शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

नेर्ले रात्रीत फिरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:49 IST

वाळवा तालुक्यातील नेर्ले गाव ‘कृष्णे’च्या निवडणुकीत नेहमीच चर्चेत असते. सत्तांत्तरात नेर्ले गावची भूमिका निर्णायक ठरते. सभासदांची भूमिका रात्रीतही ...

वाळवा तालुक्यातील नेर्ले गाव ‘कृष्णे’च्या निवडणुकीत नेहमीच चर्चेत असते. सत्तांत्तरात नेर्ले गावची भूमिका निर्णायक ठरते. सभासदांची भूमिका रात्रीतही बदलू शकते. याचे इंगित भल्याभल्या नेत्यांनाही कळले नाही. ‘नेर्ले, रात्रीत फिरले’ असे म्हटले जात असल्याने पॅनलचे प्रमुख रात्रीच सभासदांच्या गाठीभेटी घेतात.

यशवंतराव मोहिते यांनी सुरुवातीला बंधू जयवंतराव भोसले यांच्या हाती कारखान्याची सत्ता दिली. १९६० मध्ये मोहिते-भोसले यांच्या नातेसंबंधातून नेर्ले गावात भाऊसाहेब पाटील एकमेव पहिले संचालक झाले. या वेळी या परिसरात ४०० सभासद होते. १९६५ च्या दरम्यान येवलेवाडीत जलसिंचन योजना कार्यरत झाली. योजनेमुळे नेर्ल्याचा पूर्व भाग ओलिताखाली आला. त्यानंतर केदारनाथ सोसायटीच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गापलीकडील सर्व शेती ओलिताखाली आली आणि हा परिसर उसाच्या पिकाखाली आला. शेतकरी सधन झाला. त्यानंतर ‘कृष्णे’वर भाऊसाहेब पाटील यांचे पुत्र रवींद्र पाटील यांना स्वीकृत संचालकपद देण्यात आले.

या वेळी कारखान्यात राजकीय संघर्ष नव्हता. १९८९ च्या दरम्यान ज्या पाणीपुरवठा संस्था होत्या, त्यांचे पाणी पाझरून परिसरातील विहिरींना जात होते. ‘कृष्णे’ने त्याचा पाझर कर शेतकऱ्यांवर लावला. शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी या धोरणाविरोधात आंदोलन उभे केले, तेही नेर्ले येथूनच. या आंदोलनाला यशवंतराव मोहिते यांनी साथ देऊन स्वत:च्या भावाची सत्ता उलथवून टाकली. तेव्हापासूनच मोहिते-भोसले वादाचा नारळ नेर्लेतच फुटला. रयत पॅनलचे मदन मोहिते सलग दहा वर्षे अध्यक्ष होते. या कालावधीतच खुले सभासदत्व करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे नेर्लेतील सभासदांची संख्या १४०० च्या घरात गेली. तेव्हापासूनच नेर्लेची भूमिका सत्तांतर करण्यात निर्णायक ठरू लागली.

मदनराव मोहिते यांच्या कारकिर्दीत नेर्लेतील सर्जेराव जनार्दन पाटील संचालक होते. त्यानंतर सहकार पॅनलने सुरेश भोसले यांचे नेतृत्व पुढे आणण्यासाठी नेर्लेची भूमिका महत्त्वाची ठरली आणि भोसले गटाकडून येथून सर्जेराव गुंडा पाटील, पतंगराव पाटील संचालक झाले. एका संचालकाचे निधन झाल्याने महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम यांना संधी दिली गेली. त्यानंतर इंद्रजित मोहिते यांची सत्ता आल्यानंतर या गावात दोघांऐवजी एकालाच म्हणजे चंद्रशेखर पाटील यांना संधी देण्यात आली.

भोसले-मोहिते यांचे मनोमिलन नेर्लेकरांना रुचले नाही. त्यांनी अविनाश मोहिते यांच्या रूपाने संस्थापक पॅनलला कौल दिला. गेल्या निवडणुकीत पुुन्हा ‘सहकार’ला संधी देऊन नेर्लेने ताकद दाखविली. आता सहकार पॅनलने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे नातेवाईक संभाजी पाटील यांना, तर महाडिक गटाचे इंदुमती जाखले यांना उमेदवारी दिली आहे. इंद्रजित मोहिते यांनी प्रशांत पाटील हा एकमेव उमेदवार दिला आहे. अविनाश मोहिते यांनी वसंतराव पाटील आणि सुभाष पाटील यांच्यापैकी एकाला उमेदवारी देण्याचा डाव आखला आहे. या वेळीही नेर्ले कोणाकडे झुकेल, याचा अंदाज तिन्ही नेत्यांच्या प्रमुखांना येत नसल्याने हे नेते रात्रीच्या गाठीभेटीवर भर देत आहेत.

-अशोक पाटील, इस्लामपूर