शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

तरी नाही धीर सोेडला... खेळ मांडला !

By admin | Updated: March 3, 2015 00:31 IST

साताऱ्याचा बळीराजा जिगरबाज : अवकाळीपुढं न झुकता उरलं-सुरलं पीक वाचविण्यासाठी ठाकला उभा

सातारा : शेतकऱ्यानं निसर्ग कोपापुढं झुकायचं नसतं. कारण संकटावर मात करून मातीतून सोनं उगविण्याची क्षमता फक्त बळीराजातंच असते... कालच्या अवकाळीनं उद्ध्वस्त केलेल्या शिवाराकडं पाहात प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हीच भावना जिवंत झाल्याचे चित्र आज (सोमवार) सर्वत्र पाहायला मिळाले. कुणी ज्वारीची कणसं खुडून वाळवण टाकलं तर कुणी हळदीला सुकविण्याचा आटापिटा केला. कुणी कांद्याच्या ऐरणी उघड्या केल्या तर कुणी चिखल वाळण्याची प्रतीक्षा केली. आपत्तीसमोर न झुकता बळीराजानं स्वत:ला सावरत पिकाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. निसर्गानं कितीही खेळ मांडला तरी धीर नाही सांडला.. असंच चित्र आज जिकडेतिकडे पाहायला मिळाले. (लोकमत टीम)भिजलेल्या स्ट्रॉबेरीला बल्बची ऊबपाचगणी : परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे स्ट्रॉबेरी पीक पाण्याखाली गेले होते. त्यामुळे फळांचे नुकसान झालेच; पण यातून सावरत शेतकऱ्यांनी ओली झालेली स्ट्रॉबेरी सुकवून त्याची विक्री केली. तोडणीस आलेली फळे पाण्यात गेली तर काही मातीत. पॉलिथीनच्या पेपरमुळे जी स्ट्रॉबेरी वाचली ती एकत्र करून शेतकऱ्यांनी बंदिस्त शेडमध्ये पसरून ठेवली होती. ओली स्ट्रॉबेरी हलक्या हाताने पुसून बल्बच्या प्रकाशात सुकवून ती बॉक्समध्ये भरली जात होती. स्ट्रॉबेरी २२ रुपये किलो!तालुक्यातील भोसे, भिलार, पांगारी, गुरेघर, भोसे, राजपुरी, खिंगर, बोंडारवाडी ,घोटेघर, हरोशी आदी भागात स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले. जी स्ट्रॉबेरी साठ रूपये किलो दराने विकली जात होती, ती भिजल्यामुळे वीस-बावीस रुपये किलोने विकावी लागली. भिजलेली हळद पसरण्यात कुटुंब दंगभुर्इंज : आदल्या दिवशी अश्रू ढाळणाऱ्या शेतकऱ्यांनी गाठलं पुन्हा शिवारभुर्इंज : एक पीक वाया गेलं म्हणून शेतकरी हार माणत नाही. तो नव्या दमाने पुन्हा उभा राहतो, अशाच काही शब्दात आपल्या भावना व्यक्त करुन भिजलेलं रान सावरण्यासाठी भुर्इंज परिसरातील शेतकऱ्यांनी कंबर कसल्याचेच चित्र आज दिवसभरात दिसून आले. विशेषत: हळद या नगदी पिकाचे मोठे नुकसान होऊनही या पिकाला जगवण्यासाठी बळीराजांची दिवसभर धावपळ सुरू होती. भुर्इंज परिसर खरं तर बागायती. तरीही या बागायती परिसरावर पावसाने घाला घातला. उभी पिकं अक्षरश: आडवी झाली. हळदीचे पीक तर काढून झाले होते आणि ते पॉलिश करुन वाळवत ठेवले होते. मात्र पावसामुळे त्या पिकाचेही नुकसान झाले. पावसामुळे हळदीचा रंग, दर्जा, वजन या साऱ्याच दराशी निगडीत असणाऱ्या बाबींना फटका बसला. ज्या हळदीला क्विंटलला १0 हजार रुपये भाव मिळणार होता तेथे आता ७ हजार मिळण्याची अपेक्षा आहे. दत्तात्रय भोसले पाटील यांनी आज कंबर कसून पुन्हा भुईखालून भिजलेली हळद उलटवून पुन्हा वाळवण्यासाठी दिवसभर आटापिटा केला. या कामात त्यांना कुटुंबीयांचेही हातभार लावला. पुन्हा पाऊस पडेल की नाही माहिती नाही. पण तो पडणारच नाही याची खात्री बाळगून त्यांनी हे काम सुरु केले. या नुकसानीने दु:ख झाले पण शेतकऱ्याला दु:ख करण्याचा अधिकार नाही, असे त्यांचे म्हणणे. दरम्यान, पुन्हा कंबर कसून नव्याने खेळ मांडणाऱ्या अशा प्रकारच्या शेतकऱ्यांची आज मांदियाळीच भुर्इंज परिसरात दिसून आली. (वार्ताहर)पूर्वीच्या काळी तर ऐन सुगीत घरात दु:खद घटना घडली तर एकरभरचा मालक दु:ख झाकून सुगी मार्गी लावायचा. त्यामुळे आता का एवढं रडत बसायचं? शेतकऱ्यानं दु:ख करायचं नसतं.- दत्तात्रय भोसले-पाटील, शेतकरीबळीराजाची जिद्द पाहून ऊनही खुदकन हसलंमलकापूर : कोणतीही आपत्ती म्हटलं की पहिल्यांदा शेतकरीच संकटात सापडतो. अशा अनेक संकटांना तोंड देण्याचे सामर्थ्यही केवळ शेतकऱ्यांकडेच आहे. त्यामुळे दोन दिवसांपुर्वी अवकाळी पावसाने नुकसान झाले म्हणून रडत बसण्यापेक्षा सोमवारी ऊन पडताच शेतकरी पुन्हा जोमाने कामाला लागला.मलकापूर येथे आडव्या पडलेल्या शाळूच्या पिकात वाळलेली कणसे शेतकरी खोडत आहेत. चचेगाव येथील गुऱ्हाळावरील कर्मचाऱ्यांनी सोमवारी चिपाडं उन्हात पसरली. संकट ओढावूनही शेतकरी सोमवारी सकाळपासूनच पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले. पावसाने उघडीप दिल्यामुळे ते सकाळीच शेतात पोहोचले. पिकांच्या काढणीचे काम सुरू केले. तर काढून टाकलेल्या ज्वारीची कणसे खोडून कडबा कसा निवाऱ्याला जाईल याची तजवीज सुरू केली. शिजवलेली हळद ऊन पडताच मिळेल त्या ताडपत्रीवर पसरून ती लवकरात लवकर कशी वाळेल, या दृष्टीने शेतकऱ्यांनी हळद उन्हात घातली. त्याचबरोबर गहू दिवसभर वाळवून लागलीच मळणीसाठीही घेतला होता.काशिळ : अवकाळीमुळे काशीळसह परिसरातील वीटभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विटांची माती होऊन चिखलाचे ढीग तयार झाले होते. आज वीट कामगारांचा दिवस माती सुकण्याची वाट पाहण्यात गेला.