शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

जिल्हा परिषद रस्त्यावर गतिरोधकची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:36 IST

सातारा : येथील पोवई नाका-कोरेगाव रस्त्यावर जिल्हा परिषदेजवळ गतिरोधक तयार करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. कोरेगाव मार्गावर जिल्हा ...

सातारा : येथील पोवई नाका-कोरेगाव रस्त्यावर जिल्हा परिषदेजवळ गतिरोधक तयार करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

कोरेगाव मार्गावर जिल्हा परिषद आहे. या ठिकाणच्या चौकात चार रस्ते एकत्र येतात. कोरेगाव रस्ता चांगला करण्यात आल्याने वाहने भरधाव जातात. पोवई नाक्याकडून जाताना तर वाहनांना वेग अधिक असतो. अशा वेळी जिल्हा परिषदेत कामासाठी आलेले नागरिक रस्ता ओलांडत असतात. अशा वेळी वाहन भरधाव आल्यास अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधितांनी जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावर गतिरोधक उभारावा, अशी मागणी होत आहे.

....................................................

ग्रामीण भागात कोरोनात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे चिंतेचे वातावरण बनले आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. विशेष करून ग्रामीण भागात अधिक बाधित सापडले आहेत. माण, खटाव, कोरेगाव तालुक्यातील अनेक गावांतही रुग्ण वाढले आहेत. यामुळे प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याचबरोबर, अनेक गावांचे आठवडी बाजारही बंद करण्यात आले आहेत.

..........................................................

पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठ्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा शहरातील पश्चिम भागात कास योजनेतून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. काहींना तर पाणी विकत घेण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.

सातारा शहराच्या पश्चिमेकडील काही भागात कास धरणातून पाणीपुरवठा होतो. बोगदा परिसर, धस कॉलनीसह काही भागात गेल्या दीड महिन्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ लागलाय. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत, तर अपार्टमेंटमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे. परिणामी, पाणी विकत घेऊन पुरविण्याची वेळ आलेली आहे. याबाबत संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.

...................................................

वाहतुकीला व्हॉल्वचा धोका कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे काही ठिकाणचे व्हॉल्व रस्त्यावरच आहेत. त्यामुळे नागरिकांना कायम धोका आहे.

सातारा शहराला विविध योजनांतून पाणीपुरवठा होतो. त्यासाठी शहरात जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणचे व्हॉल्व रस्त्यातच आहेत. त्यामुळे रस्त्याने चालत जाणाऱ्या नागरिकांचा त्यामध्ये पाय पडल्यास दुखापतीचीही शक्यता आहे, तसेच शहरात नवीन येणाऱ्यांना याची कल्पनाही असत नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक बनलेले आहे.

......................................................

साताऱ्यात प्लास्टीक पिशवीचा वापर सुरूच

सातारा : प्लास्टीक पिशवीवर बंदी असली, तरी सातारा शहरात अजूनही याचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. काही विक्रेते पिशवीतूनच फळे, भाजीपाला देताना दिसून येत आहेत.

सातारा शहरातील काही भाजी आणि फळ विक्रेत्यांकडून प्लास्टीक पिशवींचा वापर होत आहे. त्यामुळे प्लास्टीकबंदीचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाने प्लास्टीक पिशवीवर बंदी घातली आहे. सुरुवातीच्या काळात प्लास्टीक पिशवींचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, पण त्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले आहे.

.........................................................

अस्वच्छतेमुळे दुर्गंधी निर्माण

सातारा : सातारा शहरातील शेटे चौकामधील स्वच्छतागृहाशेजारी कचरा, घाण टाकण्यात येत आहे. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. संबंधितांनी या ठिकाणची स्वच्छता वारंवार करावी, अशी मागणी होत आहे. या ठिकाणी परिसरातील काही नागरिक कचरा, घाण आणून टाकतात, तर भटकी कुत्री कचरा विखरून टाकत असतात. कधी-कधी हा कचरा रस्त्यावर येतो. त्यामुळे संबंधितांनी येथील स्वच्छता वारंवार करण्याची गरज आहे.

........................................................