शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

विकासाबरोबर जनतेसोबत समन्वयाची गरज : गोडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:43 IST

वडूज : ‘विकास ही न थांबणारी प्रक्रिया आहे. लोकांची मागणी व निधीची उपलब्धता याचा ताळमेळ घालून विकासकामे होत असतात. ...

वडूज : ‘विकास ही न थांबणारी प्रक्रिया आहे. लोकांची मागणी व निधीची उपलब्धता याचा ताळमेळ घालून विकासकामे होत असतात. मात्र भौतिक विकास होत असताना गावोगावचे कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेमध्ये समन्वय राहणे ही काळाची गरज आहे,’ असे मत नियोजन समितीचे सदस्य अशोकराव गोडसे यांनी व्यक्त केले.

येथील पंचायत समिती सभागृहात गोडसे यांच्यासह विसापूरचे माजी सरपंच, राष्ट्रवादीचे नेते सागरभाऊ साळुंखे यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी, तर वडूजचे माजी सरपंच अनिल गोडसे यांची पुणे विभाग शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल येरळवाडी येथील लोकेशन ग्रुप व धनंजय चव्हाण मित्रमंडळाच्यावतीने सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी सहायक गटविकास अधिकारी भरत चौगुले, पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण, माजी उपसभापती संतोष साळुंखे, ृॅड. रोहन जाधव, डॉ. संतोष देशमुख, विनायक ठिगळे, अॅड. किसन खामकर, शिवाजी साबळे, संतोष दुबळे, शारदा भस्मे, शबाना मुल्ला, राणी शिंदे, सुरेखा शिंदे उपस्थित होत्या.

गोडसे म्हणाले, ‘जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सत्कार होणे ही अत्यंत समाधानाची बाब आहे. पदाच्या माध्यमातून भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.’

सागर साळुंखे म्हणाले, ‘प्रस्थापितांविरोधात मोठा संघर्ष करत सर्वसामान्यांची कामे केल्यामुळेच आपणाला इथपर्यंत पोहोचता आले. पदाच्या माध्यमातून चव्हाण मित्रमंडळ व लोकेशन ग्रुपला चांगले पाठबळ दिले जाईल.’

यावेळी अनिल गोडसे, संतोष साळुंखे, चौगुले यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास वरुडचे माजी सरपंच लालासाहेब माने, सोमनाथ साठे, प्रा. दिलीप भुजबळ, मोहन बागल, बाळू इनामदार, बाळासाहेब जगदाळे, गणपतराव खाडे, योगिता काळे उपस्थित होते. धनाजी शिवाजी चव्हाण यांनी स्वागत केले. धनंजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. आयाज मुल्ला यांनी आभार मानले.