शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

बेपत्ता चालकाचा खून केल्याचे निष्पन्न

By admin | Updated: June 24, 2015 00:48 IST

गुड उकलले : वाई तालुक्यात आसलेजवळ ऊसाच्या फडात मृतदेह दिला पेटवून

शिरवळ : ‘गोव्याला फिरायला जायचे आहे,’ असे सांगून भाड्याने घेतलेल्या कारवरील बेपत्ता चालकाचे गुड उकलण्यात शिरवळ पोलिसांना यश आले आहे. कार भाड्याने घेतलेल्या तिघांनी चालकाचा खून करुन मृतदेह वाई तालुक्यातील आसलेजवळ ऊसाच्या फडात पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलासह तिघांना अटक केली आहे.शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील भाऊसाहेब खोमणे यांच्याकडील कार (एमएच १२ केएन ११६५) ही गोव्याला नेण्यासाठी सोमवार, दि. १५ रोजी रात्री आठच्या सुमारास घेऊन गेले होते. त्यावेळेस खोमणे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर गुरुवार, दि. १८ पर्यंत गाडी घेऊन पुन्हा शिरवळला आणण्याचे ठरले. दरम्यान, खोमणे यांनी १५ ते १८ पर्यंत चालक लक्ष्मण आबासाहेब जाधव (वय २६, रा. शिरवळ मुळ रा. उपळाई, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) याच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. यावेळी खोमणे यांनी शनिवार, दि. २० रोजी शिरवळ पोलीस दूरक्षेत्रात चालकाचे अपहरण केल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तपास केला. यातून मोठ्या शिताफीने बावधन येथील विकास अनिल जाधव (२०), विलास लालसिंग गायकवाड (२३) व एका अल्पवयीन मुलाला सोमवारी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना खाक्या दाखविताच संबंधितांनी चालक लक्ष्मण जाधव याला उंब्रज हद्दीत भाड्यावरुन झालेल्या वादावादीतून चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची कबूली दिली. जाधव याच्या मृत्यूची खात्री पटल्यानंतर संबंधितांनी मृतदेह आसलेजवळील एका ऊसाच्या फडात टाकला. (प्रतिनिधी)पथकाला बक्षिस जाहीरया घटनेचा ७२ तासांत तपास लावलेल्या पथकातील पोलीस जवानांच्या कार्याची अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दखल घेतली असून त्यांना बक्षीस देण्याचे घोषित केले आहे.बेपत्ता चालक लक्ष्मण जाधवचा खून प्राथमिक दर्शनी भाड्याच्या वादातून झाल्याचे दिसत असले तरी तपासात त्याला अनेक कांगोरे असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे यात आणखी कोण सामील याचा आहेत, याचा शोध सुरू आहे.