शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीची प्रतिष्ठा तर काँग्रेसचे अस्तित्व पणाला

By admin | Updated: November 16, 2016 23:14 IST

मोहनराव कदम यांच्यासाठी समविचारी एकत्र

सातारा : विधानपरिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे उमेदवार शेखर गोरे यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची फळी जोरदार कामाला लागली आहे. काँगे्रसतर्फे नात्या-गोत्यांचे गणित मांडले गेले तरी पक्षाची भूमिका महत्त्वाची असे स्पष्ट करत राष्ट्रवादीचे सर्वच आमदार मते फुटू नयेत, याची मोठी काळजी घेताना पाहायला मिळत आहेत. जिल्ह्याच्या राजकारणावर असलेली राष्ट्रवादीची पकड ढिली न होऊ देता, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणाऱ्या ताकदीच्या बळावर राष्ट्रवादीने काँगे्रसपुढे आव्हान उभे केले आहे. म्हसवड, पाचगणी पालिका व मलकापूर नगरपंचायत वगळता सातारा, वाई, फलटण, कऱ्हाड, महाबळेश्वर, रहिमतपूर या पालिकांत तसेच लोणंद नगरपंचायतीत पालिकेची सत्ता आहे. या सर्वच पालिकांमध्ये काँगे्रसचे बळ राष्ट्रवादीच्या तुलनेत कमी आहे. जिल्हा परिषदेतही ६७ पैकी ३७ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यावरच राष्ट्रवादीची मदार असून या नेत्यांच्या ताब्यातच बहुतांश सत्तास्थाने असल्याने त्यांनी मते फुटू नयेत, याची विशेष काळजी घेतल्याचे चित्र सध्या आहे. या मतदारसंघासाठी जिल्ह्यात ३0४ मतदार आहेत. यापैकी बहुतांश मतदान खेचण्यासाठी शेखर गोरे यांनी ‘व्यूव्हरचना’ आखली आहे. (प्रतिनिधी)

मोहनराव कदम यांच्यासाठी समविचारी एकत्रसातारा : सांगली-सातारा विधानपरिषदेचे कॉग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांच्या प्रचाराच्या निमित्ताने जिल्ह्यातील काँग्रेस एकवटली आहे. जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिला असून प्रचाराच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यावेळी मोहनराव कदम यांना जिल्ह्यातून मताधिक्य देण्याचा निर्धार काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.डॉ. पतगंराव कदम आणि मोहनराव कदम यांनी नेहमीच पक्षाची कवाडे बाजूला ठेवून शैक्षणीक व सामाजिक क्षेत्रात सर्वपक्षीय नेत्यांना व कार्यकर्त्यांना सहकाऱ्याची भुमिका घेतल्याने त्याचा फायदा मिळेल, असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, सांगलीतील विशाल पाटील गटानेही कदम यांना पाठींबा जाहीर केला आहे.मोहनरावांसाठी सातारा जिल्ह्यातून काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. जयकुमार गोरे, आ. आनंदाराव पाटील, माजी आमदार मदनदादा भोसले, अ‍ॅड. विजयराव कणसे, जिल्हा सरचिटणीस व माजी शिक्षण सभापती सुनिल काटकर, रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, भिमरावकाका पाटील, हिंंदुराव पाटील, प्रल्हाद साळुंखे-पाटील, धैर्यशिल कदम, डॉ. सुरेश जाधव, ज्येष्ठ नेते शंकराव गाढवे, अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, गुरूदेव बरदाडे, अविनाश नलवडे, विजय भिलारे, सतीष भोसले, नंदाभाऊ जाधव, बाबासाहेब कदम यांच्यासह नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धुरळा उडविला आहे. (प्रतिनिधी)