शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

वारी आली जवळ; तरीही चौकीला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:57 IST

वाठार स्टेशन : लोणंद राज्यमार्गावरील सालपे घाट तसेच फलटण मार्गावरील आदर्की घाट यांच्या घाटमाथ्यावर असलेली पोलीस चौकी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ही चौकी स्थापन केल्यानंतर अनेक वर्षे घाट रस्त्यातील लुटमारीच्या घटना कमी झाले होत्या. मात्र, जस जसे अधिकारी बदलत गेले तशी या चौकीची दुरवस्था वाढत गेली. यासाठी आता ही चौकी ...

वाठार स्टेशन : लोणंद राज्यमार्गावरील सालपे घाट तसेच फलटण मार्गावरील आदर्की घाट यांच्या घाटमाथ्यावर असलेली पोलीस चौकी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ही चौकी स्थापन केल्यानंतर अनेक वर्षे घाट रस्त्यातील लुटमारीच्या घटना कमी झाले होत्या. मात्र, जस जसे अधिकारी बदलत गेले तशी या चौकीची दुरवस्था वाढत गेली. यासाठी आता ही चौकी कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातून होऊ लागली आहे.लोणंद मुक्कामी येणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी आगमनाची प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. या मार्गावरील वाठार पोलीस मात्र अजून झोपेत आहेत. या घाट रस्त्यावरील तडवळे गाव हद्दीतील आदर्की फाटा पोलीस चौकी गेली वर्षभरापासून आजही बंद आहे. वर्षातून केवळ एक दिवस उघडली जाणारी ही चौकी किमान पालखी सोहळ्यात तरी सुरू राहावी, अशी मागणी या परिसरातील प्रवासी व ग्रामस्थांतून होत आहे.कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील ४७ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या वाठार पोलीस ठाणे हद्दीत सध्या सर्वप्रकारच्या अवैध व्यवसायांचा विळखा पडला आहे. नवा राजा नवा कायदा, या म्हणीप्रमाणे काही दिवसांपूर्वीच या पोलीस ठाण्याला नवा कारभारी मिळाला असला तरी हे कारभारी गेल्या पंधारा दिवसांपासून स्वागत समारंभातच व्यस्त आहेत. लोणंद पालखी सोहळ्यादरम्यान सातारा-लोणंद राज्यमार्गावरील वाठार पोलिसांच्या अखत्यारित असलेली आदर्की फाटा पोलीस चौकी अजूनही बंदच आहे. दोन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या पालखी सोहळ्यापूर्वी तरी ही चौकी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.वाळू तस्करांच्या मारहाणीची नोंदच नाहीही चौकी वर्षातून केवळ एक ते दोन दिवसच म्हणजे पालखी आगमनादरम्यान उघडली जात असल्याने आजपर्यंत अनेक प्रवाशांना लुटमारीच्या घटनांना नेहमीच सामोरे जावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी याच चौकीच्या बाजूला तडवळे, ता. कोरेगाव येथील एका युवकाला वाळू तस्करांनी बेदम मारहाण केली. मात्र याची नोंद घेणंही या पोलिसांना उचित वाटले नाही. ही चौकी सुरू असती तर किमान अशा घटनांना आळा बसण्यास मदत झाली असती.