शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाची आस कधी सोडून नका : नलवडे

By admin | Updated: January 21, 2015 23:53 IST

भुर्इंज येथील पारायण सोहळ्यात उलगडला शैक्षणिक जिद्दीचा प्रवास

भुर्इंज : ‘मला शिकण्याची खूप इच्छा होती. मात्र, वडिलांच्या निधनाने मला जुन्या अकरावीनंतर लग्न करावे लागले. लग्नानंतर शिकायचे होते; पण आमची सून कॉलेजात पाठविणार नाही, असा नातेवाइकांनी आग्रह धरला. पुढे शिक्षण सुरू होण्यासाठी दहा वर्षे गेली. त्या दहा वर्षांनंतर शिक्षणाची संधी मिळताच बीए, एम. ए. एम फील. करून आता लवकरच पीएच. डी. होईन, यातून सांगायचं काय तर शिक्षणाची आस कधी सोडू नका. शेळीसारखं जगू नका, कारण शेळीसारखे जगाल तर बळी जाल. त्यामुळे वाघासारखे जगा,’ असे आवाहन माजी आमदार कांता नलवडे यांनी भुर्इंज येथे केले. येथील ज्ञानेश्वरी पारायण मंडळाच्या वतीने पारायण सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा विकृतांना फक्त फाशीची शिक्षा देऊन उपयोग होणार नाही. शिवरायांनी रांझ्याच्या पाटलाला ज्या पद्धतीने धडा शिकवला, तसेच शासन व्हायला हवे. कारण असे रांझ्याचे पाटील आता गल्लोगल्ली झाले आहेत. यावेळी मुंबई महापालिकेच्या नगरसेविका समिता कांबळे, राजनंदा जाधवराव, नंदकुमार खामकर, पद्माताई भोसले, आदी उपस्थित होते. जयवंत पिसाळ यांनी सूत्रसंचालन केले. भैय्यासाहेब जाधवराव यांनी आभारमानले. (वार्ताहर)विविध क्षेत्रात महिलांना संधीज्येष्ठ कवी नायगावकर म्हणाले, ‘पूर्वीपेक्षा आज स्त्रियांना विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व गाजविण्याची संधी मिळत आहे. हा जो बदल आहे, त्या बदलासाठी महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले यांनी अंगावर दगड आणि शेणाचे गोळे झेलले आहे, ज्योतिबा फुलेंना जिवंतपणी स्वत:ची अंत्ययात्रा पाहावी लागली. लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, अशा अनेकांच्या समाजसुधारणेचे प्रयत्न त्यासाठी कामी आले आहेत. यावेळी अशोक नायगावकर यांनी ठरलेली मानधनाची रक्कम नाकारून ती ज्ञानियांच्या चरणी अर्पण करत असल्याचे सांगितले. मुलांना योग्य वयात योग्य संस्कार मिळणे आवश्यक आहेत, तरच जीवनाची वादळवाट ते यशस्वी चालू शकतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांनी पारायण सोहळ्यात केले.