शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद रस्त्यावर गतिरोधकची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:36 IST

सातारा : येथील पोवई नाका-कोरेगाव रस्त्यावर जिल्हा परिषदेजवळ गतिरोधक तयार करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. कोरेगाव मार्गावर जिल्हा ...

सातारा : येथील पोवई नाका-कोरेगाव रस्त्यावर जिल्हा परिषदेजवळ गतिरोधक तयार करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

कोरेगाव मार्गावर जिल्हा परिषद आहे. या ठिकाणच्या चौकात चार रस्ते एकत्र येतात. कोरेगाव रस्ता चांगला करण्यात आल्याने वाहने भरधाव जातात. पोवई नाक्याकडून जाताना तर वाहनांना वेग अधिक असतो. अशा वेळी जिल्हा परिषदेत कामासाठी आलेले नागरिक रस्ता ओलांडत असतात. अशा वेळी वाहन भरधाव आल्यास अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधितांनी जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावर गतिरोधक उभारावा, अशी मागणी होत आहे.

....................................................

ग्रामीण भागात कोरोनात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे चिंतेचे वातावरण बनले आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. विशेष करून ग्रामीण भागात अधिक बाधित सापडले आहेत. माण, खटाव, कोरेगाव तालुक्यातील अनेक गावांतही रुग्ण वाढले आहेत. यामुळे प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याचबरोबर, अनेक गावांचे आठवडी बाजारही बंद करण्यात आले आहेत.

..........................................................

पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठ्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा शहरातील पश्चिम भागात कास योजनेतून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. काहींना तर पाणी विकत घेण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.

सातारा शहराच्या पश्चिमेकडील काही भागात कास धरणातून पाणीपुरवठा होतो. बोगदा परिसर, धस कॉलनीसह काही भागात गेल्या दीड महिन्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ लागलाय. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत, तर अपार्टमेंटमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे. परिणामी, पाणी विकत घेऊन पुरविण्याची वेळ आलेली आहे. याबाबत संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.

...................................................

वाहतुकीला व्हॉल्वचा धोका कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे काही ठिकाणचे व्हॉल्व रस्त्यावरच आहेत. त्यामुळे नागरिकांना कायम धोका आहे.

सातारा शहराला विविध योजनांतून पाणीपुरवठा होतो. त्यासाठी शहरात जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणचे व्हॉल्व रस्त्यातच आहेत. त्यामुळे रस्त्याने चालत जाणाऱ्या नागरिकांचा त्यामध्ये पाय पडल्यास दुखापतीचीही शक्यता आहे, तसेच शहरात नवीन येणाऱ्यांना याची कल्पनाही असत नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक बनलेले आहे.

......................................................

साताऱ्यात प्लास्टीक पिशवीचा वापर सुरूच

सातारा : प्लास्टीक पिशवीवर बंदी असली, तरी सातारा शहरात अजूनही याचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. काही विक्रेते पिशवीतूनच फळे, भाजीपाला देताना दिसून येत आहेत.

सातारा शहरातील काही भाजी आणि फळ विक्रेत्यांकडून प्लास्टीक पिशवींचा वापर होत आहे. त्यामुळे प्लास्टीकबंदीचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाने प्लास्टीक पिशवीवर बंदी घातली आहे. सुरुवातीच्या काळात प्लास्टीक पिशवींचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, पण त्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले आहे.

.........................................................

अस्वच्छतेमुळे दुर्गंधी निर्माण

सातारा : सातारा शहरातील शेटे चौकामधील स्वच्छतागृहाशेजारी कचरा, घाण टाकण्यात येत आहे. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. संबंधितांनी या ठिकाणची स्वच्छता वारंवार करावी, अशी मागणी होत आहे. या ठिकाणी परिसरातील काही नागरिक कचरा, घाण आणून टाकतात, तर भटकी कुत्री कचरा विखरून टाकत असतात. कधी-कधी हा कचरा रस्त्यावर येतो. त्यामुळे संबंधितांनी येथील स्वच्छता वारंवार करण्याची गरज आहे.

........................................................