शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

पुढील हंगामात चार चिमण्या पेटण्याची शाश्वती

By admin | Updated: February 27, 2015 00:20 IST

फलटण तालुक्यात : ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार

आदर्की : फलटण तालुक्याचा पूर्व भाग स्वतंत्रपूर्ण काळात नीरा उजव्या कालव्यामुळे बागायती झाला. तर दक्षिण व पश्चिम भाग स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतर बागायती होऊ लागल्यामुळे औद्योगिक वसाहतीबरोबर न्यू शुगर वर्क्स व श्रीराम साखर कारखाने आहेत. लोकनेते हिंदुराव निंबाळकर साखर कारखाना पूर्णत्वाकडे आहे. कापशी येथील लोकमान्य साखर कारखाना उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे पुढील हंगामात चार चिमण्या पेटणार असल्याने ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार असल्याचे दिसत आहे.फलटण तालुका कायम दुष्काळी असताना फलटणचे मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांनी नीरा उजव्या कालव्यासाठी प्रयत्न करून पूर्व भाग बागायती केल्याने नगदी पिकाबरोबर उसाचे क्षेत्र वाढू लागल्याने फलटण येथे श्रीराम साखर कारखाना सहकारी तत्त्वावर उभारला. त्याबरोबर न्यू शुगर वर्क्स साखरवाडी येथे त्यांनी त्यावेळी सहकार्यातून खासगी कारखाना आपटे उद्योग समूहाने उभा केला.त्यामुळे गुळाची गुऱ्हाळे ही मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे उसाचे गाळप होत होते; परंतु दुष्काळी भागात जलसंधारणाची कामे होऊन छोटी-मोठी धरणे बांधल्याने पाणीसाठा होऊ लागल्यामुळे बागायती क्षेत्रात वाढ होऊन उसाचे क्षेत्र वाढले. त्यामुळे कारखाना पूर्ण क्षमतेने चालवूनही ऊस शिल्लक राहू लागला. त्यानंतर श्रीराम साखर कारखाना आजारी पडल्याने न्यू शुगर वर्क्सवर ऊस गाळपाची क्षमता कमी असल्याने शेजारचे साखर कारखाने ऊस नेत असत. दराची शाश्वती नसायची नंतर श्रीराम साखर कारखाना जवाहर उद्योग करार तत्त्वावर दिल्याने उसाचे गाळप होऊ लागले. परंतु दुष्काळी भागात धोम-बलकवडीचे पाणी बाणगंगेपर्यंत पोहोचल्याने उसाचे क्षेत्र वाढले. त्याबरोबर न्यू शुगर वर्क्सने प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची गाळप क्षमता वाढवली आहे. परंतु श्रीराम कारखान्याची यंत्रणा कासव गतीने सुरू असल्याचे उसाला तुरे आले आहेत. धोम-बलकवडीचे पाणी वेळेत दुष्काळी भागात येत असल्यामुळे उसाची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे.स्वराज्य इंडियाचे संचालक रणजित निंबाळकर यांनी सीतामाईच्या पायथ्याला माण फलटणचे उसाचे कार्यक्षेत्र लक्षात घेऊन उपळवे येथे लोकनेते हिंदुराव नाईक- निंबाळकर यांनी सीतामाईच्या पायथ्याला माण-फलटणचे उसाचे कार्यक्षेत्र लक्षात घेऊन उपळवे येथे लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याची वर्षात उभारणी करून गत महिन्यांत कारखान्याचे बॉयलर पेटवले. चांगला हंगाम घेण्याचा ही त्यांचा मानस आहे. कापशीच्या माळावर लोकमान्य साखर कारखान्याचे भूमिपूजन झाले. काम युद्धपातळीवर सुरू असल्याने फलटण तालुक्यात पुढील हंगामात चार चिमण्या पेटणार असल्याचे ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)