शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

शिक्षणाची आस कधी सोडून नका : नलवडे

By admin | Updated: January 21, 2015 23:53 IST

भुर्इंज येथील पारायण सोहळ्यात उलगडला शैक्षणिक जिद्दीचा प्रवास

भुर्इंज : ‘मला शिकण्याची खूप इच्छा होती. मात्र, वडिलांच्या निधनाने मला जुन्या अकरावीनंतर लग्न करावे लागले. लग्नानंतर शिकायचे होते; पण आमची सून कॉलेजात पाठविणार नाही, असा नातेवाइकांनी आग्रह धरला. पुढे शिक्षण सुरू होण्यासाठी दहा वर्षे गेली. त्या दहा वर्षांनंतर शिक्षणाची संधी मिळताच बीए, एम. ए. एम फील. करून आता लवकरच पीएच. डी. होईन, यातून सांगायचं काय तर शिक्षणाची आस कधी सोडू नका. शेळीसारखं जगू नका, कारण शेळीसारखे जगाल तर बळी जाल. त्यामुळे वाघासारखे जगा,’ असे आवाहन माजी आमदार कांता नलवडे यांनी भुर्इंज येथे केले. येथील ज्ञानेश्वरी पारायण मंडळाच्या वतीने पारायण सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा विकृतांना फक्त फाशीची शिक्षा देऊन उपयोग होणार नाही. शिवरायांनी रांझ्याच्या पाटलाला ज्या पद्धतीने धडा शिकवला, तसेच शासन व्हायला हवे. कारण असे रांझ्याचे पाटील आता गल्लोगल्ली झाले आहेत. यावेळी मुंबई महापालिकेच्या नगरसेविका समिता कांबळे, राजनंदा जाधवराव, नंदकुमार खामकर, पद्माताई भोसले, आदी उपस्थित होते. जयवंत पिसाळ यांनी सूत्रसंचालन केले. भैय्यासाहेब जाधवराव यांनी आभारमानले. (वार्ताहर)विविध क्षेत्रात महिलांना संधीज्येष्ठ कवी नायगावकर म्हणाले, ‘पूर्वीपेक्षा आज स्त्रियांना विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व गाजविण्याची संधी मिळत आहे. हा जो बदल आहे, त्या बदलासाठी महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले यांनी अंगावर दगड आणि शेणाचे गोळे झेलले आहे, ज्योतिबा फुलेंना जिवंतपणी स्वत:ची अंत्ययात्रा पाहावी लागली. लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, अशा अनेकांच्या समाजसुधारणेचे प्रयत्न त्यासाठी कामी आले आहेत. यावेळी अशोक नायगावकर यांनी ठरलेली मानधनाची रक्कम नाकारून ती ज्ञानियांच्या चरणी अर्पण करत असल्याचे सांगितले. मुलांना योग्य वयात योग्य संस्कार मिळणे आवश्यक आहेत, तरच जीवनाची वादळवाट ते यशस्वी चालू शकतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांनी पारायण सोहळ्यात केले.