमिलन; उदयनराजे भोसले यांची कार्यकर्त्यांना ग्वाही

By दीपक शिंदे | Updated: April 8, 2024 23:04 IST

साताऱ्यात महायुतीचा मेळावा

दीपक देशमुख

सातारा : आजपर्यंत अनेक पंतप्रधानांनी केवळ घोषणाच दिल्या. परंतु, घोषणा देऊन गरिबी हटत नाही तर अंत:करणात तशी इच्छा असावी लागते. पर्याय नसल्याने तब्बल चाळीस वर्षे लोकांनी काँग्रेसला निवडून दिले, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. दरम्यान, यापुढे आमचे मनोमिलन केवळ आमदारकी आणि खासदारकीला नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये मनोमिलन असेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. सातारा येथे अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावर आयोजित महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते.

पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, ‘भाजप’चे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, मनोज घोरपडे, वसंतराव मानकुमरे, ज्ञानदेव रांजणे, चित्रलेखा कदम, सुनील खत्री, सौरभ शिंदे तसेच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले, सुनील काटकर, अशोक माेने, वसंतराव मानकुमरे यांनी मनोमिलनाबाबत मत व्यक्त केले. ते सर्वांच्याच मनातले बोलले. जी अडचण शिवेंद्रसिंहराजेंची, तीच माझीसुद्धा आहे. कार्यकर्त्यांना जपावे लागते. इच्छुक जास्त व पदे कमी असतात. परंतु, यापुढे हे मनोमिलन कायम राहील व त्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा असेल. जिल्ह्याला गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे, असा सर्वांनी निर्धार करावा, असे आवाहन त्यांनी केले.शंभूराज देसाई म्हणाले, २०१९ मध्ये महायुतीला कौल मनोमिलनला असतानाही राज्यात सरकार येऊ शकले नव्हते. ज्यांच्या विरोधात लढलो, त्यांच्यासमवेत सत्ता स्थापन करायची वेळ आली. हे जनतेला पटणार नाही, हे आम्ही परोपरीने पक्षप्रमुखांना सांगितले. ठाकरे सरकार कोविडचे कारण सांगून अडीच वर्षे नुसते बसून होते, असा आरोप देसाई यांनी केला. यावेळी उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी उपमुख्यमंत्री फडणवीस तर वाढदिवशी मुख्यमंत्री शिंदे शुभेच्छा द्यायला येतात. अजित पवार यांचे नाव न घेता दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या तर तुम्हाला कायमच शुभेच्छा असतात, अशी कोपरखळी उदयनराजेंना देसाईंनी मारली.

अन् उदयराजेंना शपथ घ्यायला लावली

उदयनराजे भोसले यांनी मनोमिलनाबाबत वक्तव्य करताच उपस्थितांमधील एका कार्यकर्त्याने ओरडून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तसे सांगा, असे आवाहन केले. त्यानंतर उदयनराजे यांनी तो कार्यकर्ता योग्य तेच सांगतोय, असे सांगत मी मनापासून शपथ घेतोय की, मनोमिलन कायमस्वरुपी असेल. हे मी विसरणार नाही अन् तुम्ही सर्वांनी पक्ष लक्षात ठेवा, असा निश्चय बोलून दाखवला.

मोने, मानकुमरे यांची फटकेबाजी

मेळाव्याच्या प्रारंभी अशोक माेने आणि मानकुमरे यांची भाषणे झाली. मोने यांनी आमदारकी अन् खासदारकी आली की, तुमचे मनोमिलन होते. मग झप्प्या अन् पप्प्या सुरू होतात. एकदा निवडणूक झाली की आम्हाला कोण विचारत नाही. आमच्या वेळी मनोमिलन कोठे जाते, असा सवाल केला करत आम्ही तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आहोत. मनोमिलन कायमस्वरुपी असावे, अशी मागणी केली. वसंतराव मानकुमरे आणि सुनील काटकर यांनीही हीच मागणी केली. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हा धागा पकडून निवडणूक असो वा नसो, मी कधीही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलेले नाही, असे सांगितले.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले