शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

राज्यघटनेतील उणिवा दुरुस्त करणे गरजेचे

By admin | Updated: December 19, 2014 00:23 IST

धैर्यशील पाटील यांचे प्रतिपादन

सातारा : ‘भारतीय राज्यघटनेतील उणिवा दुरुस्त न करता आल्यामुळे आज सामान्य माणसाची दुरवस्था पाहावयास मिळते. या सर्व परिस्थितीचा तरुणांनी अभ्यास करून पुढची वाटचाल करावी. तरच भविष्यकाळ सुकर होऊ शकेल,’ असे प्रतिपादन अ‍ॅड. धैर्यशील पाटील यांनी केले.रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील उपस्थित होते. याप्रसंगी रायगड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना रयत शिक्षण संस्थेच्या वतीने ‘ईस्माईलसाहेब मुल्ला आदर्श रयत सेवक पुरस्कार २०१४’ देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, ‘समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे, हा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा दृष्टिकोन होता. त्यासाठी समाजातून हजारो हात पुढे आले. मुल्लासाहेब हे त्यातील बिनीचे शिलेदार होते. भारतीय स्वातंत्र्याचा लढा सुरू असताना वेगवेगळ्या शक्ती, वेगवेगळ्या हेतूने स्वातंत्र लढ्यात सहभागी झाल्या होत्या. मात्र, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही आज विकासाच्या नावावर सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जात आहेत. हा भांडवलदार वर्गाचा डाव आहे, हे तरुणांनी लक्षात घ्यावे.यावेळी प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, अ‍ॅड. दिलावर मुल्ला, प्रभारी प्राचार्या डॉ. सुजाता पवार, प्रा. फातिमा मुजावर, डॉ. शिवलिंग मेनकुदळे, प्रा. सी. डी. जडगे, सहसचिव प्राचार्य डॉ. डी. डी. पाटील, अ‍ॅड. के. व्ही. पाटील, प्राचार्य आर. डी. गायकवाड, एच. वाय. पाटील, प्राचार्य आर. के. शिंदे, प्राचार्य सायनाकर, प्रा. अजित पाटील, यांच्यासह रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकवर्ग, विद्यार्थी, पालक, उपस्थित होते. (प्रतिनिधी)