शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृतीसाठी साहित्य संमेलनाची गरज : चव्हाण

By admin | Updated: November 29, 2015 00:50 IST

सोळशीत साहित्यिकांची मांदियाळी : साहित्य व नाटक संमेलनासाठी निधी मिळावा; संमेलनाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांची मागणी

वाठारस्टेशन : ‘ज्या देशात नैसर्गिक साधन संपत्तीचा अभाव असतो, तेथे बौद्धिक संपदा देशाच्या विकासासाठी महत्त्वाची असते, अशी बौद्धिक संपदा ही निर्माण करण्यासाठी संस्कृती कलेल्या विकासातून वाढीस लागते. सोळशीसारख्या डोंगरकपारीच्या भागात भरणारी अशी राज्यस्तरीय साहित्य संमेलने संस्कृती टिकविण्यासाठी गरजेची आहेत,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. सोळशी, ता. कोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले हे होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, शनैश्वर देवस्थानचे मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज, धारेश्वर महाराज, आ. आनंदराव पाटील, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, मराठी विश्व सािहत्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे, संमेलन स्वागताध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, राजूशेठ लोढा, माजी आमदार सतीश देशमुख, छत्रपती संभाजी पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदे यांच्याकडे संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द करण्यात आली व ‘वसनातीर’ या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. चव्हाण म्हणाले, ‘साहित्यात राजकारणी आले की काही मुद्दे उपस्थित होतात; मात्र ग्रामीण भागात होणारे हे साहित्यसंमेलन त्याला अपवाद आहे. तसे पाहता देशाचा विकास भौतिक मोजमापावर होतो; मात्र समाजाचा विकास तिथल्या सांस्कृतिक मापदंडावर आधारित असतो. त्यामुळे संस्कृती टिकवणे गरजेचे आहे. साहित्यात मराठी, इंग्रजी असा भाषिक वाद नेहमीच होत असतो. इंग्रजीला विरोध अनेक वर्षांपासून आहे. आम्ही शाळेत असताना इंग्रजीविरोधी धोरण शासनाने राबविले व आठवीनंतर इंग्रजी विषय सुरू केला त्याचा फटका माझ्यासह तीन पिढ्यांना बसला. त्यामुळे आज केंद्रात असलेल्या १५० सचिवांमध्ये एकही मराठी अधिकारी दिसत नाहीत. त्यामुळे संस्कृती टिकविण्यासाठी मराठी बरोबरच ज्ञानगंगा म्हणून इंग्रजी आवश्यक आहे.’ संमेलनाचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे म्हणाले, ‘मी साहित्यिक म्हणून घडण्यात गावसंस्कृतीने शब्द व साहित्य दिले. तेथील माणसं वाचली, निसर्ग जवळून पाहिला यातून साहित्यिक म्हणून घडलो. साहित्य वैभव निर्माण करायचे असेल तर युवकांनी, मुलांनी लिहितं झालं पाहिजे. शेतकऱ्यांच्या वेदना, दुष्काळाच्या झळा शब्दातून मांडल्या पाहिजेत. शासनाने यासाठी अशी साहित्य संमेलने गावोगावी भरवावीत.’ अशा संमेलनांना २५ लाखांचा निधी द्यावा. तर गाव तिथे वाचनालये सुरू करावीत. नाटक हा साहित्याच अविभाज्य भाग आहे. गावागावात नाट्यमंडळं निर्माण झाली पाहिजेत. यासाठी १५ लाख अनुदान देण्यात यावे.’ कार्यक्रमाचे अध्यक्ष मदन भोसले, मठाधिपती नंदगिरी महाराज, स्वागताध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. शनैश्वर सेवेकरी मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक कदम यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)