शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

देशद्रोह्यांविरोधात राजेशाहीची गरज: उदयनराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:44 IST

सायगाव : ‘देशात गुन्हेगार आणि देशद्रोह्यांवर वचक ठेवण्यासाठी लोकशाहीऐवजी राजेशाहीची आवश्यकता आहे. सध्या भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढू लागले. हे लोकशाहीचे ...

सायगाव : ‘देशात गुन्हेगार आणि देशद्रोह्यांवर वचक ठेवण्यासाठी लोकशाहीऐवजी राजेशाहीची आवश्यकता आहे. सध्या भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढू लागले. हे लोकशाहीचे अपयश आहे. समाजातील कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. देशातून दहशतवाद हद्दपार करणे हीच तुकाराम ओंबळेंना श्रद्धांजली ठरेल,’ अशा भावना खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केल्या.जावळी तालुक्यातील केडंबेचे सुपुत्र व मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले सहायक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त केडंबे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तहसीलदार रोहिणी आखाडे-फडतरे, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, माजी शिक्षण सभापती अमित कदम, सुनील काटकर, बाळासाहेब ढेकणे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य एकनाथ ओंबळे, एस. एस. पारटे, पंचायत समिती सदस्य कांताबाई सुतार, शिवसेना शहरप्रमुख निमेश शहा, शिरीष दिवाकर, विजयराव मोकाशी, मोहनराव कासुर्डे, मंडलाधिकारी ए. ए. मेमन, तलाठी ए. एच. मगरे, ग्रामसेवक अमोल गायकवाड, सचिन करंजेकर, रवी चिकणे, सचिन शेलार, भगवान उतेकर, सरपंच वैशाली जंगम, ए. पी. बिडवे, बंडोपंत ओंबळे, चंद्रकांत ओंबळे, नितीन पारटे, अरविंद सोमवंशी उपस्थित होते.उदयनराजे म्हणाले, ‘अजमल कसाबला जिवंत पकडून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्याचे काम केडंबेचे सुपुत्र तुकाराम ओंबळे यांनी केले. तुकाराम ओंबळेंचे हे बलिदान व्यर्थ जाऊ न देता देशातून दहशतवादाला हद्दपार करणे हीच हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना खरी श्रद्धांजली ठरेल.’यावेळी शासनाच्या वतीने तहसीलदार आखाडे, सहायक पोलीस निरीक्षक माने यांनी श्रद्धांजली वाहिली.यावेळी टी. आर. ओंबळे, राजाराम जाधव, बाळासाहेब शिर्के, शैलेंद्र सावंत, आशिष भिलारे, दत्तात्रय दरेकर, नंदू चिकणे, विकास सावंत, गणेश गोळे व वीरगर्जना बहुउद्देशीय संस्था नागेवाडीचे पदाधिकारी परिसरातील गावांमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शंकर जांभळे, चंद्रकांत जाधव यांनी सूत्रसंचालन केले. एकनाथ ओंबळे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र जाधव, रामचंद्र ओंबळे, किरण ओंबळे, विजय ओंबळे, कुणाल ओंबळे, सुनील ओंबळे यांनी परिश्रम घेतले.आजोबांच्या पराक्रमाची गाथा...तुकाराम ओंबळे यांचा नातू स्वानंद ओंबळे याने ओंबळे यांच्या जीवनावर आधारित भाषण केले. यावेळी शिवसेनेच्या वतीने केडंबे शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य भेट व मेढा, सोमर्डी, कुडाळ, केळघर येथील आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.