शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-देवघरच्या पाण्यामुळे ओढे खळाळले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : नीरा-देवघर धरणाचे पाणी या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रामध्ये असणाºया खंडाळा तालुक्यातील गावांना पोहोचल्याने खरीपहंगाम वाचला आहे. नीरा-देवघरच्या पाण्याने शिवार पुन्हाएकदा फुलल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यातील ओढ्यांना पाणी वाहू लागले आहे.या वर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिली असल्याने वाघोशी, अंदोरी, कराडवाडी, मोर्वे आदी गावांमध्ये व परिसरांत पिण्याचा व शेती ...

लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : नीरा-देवघर धरणाचे पाणी या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रामध्ये असणाºया खंडाळा तालुक्यातील गावांना पोहोचल्याने खरीपहंगाम वाचला आहे. नीरा-देवघरच्या पाण्याने शिवार पुन्हाएकदा फुलल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यातील ओढ्यांना पाणी वाहू लागले आहे.या वर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिली असल्याने वाघोशी, अंदोरी, कराडवाडी, मोर्वे आदी गावांमध्ये व परिसरांत पिण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता, या भागातील बाजरीचे पीक देखील पाण्याअभावी वाळू लागले होते. त्यामुळे मोर्वेयेथील कालव्यावरील पुलाचे अर्धवट काम पूर्ण करून नीरा-देवघर धरणातील पाणी उजव्या कालव्यातून खंडाळा तालुक्यापर्यंत सोडण्यात आले असून, हे पाणी अंदोरी गावापर्यंत पोहोचले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी तब्बल १७वर्षांनी अंदोरीच्या शिवारात खळाळत आहे.खंडाळा तालुक्यापर्यंत नीरा-देवघरचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी खंडाळा विकास प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेली होती,या मागणीनुसार नीरा-देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोलभट यांनी १५ आॅगस्टपासून पाणी सोडण्याचे नियोजन केले होते.त्यातच नीरा-देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणात मोठा पाणी साठा झाला आहे. त्याबरोबर नीरा-देवघर, भाटघर या धरणामधून मोठ्या प्रमाणावर पाणी वीर धरणात सोडण्यात आल्याने धरण भरले आहे. त्यामुळे वीर धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे, खंडाळा तालुक्यातही पाऊस नसल्याने नीरा-देवघरच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागल्याने नीरा-देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणीसोडण्यात आले असल्याने आता खंडाळा तालुक्यातील वाघोशी, अंदोरी, कराडवाडी, मोर्वे, लोणी, तोंडल, शिवाजीनगर, भादवडे, शेखमिरवाडी, शिरवळ आदी गावांतील शेतकºयांना दुष्काळात दिलासा मिळणार आहे. पाण्याअभावी जळू लागलेल्या पिकांनादेखील जीवनदान मिळणार आहे. अंदोरी मध्ये पाणी दाखल झाल्यावर नीरामाईचे हे पाणी पाहण्यासाठी अंदोरीकरांनी मोठी गर्दी केली होती. पाणी सोडल्याने समाधान व्यक्त होत आहे.