शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

तरी नाही धीर सोेडला... खेळ मांडला !

By admin | Updated: March 3, 2015 00:31 IST

साताऱ्याचा बळीराजा जिगरबाज : अवकाळीपुढं न झुकता उरलं-सुरलं पीक वाचविण्यासाठी ठाकला उभा

सातारा : शेतकऱ्यानं निसर्ग कोपापुढं झुकायचं नसतं. कारण संकटावर मात करून मातीतून सोनं उगविण्याची क्षमता फक्त बळीराजातंच असते... कालच्या अवकाळीनं उद्ध्वस्त केलेल्या शिवाराकडं पाहात प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हीच भावना जिवंत झाल्याचे चित्र आज (सोमवार) सर्वत्र पाहायला मिळाले. कुणी ज्वारीची कणसं खुडून वाळवण टाकलं तर कुणी हळदीला सुकविण्याचा आटापिटा केला. कुणी कांद्याच्या ऐरणी उघड्या केल्या तर कुणी चिखल वाळण्याची प्रतीक्षा केली. आपत्तीसमोर न झुकता बळीराजानं स्वत:ला सावरत पिकाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. निसर्गानं कितीही खेळ मांडला तरी धीर नाही सांडला.. असंच चित्र आज जिकडेतिकडे पाहायला मिळाले. (लोकमत टीम)भिजलेल्या स्ट्रॉबेरीला बल्बची ऊबपाचगणी : परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे स्ट्रॉबेरी पीक पाण्याखाली गेले होते. त्यामुळे फळांचे नुकसान झालेच; पण यातून सावरत शेतकऱ्यांनी ओली झालेली स्ट्रॉबेरी सुकवून त्याची विक्री केली. तोडणीस आलेली फळे पाण्यात गेली तर काही मातीत. पॉलिथीनच्या पेपरमुळे जी स्ट्रॉबेरी वाचली ती एकत्र करून शेतकऱ्यांनी बंदिस्त शेडमध्ये पसरून ठेवली होती. ओली स्ट्रॉबेरी हलक्या हाताने पुसून बल्बच्या प्रकाशात सुकवून ती बॉक्समध्ये भरली जात होती. स्ट्रॉबेरी २२ रुपये किलो!तालुक्यातील भोसे, भिलार, पांगारी, गुरेघर, भोसे, राजपुरी, खिंगर, बोंडारवाडी ,घोटेघर, हरोशी आदी भागात स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले. जी स्ट्रॉबेरी साठ रूपये किलो दराने विकली जात होती, ती भिजल्यामुळे वीस-बावीस रुपये किलोने विकावी लागली. भिजलेली हळद पसरण्यात कुटुंब दंगभुर्इंज : आदल्या दिवशी अश्रू ढाळणाऱ्या शेतकऱ्यांनी गाठलं पुन्हा शिवारभुर्इंज : एक पीक वाया गेलं म्हणून शेतकरी हार माणत नाही. तो नव्या दमाने पुन्हा उभा राहतो, अशाच काही शब्दात आपल्या भावना व्यक्त करुन भिजलेलं रान सावरण्यासाठी भुर्इंज परिसरातील शेतकऱ्यांनी कंबर कसल्याचेच चित्र आज दिवसभरात दिसून आले. विशेषत: हळद या नगदी पिकाचे मोठे नुकसान होऊनही या पिकाला जगवण्यासाठी बळीराजांची दिवसभर धावपळ सुरू होती. भुर्इंज परिसर खरं तर बागायती. तरीही या बागायती परिसरावर पावसाने घाला घातला. उभी पिकं अक्षरश: आडवी झाली. हळदीचे पीक तर काढून झाले होते आणि ते पॉलिश करुन वाळवत ठेवले होते. मात्र पावसामुळे त्या पिकाचेही नुकसान झाले. पावसामुळे हळदीचा रंग, दर्जा, वजन या साऱ्याच दराशी निगडीत असणाऱ्या बाबींना फटका बसला. ज्या हळदीला क्विंटलला १0 हजार रुपये भाव मिळणार होता तेथे आता ७ हजार मिळण्याची अपेक्षा आहे. दत्तात्रय भोसले पाटील यांनी आज कंबर कसून पुन्हा भुईखालून भिजलेली हळद उलटवून पुन्हा वाळवण्यासाठी दिवसभर आटापिटा केला. या कामात त्यांना कुटुंबीयांचेही हातभार लावला. पुन्हा पाऊस पडेल की नाही माहिती नाही. पण तो पडणारच नाही याची खात्री बाळगून त्यांनी हे काम सुरु केले. या नुकसानीने दु:ख झाले पण शेतकऱ्याला दु:ख करण्याचा अधिकार नाही, असे त्यांचे म्हणणे. दरम्यान, पुन्हा कंबर कसून नव्याने खेळ मांडणाऱ्या अशा प्रकारच्या शेतकऱ्यांची आज मांदियाळीच भुर्इंज परिसरात दिसून आली. (वार्ताहर)पूर्वीच्या काळी तर ऐन सुगीत घरात दु:खद घटना घडली तर एकरभरचा मालक दु:ख झाकून सुगी मार्गी लावायचा. त्यामुळे आता का एवढं रडत बसायचं? शेतकऱ्यानं दु:ख करायचं नसतं.- दत्तात्रय भोसले-पाटील, शेतकरीबळीराजाची जिद्द पाहून ऊनही खुदकन हसलंमलकापूर : कोणतीही आपत्ती म्हटलं की पहिल्यांदा शेतकरीच संकटात सापडतो. अशा अनेक संकटांना तोंड देण्याचे सामर्थ्यही केवळ शेतकऱ्यांकडेच आहे. त्यामुळे दोन दिवसांपुर्वी अवकाळी पावसाने नुकसान झाले म्हणून रडत बसण्यापेक्षा सोमवारी ऊन पडताच शेतकरी पुन्हा जोमाने कामाला लागला.मलकापूर येथे आडव्या पडलेल्या शाळूच्या पिकात वाळलेली कणसे शेतकरी खोडत आहेत. चचेगाव येथील गुऱ्हाळावरील कर्मचाऱ्यांनी सोमवारी चिपाडं उन्हात पसरली. संकट ओढावूनही शेतकरी सोमवारी सकाळपासूनच पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले. पावसाने उघडीप दिल्यामुळे ते सकाळीच शेतात पोहोचले. पिकांच्या काढणीचे काम सुरू केले. तर काढून टाकलेल्या ज्वारीची कणसे खोडून कडबा कसा निवाऱ्याला जाईल याची तजवीज सुरू केली. शिजवलेली हळद ऊन पडताच मिळेल त्या ताडपत्रीवर पसरून ती लवकरात लवकर कशी वाळेल, या दृष्टीने शेतकऱ्यांनी हळद उन्हात घातली. त्याचबरोबर गहू दिवसभर वाळवून लागलीच मळणीसाठीही घेतला होता.काशिळ : अवकाळीमुळे काशीळसह परिसरातील वीटभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विटांची माती होऊन चिखलाचे ढीग तयार झाले होते. आज वीट कामगारांचा दिवस माती सुकण्याची वाट पाहण्यात गेला.