शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नीरा उजवा कालवा बंद; पिके धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क फलटण : फलटण शहर व तालुक्यातील सुमारे ३५ ते ४० गावांच्या पिण्याचे पाणी योजना नीरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

फलटण : फलटण शहर व तालुक्यातील सुमारे ३५ ते ४० गावांच्या पिण्याचे पाणी योजना नीरा उजवा कालव्यावर अवलंबून असून, कालवा बंद झाल्यानंतर १५ दिवसांपेक्षा अधिक काळ या सर्व पाणीपुरवठा योजना कार्यान्वित राहू शकत नाहीत. दि. २१ जून रोजी कालवा बंद झाला असून, दि. ५ ते ६ जुलैला पुन्हा सुरु होणे अपेक्षित असताना कालवा सुरू न झाल्याने तालुक्याच्या बागायती पट्ट्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातही पिण्याच्या पाण्याची ३० टक्के कपात झाली आहे.

फलटण शहर पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावातील पाणीसाठा मर्यादित असून, कालव्यात पाणी सोडले गेले नाही तर पुढील आठवड्यात शहराच्या पाणीपुरवठ्यात आणखी कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या शहरात कालव्यात पाणी नसल्याने ३० टक्के पिण्याच्या पाण्याची कपात केली आहे.

दरम्यान, तरडगाव, साखरवाडी, विडणी, कोळकी वगैरे मोठ्या गावांसह अन्य छोट्या गावांच्या पिण्याच्या पाणी योजना आगामी दोन-तीन दिवसांत अडचणीत येण्याची शक्यता आहे.

कोळकी गावात आताच चार दिवसांतून एक वेळ पाणीपुरवठा केला जात आहे.

नीरा उजवा कालवा विभागाकडे चौकशी केली असता दि. १५ जुलैदरम्यान कालव्यात पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दि. १५ जुलै म्हणजे आणखी आठ-नऊ दिवस कालव्यात पाणी सोडले जाणार नसल्याने तालुक्यातील ३५ ते ४० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या वर्षीच्या हंगामात तुटणारा ऊस, आता तुटलेल्या उसाचा खोडवा, जूनमध्ये झालेल्या उसाच्या लागणीसाठी आणि आता दि. १५ जुलैपासून सुरू होणाऱ्या ऊसलागणीसाठी तसेच चारा व खरिपातील अन्य पिकांसाठी कालव्याच्या पाण्याची तातडीने आवश्यकता असताना कालवा दि. १५ जुलैपर्यंत बंद राहणार असल्याने बागायती पट्ट्यातील शेतकरी धास्तावला आहे.

चौकट..

वीर धरणात सुमारे ५० टक्के पाणी उपलब्ध

फलटण तालुक्यात आत्तापर्यंत अपेक्षित पाऊस न झाल्याने बागायत पट्ट्यातील पेरणी कालव्यात पाणी नसल्याने अडचणीत आली आहे. कालव्यात पाणी आले नाही, मात्र पाऊस जोरात झाला तर उगवण होणाऱ्या आणि झालेल्या पिकांना फायदा होऊ शकतो.

वीर धरणात सुमारे ४५ ते ५० टक्के पाणी उपलब्ध आहे. फलटण तालुक्याच्या वाट्याचे उन्हाळी हंगामाचे पाणी शिल्लक असल्याने नीरा उजवा कालवा विभागाने तातडीने नियोजन करून आगामी एक-दोन दिवसांत नीरा उजवा कालव्याचे पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामपंचायत क्षेत्रातून होत आहे.

०७फलटण

फलटण शहर व तालुक्यातील नीरा उजवा कालवा बंद असल्याने पिके धोक्यात आली आहेत.