शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण काळाची गरज : बागडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:09 IST

वाई : ‘मानवी हस्तक्षेपाचा अतिरेक झाल्याने पर्यावरणाचे अपरिमित नुकसान झाले आहे. याचे अनेक दुष्परिणाम दिसत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी ...

वाई : ‘मानवी हस्तक्षेपाचा अतिरेक झाल्याने पर्यावरणाचे अपरिमित नुकसान झाले आहे. याचे अनेक दुष्परिणाम दिसत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण गरजेचे आहे. तसेच कोरोनाच्या संकटात व नियमित रक्ताची मोठी गरज असते, रक्तदान केल्याने अनेकांना जीवदान मिळत असते. त्यामुळे रक्तदान करणे काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन रोटरी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक बागडे यांनी केले.

सोनजाई डोंगरात आयोजित वृक्षारोपणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जांभूळ, लिंब, सीताफळ, आवळा आदी पन्नास रोपांचे रोपण करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लबच्या सचिव डॉ. प्रेरणा ढोबळे म्हणाल्या, ‘भरमसाठ वृक्षतोडमुळे पर्यावरणाचे संतुलित चक्र तुटले आहे. ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या वृक्षांचे महत्व कोरोना काळात माणसाला कळले आहे. वृक्षारोपणाबरोबर संरक्षण व्हावे म्हणून त्यांची निगाही राखली जात आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण केलेल्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी रोटरी क्लबने घेतली आहे. वाई येथील ममता हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ३६ जणांनी रक्तदान केले. यावेळी स्वाती हेरकळ, डॉ. शंतनु अभ्यंकर, अजित क्षीरसागर, प्रमोद शिंदे, सुनील शिंदे, डॉ. जितेंद्र पाठक, अनुपम गांधी, कुणाल शहा, नीला कुलकर्णी, मदन पोरे, पूरब शहा, संजीवनी कद्दू, डॉ. रूपाली अभ्यंकर, प्रशांत इनामदार, संतोष निकम, प्रमोद चव्हाण, संजीवनी वरखडे, अश्विनी बागडे उपस्थित होते.