शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

ना चारा, ना पाणी; दुष्काळी आणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:11 IST

नितीन काळेल। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ना चारा, ना पाणी अशी स्थिती जिल्ह्यातील शेकडो गावांत असतानाच राज्यातील १८० ...

नितीन काळेल।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ना चारा, ना पाणी अशी स्थिती जिल्ह्यातील शेकडो गावांत असतानाच राज्यातील १८० तालुके दुष्काळसदृश्य असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीकरून एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र, या घोषणेमध्ये जिल्ह्यातील खटाव तालुक्याचा समावेश नाही. तर माण, खंडाळा, फलटणमध्ये गंभीरतर कºहाड, कोरेगाव, वाईतमध्यम स्वरुपाची दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.जिल्ह्यात वेळेत हजेरी लावलेल्या पावसाने पश्चिम भाग वगळता पूर्वेकडे कायमच उघडीप दिली. त्यामुळे पूर्व भागातील माण, खटाव, कोरेगावसह इतर तालुक्यांत सद्य:स्थितीत दुष्काळस्थिती गंभीर आहे. आगामी काळात तर जिल्ह्यातील इतर भागातही भीषण स्थिती निर्माण होणार आहे. सध्या पूर्व भागात रब्बीची पेरणी आणि जनावरांचा चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. माणमध्ये आत्तापर्यंत २२८ मिलीमीटर पाऊस झाला असून, हे प्रमाण ५४ टक्के आहे. खटाव तालुक्यात आतापर्यंत ४४२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले असले तरी काही भागात अत्यल्प पाऊस झाला आहे. यामुळे टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. फलटण तालुक्यात आतापर्यंत ६० टक्के पाऊस झाला आहे. कोरेगाव तालुक्यात ३९८ मिलीमीटर पाऊस पडला असून, टक्केवारी ६४ इतकी आहे.जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक तालुके दुष्काळी स्थितीला सामोरे जात असताना काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने सॅटेलाईटने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील खटाव तालुक्याचा समावेश दुष्काळात नव्हता. कोरेगाव, खंडाळा, वाई, कºहाड, फलटण आणि माणचा समावेश होता. त्यावेळी खटावचा समावेश दुष्काळी तालुक्याच्या यादीत नसल्याने जोरदार आरोप झाले होते. आंदोलन करण्यात आले होते. असे असतानाच मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील १८० दुष्काळसदृश्य तालुक्यांची घोषणा केली. यामध्ये खटाव तालुक्याचा समावेश नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. तर जिल्ह्यातीलसहा तालुक्यात दुष्काळसदृश्यस्थिती असल्याचे जाहीर करण्यात आले. यामध्ये माण, फलटणआणि खंडाळामध्ये गंभीर दुष्काळ तर कºहाड, कोरेगाव आणि वाईत मध्यम दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले. खटाव तालुक्याचा दुष्काळसदृश्य तालुक्यात समावेश नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.चारा छावणी का डेपो...मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे दुष्काळी तालुक्यांमध्ये आता उपाययोजना सुरू होतील; पण जनावरांना आताच चारा नाही. पिण्याच्या पाण्याची स्थिती देखील गंभीर होत चालली आहे. जनावरांना वेळेत चारा व पाणी मिळण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करणे गरजेचे आहे. तरच मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला अर्थ राहणार आहे.मकेची वैरण दीड हजारला शेकडा...सध्या पूर्व भागातील खरीप हंगाम संपला आहे. बाजरीची वैरण जनावरे फारसी खात नाहीत. त्यातच पुरेशी ओल नसल्याने रब्बी हंगाम घेणेच अवघड झाले आहे. त्यामुळे सध्या मका काढणी सुरू आहे. या मकेच्या कडब्याचा दर १०० पेंडीला १२०० ते १५०० रुपयांच्या दरम्यान आहे. या कडब्याचा दर पूर्वी ७० रुपयांपर्यंत होता. त्यामध्ये आतापासूनच वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विकत चारा घेऊन जनावरे जगवावी लागत आहेत.