शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘जरंडेश्वर’च्या संघर्षासाठी ‘महायुती’कडून उभारणे गरजेचे

By admin | Updated: August 11, 2014 00:14 IST

कोरेगाव : शालिनीताई पाटील यांनी काढले मुंबईतून पत्रक

सातारा : ‘वयाच्या मानाने सार्वजनिक आणि राजकीय जीवनाचा व्याप कमी करण्याचा माझा विचार होता. परंतु जरंडेश्वर साखर कारखान्याला न्याय मिळवून देईपर्यंत एकदा तरी आमदार होऊन संघर्ष करावा, असा आग्रह अनेक कार्यकर्त्यांनी केला आहे. अशा परिस्थितीत महायुतीकडून तिकीट मिळाल्यास मी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभारण्यास इच्छुक आहे,’ अशा आशयाचे पत्रक डॉ. शालिनीताई पाटील यांनी मुंबईतून प्रसिद्धीस दिले आहे. आपण यंदा विधानसभेस इच्छुक आहोत, असे स्पष्ट संकेत देणाऱ्या या पत्रकात शालिनीताई म्हणतात, ‘मी १९५० पासून सुमारे ५० वर्षे सक्रिय राजकारणात आहे. यादरम्यान सांगली जिल्ह्यातून दोन वेळा विधानसभेवर निवडून आले आणि मंत्रीही झाले. लोकसभेलाही एकदा निवडून आले होते. माझ्याकडे जे-जे पद होते, त्या पदावरून मी उत्तम काम केले आहे. १९८० मध्ये मी सातारा लोकसभा मतदारसंघातून तत्कालीन उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधात उभी राहिले. त्यावेळी कोरेगाव तालुक्यात सहकारी साखर कारखाना काढण्याचे आश्वासन दिले होते. सर्व प्रकारच्या अडचणी येऊनसुद्धा सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयापर्यंत संघर्ष करून साखर कारखान्याला परवाना प्राप्त करून घेतला. कोरेगाव-खटाव तालुक्यातील २७ हजार शेतकरी कारखान्याचे सभासद झाले.१९९८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कारखान्याच्या प्रक्रिया गळीत हंगामाचा शुभारंभ केला. त्यानंतर पुढे दहा हंगाम बऱ्यापैकी घेतले. एक-दोन हंगाम सोडून द्यावे लागले. कारण राज्यात दुष्काळी परिस्थिती होती. २०१० मध्ये राज्य सहकारी बँकेने कारखान्याचे कर्ज थकल्याचे निमित्त करून यंत्रसामग्रीचा लिलाव केला. आमच्या कारखान्याला राज्य सरकारकडून १२ कोटी रुपये भागभांडवल मिळाले आहे. अशा कारखान्याची विक्री करताना नियमाप्रमाणे राज्य बँकेने राज्य सरकारला विचारणे गरजेचे होते. परंतु बँकेने सरकारला न विचारताच विक्री व्यवहार करून टाकला. त्यानंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सहकारमंत्र्यांची भेट घेतली. परंतु आताचे सहकारमंत्री पवार कुटुंबाला घाबरतात. त्यामुळे भेटीसाठी गेलेल्या लोकांना त्यांनी सांगितले की, मी शालिनीतार्इंना नियमाप्रमाणे जरी मदत केली तरी पवार कुटुंबीय माझ्या निवडणुकीत माझा पराभव करतील. म्हणूनच मी जरंडेश्वर कारखान्याला मदत करू शकत नाही. त्यामुळेच सहकारी मालकीच्या शंभर कोटींच्या प्रकल्पासाठी अखेरचा लढा द्यावाच लागेल आणि त्या संघर्षासाठी महायुतीकडून निवडणूक लढवावीच लागेल,’ असे शालिनीतार्इंनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)