शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

४६३५ जागांसाठी साडेनऊ हजारजण निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:02 IST

सातारा : जिल्ह्यातील ८७८ पैकी १२३ ग्रामपंचायतींची पूर्णत:, तर ९८ ची निवडणूक अंशत: बिनिवरोध झाली असून, प्रत्यक्षात ६५४ ...

सातारा : जिल्ह्यातील ८७८ पैकी १२३ ग्रामपंचायतींची पूर्णत:, तर ९८ ची निवडणूक अंशत: बिनिवरोध झाली असून, प्रत्यक्षात ६५४ गावांत १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १८ रोजी उमेदवारांचा फैसला होईल. सध्य:स्थितीत ४६३५ जागांसाठी ९५२१ उमेदवार रिंगणात नशीब घेऊन उतरले आहेत.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या १४९४ आहे. यामधील ८७८ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली. सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे जिल्ह्यातील लढतीचे संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात १२३ ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झालेली आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील सर्वाधिक २१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे, तर पाटणमधील १८, कऱ्हाड १७, माण तालुका १३, जावळी १२, वाई, महाबळेश्वर आणि खटाव तालुक्यांतील प्रत्येकी ९ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तसेच खंडाळा आणि फलटण तालुक्यांतीलही प्रत्येकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. कोरेगावातही तीन ठिकाणी बिनविरोध ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यात अंशत: बिनविरोध ग्रामपंचायतींची संख्या ९८ आहे.

सातारा तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींत निवडणूक...

जिल्ह्यात ८७८ ग्रामपंचायतींची निवडणूक लागलेली. यामधील सर्वाधिक ग्रामपंचायती या सातारा तालुक्यात १३० आहेत. अर्ज माघारनंतर चित्र स्पष्ट झाले. त्यानुसार २१ ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णत:, तर १७ ठिकाणी अंशत: बिनविरोध झाली. दोन ग्रामपंचायतींत अर्ज नाहीत. त्यामुळे ९० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होईल.

जिल्ह्यात २६३१ जण आले बिनविरोध निवडून...

जिल्ह्यात यावेळी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या मोठी आहे. त्यामुळे बिनविरोध झालेले सदस्यही अधिक आहेत. २६३१ जण हे बिनविरोध सदस्य म्हणून निवडून गेले आहेत. यामध्ये सातारा तालुक्यातून सर्वाधिक ४१८, तर पाटण ३६९, जावळीमध्ये ३३९, वाई तालुक्यात २७९ जण बिनविरोध निवडले.

मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पूर्णत: व अंशत: निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता ६५४ ठिकाणी प्रत्यक्षात मतदान होणार आहे. यामध्ये सातारा तालुक्यात ९० ग्रामपंचायतींत रणधुमाळी आहे, तर कऱ्हाड तालुक्यात ८७, पाटणमध्ये ७२, कोरेगाव तालुक्यात ४९, वाई ५७, खंडाळा तालुक्यात ५०, फलटण ७४, माण ४७, खटाव ७७, जावळी तालुक्यात ३७ आणि महाबळेश्वमध्ये १४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक आहे.

जिल्ह्यात निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती

८७८

एकूण प्रभागांची संख्या

२८१३

उमेदवार निवडणूक रिंगणात

९५२१