शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

राष्ट्रवादीची प्रतिष्ठा तर काँग्रेसचे अस्तित्व पणाला

By admin | Updated: November 16, 2016 23:14 IST

मोहनराव कदम यांच्यासाठी समविचारी एकत्र

सातारा : विधानपरिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे उमेदवार शेखर गोरे यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची फळी जोरदार कामाला लागली आहे. काँगे्रसतर्फे नात्या-गोत्यांचे गणित मांडले गेले तरी पक्षाची भूमिका महत्त्वाची असे स्पष्ट करत राष्ट्रवादीचे सर्वच आमदार मते फुटू नयेत, याची मोठी काळजी घेताना पाहायला मिळत आहेत. जिल्ह्याच्या राजकारणावर असलेली राष्ट्रवादीची पकड ढिली न होऊ देता, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणाऱ्या ताकदीच्या बळावर राष्ट्रवादीने काँगे्रसपुढे आव्हान उभे केले आहे. म्हसवड, पाचगणी पालिका व मलकापूर नगरपंचायत वगळता सातारा, वाई, फलटण, कऱ्हाड, महाबळेश्वर, रहिमतपूर या पालिकांत तसेच लोणंद नगरपंचायतीत पालिकेची सत्ता आहे. या सर्वच पालिकांमध्ये काँगे्रसचे बळ राष्ट्रवादीच्या तुलनेत कमी आहे. जिल्हा परिषदेतही ६७ पैकी ३७ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यावरच राष्ट्रवादीची मदार असून या नेत्यांच्या ताब्यातच बहुतांश सत्तास्थाने असल्याने त्यांनी मते फुटू नयेत, याची विशेष काळजी घेतल्याचे चित्र सध्या आहे. या मतदारसंघासाठी जिल्ह्यात ३0४ मतदार आहेत. यापैकी बहुतांश मतदान खेचण्यासाठी शेखर गोरे यांनी ‘व्यूव्हरचना’ आखली आहे. (प्रतिनिधी)

मोहनराव कदम यांच्यासाठी समविचारी एकत्रसातारा : सांगली-सातारा विधानपरिषदेचे कॉग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांच्या प्रचाराच्या निमित्ताने जिल्ह्यातील काँग्रेस एकवटली आहे. जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिला असून प्रचाराच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यावेळी मोहनराव कदम यांना जिल्ह्यातून मताधिक्य देण्याचा निर्धार काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.डॉ. पतगंराव कदम आणि मोहनराव कदम यांनी नेहमीच पक्षाची कवाडे बाजूला ठेवून शैक्षणीक व सामाजिक क्षेत्रात सर्वपक्षीय नेत्यांना व कार्यकर्त्यांना सहकाऱ्याची भुमिका घेतल्याने त्याचा फायदा मिळेल, असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, सांगलीतील विशाल पाटील गटानेही कदम यांना पाठींबा जाहीर केला आहे.मोहनरावांसाठी सातारा जिल्ह्यातून काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. जयकुमार गोरे, आ. आनंदाराव पाटील, माजी आमदार मदनदादा भोसले, अ‍ॅड. विजयराव कणसे, जिल्हा सरचिटणीस व माजी शिक्षण सभापती सुनिल काटकर, रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, भिमरावकाका पाटील, हिंंदुराव पाटील, प्रल्हाद साळुंखे-पाटील, धैर्यशिल कदम, डॉ. सुरेश जाधव, ज्येष्ठ नेते शंकराव गाढवे, अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, गुरूदेव बरदाडे, अविनाश नलवडे, विजय भिलारे, सतीष भोसले, नंदाभाऊ जाधव, बाबासाहेब कदम यांच्यासह नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धुरळा उडविला आहे. (प्रतिनिधी)