शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

नीरा-देवघरच्या पाण्यामुळे ओढे खळाळले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : नीरा-देवघर धरणाचे पाणी या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रामध्ये असणाºया खंडाळा तालुक्यातील गावांना पोहोचल्याने खरीपहंगाम वाचला आहे. नीरा-देवघरच्या पाण्याने शिवार पुन्हाएकदा फुलल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यातील ओढ्यांना पाणी वाहू लागले आहे.या वर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिली असल्याने वाघोशी, अंदोरी, कराडवाडी, मोर्वे आदी गावांमध्ये व परिसरांत पिण्याचा व शेती ...

लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : नीरा-देवघर धरणाचे पाणी या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रामध्ये असणाºया खंडाळा तालुक्यातील गावांना पोहोचल्याने खरीपहंगाम वाचला आहे. नीरा-देवघरच्या पाण्याने शिवार पुन्हाएकदा फुलल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यातील ओढ्यांना पाणी वाहू लागले आहे.या वर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिली असल्याने वाघोशी, अंदोरी, कराडवाडी, मोर्वे आदी गावांमध्ये व परिसरांत पिण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता, या भागातील बाजरीचे पीक देखील पाण्याअभावी वाळू लागले होते. त्यामुळे मोर्वेयेथील कालव्यावरील पुलाचे अर्धवट काम पूर्ण करून नीरा-देवघर धरणातील पाणी उजव्या कालव्यातून खंडाळा तालुक्यापर्यंत सोडण्यात आले असून, हे पाणी अंदोरी गावापर्यंत पोहोचले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी तब्बल १७वर्षांनी अंदोरीच्या शिवारात खळाळत आहे.खंडाळा तालुक्यापर्यंत नीरा-देवघरचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी खंडाळा विकास प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेली होती,या मागणीनुसार नीरा-देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोलभट यांनी १५ आॅगस्टपासून पाणी सोडण्याचे नियोजन केले होते.त्यातच नीरा-देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणात मोठा पाणी साठा झाला आहे. त्याबरोबर नीरा-देवघर, भाटघर या धरणामधून मोठ्या प्रमाणावर पाणी वीर धरणात सोडण्यात आल्याने धरण भरले आहे. त्यामुळे वीर धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे, खंडाळा तालुक्यातही पाऊस नसल्याने नीरा-देवघरच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागल्याने नीरा-देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणीसोडण्यात आले असल्याने आता खंडाळा तालुक्यातील वाघोशी, अंदोरी, कराडवाडी, मोर्वे, लोणी, तोंडल, शिवाजीनगर, भादवडे, शेखमिरवाडी, शिरवळ आदी गावांतील शेतकºयांना दुष्काळात दिलासा मिळणार आहे. पाण्याअभावी जळू लागलेल्या पिकांनादेखील जीवनदान मिळणार आहे. अंदोरी मध्ये पाणी दाखल झाल्यावर नीरामाईचे हे पाणी पाहण्यासाठी अंदोरीकरांनी मोठी गर्दी केली होती. पाणी सोडल्याने समाधान व्यक्त होत आहे.