शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

गतिरोधकाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST

कऱ्हाड : कऱ्हाड - ढेबेवाडी रस्त्यावरील आगाशिवनगर परिसरात सतत रहदारी असते. त्यामुळे मार्गावर जिथे दुभाजक आहेत, त्याठिकाणी गतिरोधक लावावेत, ...

कऱ्हाड : कऱ्हाड - ढेबेवाडी रस्त्यावरील आगाशिवनगर परिसरात सतत रहदारी असते. त्यामुळे मार्गावर जिथे दुभाजक आहेत, त्याठिकाणी गतिरोधक लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गतिरोधक नसल्यामुळे अनेक वाहने भरधाव वेगाने धावत असतात. यामुळे नेहमी अपघात होत असतात.

स्वच्छतागृहांची वानवा

कऱ्हाड : येथील कृष्णा नाक्यापासून कृष्णा पुलापर्यंत कोठेही स्वच्छतागृह नाही. त्यामुळे या परिसरातील व्यावसायिक, विक्रेते आणि नागरिकांची गैरसोय होत आहे. या परिसरात स्वच्छतागृह उभारावे, अशी मागणी वारंवार पालिकेत करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सफाईचा फज्जा

कऱ्हाड : उपमार्गालगत असलेल्या नाल्यांच्या सफाईचा फज्जा उडाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे, तर काही ठिकाणी पाण्याबरोबर वाहात आलेले कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे महामार्ग देखभाल विभागाने नेमके कोणते काम केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रस्त्याची दुरावस्था (फोटो : ०५इन्फोबॉक्स०२)

मसूर : मसूर ते रेल्वेस्टेशन मार्गावरील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. रस्त्यावर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, रस्ता खचला आहे. विद्यार्थी व ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.