शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

देशद्रोह्यांविरोधात राजेशाहीची गरज: उदयनराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:44 IST

सायगाव : ‘देशात गुन्हेगार आणि देशद्रोह्यांवर वचक ठेवण्यासाठी लोकशाहीऐवजी राजेशाहीची आवश्यकता आहे. सध्या भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढू लागले. हे लोकशाहीचे ...

सायगाव : ‘देशात गुन्हेगार आणि देशद्रोह्यांवर वचक ठेवण्यासाठी लोकशाहीऐवजी राजेशाहीची आवश्यकता आहे. सध्या भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढू लागले. हे लोकशाहीचे अपयश आहे. समाजातील कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. देशातून दहशतवाद हद्दपार करणे हीच तुकाराम ओंबळेंना श्रद्धांजली ठरेल,’ अशा भावना खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केल्या.जावळी तालुक्यातील केडंबेचे सुपुत्र व मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले सहायक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त केडंबे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तहसीलदार रोहिणी आखाडे-फडतरे, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, माजी शिक्षण सभापती अमित कदम, सुनील काटकर, बाळासाहेब ढेकणे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य एकनाथ ओंबळे, एस. एस. पारटे, पंचायत समिती सदस्य कांताबाई सुतार, शिवसेना शहरप्रमुख निमेश शहा, शिरीष दिवाकर, विजयराव मोकाशी, मोहनराव कासुर्डे, मंडलाधिकारी ए. ए. मेमन, तलाठी ए. एच. मगरे, ग्रामसेवक अमोल गायकवाड, सचिन करंजेकर, रवी चिकणे, सचिन शेलार, भगवान उतेकर, सरपंच वैशाली जंगम, ए. पी. बिडवे, बंडोपंत ओंबळे, चंद्रकांत ओंबळे, नितीन पारटे, अरविंद सोमवंशी उपस्थित होते.उदयनराजे म्हणाले, ‘अजमल कसाबला जिवंत पकडून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्याचे काम केडंबेचे सुपुत्र तुकाराम ओंबळे यांनी केले. तुकाराम ओंबळेंचे हे बलिदान व्यर्थ जाऊ न देता देशातून दहशतवादाला हद्दपार करणे हीच हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना खरी श्रद्धांजली ठरेल.’यावेळी शासनाच्या वतीने तहसीलदार आखाडे, सहायक पोलीस निरीक्षक माने यांनी श्रद्धांजली वाहिली.यावेळी टी. आर. ओंबळे, राजाराम जाधव, बाळासाहेब शिर्के, शैलेंद्र सावंत, आशिष भिलारे, दत्तात्रय दरेकर, नंदू चिकणे, विकास सावंत, गणेश गोळे व वीरगर्जना बहुउद्देशीय संस्था नागेवाडीचे पदाधिकारी परिसरातील गावांमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शंकर जांभळे, चंद्रकांत जाधव यांनी सूत्रसंचालन केले. एकनाथ ओंबळे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र जाधव, रामचंद्र ओंबळे, किरण ओंबळे, विजय ओंबळे, कुणाल ओंबळे, सुनील ओंबळे यांनी परिश्रम घेतले.आजोबांच्या पराक्रमाची गाथा...तुकाराम ओंबळे यांचा नातू स्वानंद ओंबळे याने ओंबळे यांच्या जीवनावर आधारित भाषण केले. यावेळी शिवसेनेच्या वतीने केडंबे शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य भेट व मेढा, सोमर्डी, कुडाळ, केळघर येथील आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.