शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

आत्मविश्वास वाढविणारी शिक्षणपद्धती आवश्यक

By admin | Updated: January 11, 2016 00:47 IST

शरद पवार : सांगलीत यंगमेन्स एज्युकेशन सोसायटी अमृतमहोत्सव सांगता समारंभात प्रतिपादन

सांगली : पारंपरिक शिक्षण पद्धतीबरोबरच नावीन्यपूर्ण उपक्रम स्वीकारायला हवेत. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढेल अशाप्रकारचे शिक्षण देण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी रविवारी सांगलीतील कार्यक्रमात केले. यंगमेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सवाचा सांगता सोहळ्यावेळी ते बोलत होते.पवार पुढे म्हणाले की, मातृभाषा विस्तार आणि प्रचार महत्त्वाचा असला तरी, जागतिक पातळीवरची भाषाही आता अवगत केली पाहिजे. मातृभाषेकडे दुर्लक्ष करा, असे मी म्हणत नाही. दोन्ही भाषांचे बोट धरून पुढे गेले पाहिजे. इंग्रजीबरोबरच फे्रंच, चायनिज अशा चार-पाच भाषा महत्त्वाच्या बनल्या आहेत. जागतिक पातळीवर जे बदल आता घडताहेत, ते स्वीकारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नवनव्या गोष्टींचा अंगिकार करण्याची तयारी केली पाहिजे. पोषक बदल स्वीकारण्याची मानसिकता तयार केली पाहिजे. बदलांबाबतचे औत्सुक्य तरुणांच्या मनात निर्माण होत आहे. त्यांच्यातील औत्सुक्याला बळ देण्याची गरज आहे स्त्री शिक्षणाविषयी ते म्हणाले की, ज्या देशांच्या प्रगतीत ५0 टक्के महिलांचा हातभार लागला, ते पाश्चिमात्य देशच आज पुढारलेले आहेत. संरक्षणमंत्री म्हणून मी काम करीत असताना हवाई दलात एकही महिला पायलट नव्हती. त्यावेळच्या हवाईदल प्रमुखांना वारंवार मी याचे कारण विचारत होतो. महिलांना हवाई दलात घेता येत नसल्याचे त्यावेळी त्यांनी स्पष्ट केले होते. शेवटी हवाई दलातील भरतीत १८ टक्के महिलांना आरक्षण देण्याचे आदेश मी दिले. प्रत्येकवर्षी यात १0 टक्के वाढीचाही निर्णय घेतला होता. हा निर्णय होण्यापूर्वी हवाई दलातील अपघातांचे प्रमाण अधिक होते. महिलांना हवाई दलात स्थान दिल्यानंतर बऱ्याच वर्षांनी मी हवाईदल प्रमुखांना सध्याच्या अपघातांचे प्रमाण विचारले. तेव्हा हे प्रमाण घटल्याचे दिसून आले. महिलांच्या हवाई दलातील सहभागामुळेच हा सकारात्मक परिणाम दिसून आला.यावेळी जयंत पाटील यांनीही मार्गदर्शन केले. संस्थेच्या अध्यक्षा मेघना कोरे यांनी प्रास्ताविक, तर बापूसाहेब पुजारी यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष हणमंत पवार यांनी आभार मानले. यावेळी राजेंद्र यड्रावकर, उद्योजिका प्रभाताई कुलकर्णी, जयश्रीताई पाटील, लेफ्टनंट कर्नल हेमंत जोशी, सुलभाताई आरवाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पवार म्हणतात : ते उद्योग आपले...महिलांचा सहभाग असलेल्या क्षेत्राची नेहमी प्रगती होते. याचे कारण म्हणजे महिलांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता पुरुषांपेक्षा अधिक असते. भाजी चिरण्यापासून, दूध तापविण्यापर्यंतच्या छोट्या-छोट्या गोष्टीतही त्यांचे लक्ष कधी दुसरीकडे जात नाही. काम सोडून दुसरीकडेच पाहत बसणे, हा उद्योग आम्हा पुरुषांचा आहे, असे मत शरद पवारांनी मांडले. त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांत जोरदार हशा पिकला. प्रॉडक्ट चांगले हवेशाळा, महाविद्यालयांमधून बाहेर पडणारे प्रॉडक्ट चांगले हवे. सामाजिक बदलांना आणि त्यातील सर्व गोष्टींना सामोरे जाण्याची ताकद या पिढीमध्ये निर्माण व्हायला हवी. त्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षण संस्थांची आहे, असे मतही पवारांनी व्यक्त केले.