शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

नीरा-देवघरच्या पाण्यामुळे ओढे खळाळले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : नीरा-देवघर धरणाचे पाणी या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रामध्ये असणाºया खंडाळा तालुक्यातील गावांना पोहोचल्याने खरीपहंगाम वाचला आहे. नीरा-देवघरच्या पाण्याने शिवार पुन्हाएकदा फुलल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यातील ओढ्यांना पाणी वाहू लागले आहे.या वर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिली असल्याने वाघोशी, अंदोरी, कराडवाडी, मोर्वे आदी गावांमध्ये व परिसरांत पिण्याचा व शेती ...

लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : नीरा-देवघर धरणाचे पाणी या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रामध्ये असणाºया खंडाळा तालुक्यातील गावांना पोहोचल्याने खरीपहंगाम वाचला आहे. नीरा-देवघरच्या पाण्याने शिवार पुन्हाएकदा फुलल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यातील ओढ्यांना पाणी वाहू लागले आहे.या वर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिली असल्याने वाघोशी, अंदोरी, कराडवाडी, मोर्वे आदी गावांमध्ये व परिसरांत पिण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता, या भागातील बाजरीचे पीक देखील पाण्याअभावी वाळू लागले होते. त्यामुळे मोर्वेयेथील कालव्यावरील पुलाचे अर्धवट काम पूर्ण करून नीरा-देवघर धरणातील पाणी उजव्या कालव्यातून खंडाळा तालुक्यापर्यंत सोडण्यात आले असून, हे पाणी अंदोरी गावापर्यंत पोहोचले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी तब्बल १७वर्षांनी अंदोरीच्या शिवारात खळाळत आहे.खंडाळा तालुक्यापर्यंत नीरा-देवघरचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी खंडाळा विकास प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेली होती,या मागणीनुसार नीरा-देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोलभट यांनी १५ आॅगस्टपासून पाणी सोडण्याचे नियोजन केले होते.त्यातच नीरा-देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणात मोठा पाणी साठा झाला आहे. त्याबरोबर नीरा-देवघर, भाटघर या धरणामधून मोठ्या प्रमाणावर पाणी वीर धरणात सोडण्यात आल्याने धरण भरले आहे. त्यामुळे वीर धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे, खंडाळा तालुक्यातही पाऊस नसल्याने नीरा-देवघरच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागल्याने नीरा-देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणीसोडण्यात आले असल्याने आता खंडाळा तालुक्यातील वाघोशी, अंदोरी, कराडवाडी, मोर्वे, लोणी, तोंडल, शिवाजीनगर, भादवडे, शेखमिरवाडी, शिरवळ आदी गावांतील शेतकºयांना दुष्काळात दिलासा मिळणार आहे. पाण्याअभावी जळू लागलेल्या पिकांनादेखील जीवनदान मिळणार आहे. अंदोरी मध्ये पाणी दाखल झाल्यावर नीरामाईचे हे पाणी पाहण्यासाठी अंदोरीकरांनी मोठी गर्दी केली होती. पाणी सोडल्याने समाधान व्यक्त होत आहे.