शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

नऊ ते अकरा.. नियम सारे विसरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:36 IST

सातारा : प्रशासनाने संचारबंदीचे नियम कितीही कठोर केले तरी नागरिक व दुकानदारांकडून या नियमांचे सातत्याने उल्लंघन केले जात आहे. ...

सातारा : प्रशासनाने संचारबंदीचे नियम कितीही कठोर केले तरी नागरिक व दुकानदारांकडून या नियमांचे सातत्याने उल्लंघन केले जात आहे. अत्यावश्यक सेवांना सकाळी सात ते अकरा असे वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे या चार तासांत साताऱ्याची बाजारपेठ गर्दीने गजबजून जात आहे. या गर्दीत फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडत असून, ‘नऊ ते अकरा.. नियम सारे विसरा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे राज्य शासनाने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दि. १ मे पर्यंत संचारबंदी लागू केली असून, निर्बंधही कठोर केले आहेत. अत्यावश्यक सेवांवरही वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे सकाळी ७ ते ११ या वेळेत नागरिक किराणा व भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. परंतु साताऱ्यात शासनाने सर्व नियम पायदळी तुडविले जात आहे.

बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडत आहे. किराणा दुकानांच्या बाहेर रांगा लागत आहेत. नागरिक व दुकानदारांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. शहरातील राजवाडा, तांदूळआळी, मार्केट यार्ड व बाजार समितीचा परिसर गर्दीने गजबजून जात आहे. खरेदीच्या नावाखाली विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. एकीकडे जिल्ह्यासह शहरात कोरोनाने थैमान घातले असताना दुसरीकडे नागरिकांचा निष्काळजीपणा कोरोनाचे संक्रमण रोखण्याऐवजी तो वाढविण्यासाठी कारणीभूत ठरू लागला आहे. कारवाई करूनही परिस्थिती ‘जैसे थे’ होत असल्याने आता प्रशासनही हतबल झाले आहे.

(पॉईंटर)

१. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार व नागरिकांकडून पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे.

२. सकाळी ११ वाजता अत्यावश्यक सेवेची दुकाने बंद करण्याचे आदेश असताना काही दुकाने उशिरापर्यंत सुरू ठेवली जात आहेत.

३. शहरातील सर्व अंतर्गत रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची भलतीच त्रेधातिरपीट उडत आहे.

४. हॉटेल चालकांना पार्सल सुविधा पुरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ग्राहकांअभावी शहरातील बहुतांश हॉटेल बंद ठेवण्यात आली आहेत.

फोटो : २५ जावेद खान

संचारबंदीचे नियम पायदळी तुडवून साताऱ्यातील बाजारपेठेत रविवारी सकाळी नागरिकांची खरेदीसाठी अशी गर्दी झाली होती. (छाया : जावेद खान)