शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

नीरा उजवा कालवा बंद; पिके धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क फलटण : फलटण शहर व तालुक्यातील सुमारे ३५ ते ४० गावांच्या पिण्याचे पाणी योजना नीरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

फलटण : फलटण शहर व तालुक्यातील सुमारे ३५ ते ४० गावांच्या पिण्याचे पाणी योजना नीरा उजवा कालव्यावर अवलंबून असून, कालवा बंद झाल्यानंतर १५ दिवसांपेक्षा अधिक काळ या सर्व पाणीपुरवठा योजना कार्यान्वित राहू शकत नाहीत. दि. २१ जून रोजी कालवा बंद झाला असून, दि. ५ ते ६ जुलैला पुन्हा सुरु होणे अपेक्षित असताना कालवा सुरू न झाल्याने तालुक्याच्या बागायती पट्ट्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातही पिण्याच्या पाण्याची ३० टक्के कपात झाली आहे.

फलटण शहर पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावातील पाणीसाठा मर्यादित असून, कालव्यात पाणी सोडले गेले नाही तर पुढील आठवड्यात शहराच्या पाणीपुरवठ्यात आणखी कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या शहरात कालव्यात पाणी नसल्याने ३० टक्के पिण्याच्या पाण्याची कपात केली आहे.

दरम्यान, तरडगाव, साखरवाडी, विडणी, कोळकी वगैरे मोठ्या गावांसह अन्य छोट्या गावांच्या पिण्याच्या पाणी योजना आगामी दोन-तीन दिवसांत अडचणीत येण्याची शक्यता आहे.

कोळकी गावात आताच चार दिवसांतून एक वेळ पाणीपुरवठा केला जात आहे.

नीरा उजवा कालवा विभागाकडे चौकशी केली असता दि. १५ जुलैदरम्यान कालव्यात पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दि. १५ जुलै म्हणजे आणखी आठ-नऊ दिवस कालव्यात पाणी सोडले जाणार नसल्याने तालुक्यातील ३५ ते ४० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या वर्षीच्या हंगामात तुटणारा ऊस, आता तुटलेल्या उसाचा खोडवा, जूनमध्ये झालेल्या उसाच्या लागणीसाठी आणि आता दि. १५ जुलैपासून सुरू होणाऱ्या ऊसलागणीसाठी तसेच चारा व खरिपातील अन्य पिकांसाठी कालव्याच्या पाण्याची तातडीने आवश्यकता असताना कालवा दि. १५ जुलैपर्यंत बंद राहणार असल्याने बागायती पट्ट्यातील शेतकरी धास्तावला आहे.

चौकट..

वीर धरणात सुमारे ५० टक्के पाणी उपलब्ध

फलटण तालुक्यात आत्तापर्यंत अपेक्षित पाऊस न झाल्याने बागायत पट्ट्यातील पेरणी कालव्यात पाणी नसल्याने अडचणीत आली आहे. कालव्यात पाणी आले नाही, मात्र पाऊस जोरात झाला तर उगवण होणाऱ्या आणि झालेल्या पिकांना फायदा होऊ शकतो.

वीर धरणात सुमारे ४५ ते ५० टक्के पाणी उपलब्ध आहे. फलटण तालुक्याच्या वाट्याचे उन्हाळी हंगामाचे पाणी शिल्लक असल्याने नीरा उजवा कालवा विभागाने तातडीने नियोजन करून आगामी एक-दोन दिवसांत नीरा उजवा कालव्याचे पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामपंचायत क्षेत्रातून होत आहे.

०७फलटण

फलटण शहर व तालुक्यातील नीरा उजवा कालवा बंद असल्याने पिके धोक्यात आली आहेत.