शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

राष्ट्रवादीच्या साम्राज्यात आता युतीचेही संस्थान..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:21 IST

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलातरी जिल्ह्यात शिवसेना-भाजपची ताकदही दुर्लक्षित करण्यासारखी नाही. ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलातरी जिल्ह्यात शिवसेना-भाजपची ताकदही दुर्लक्षित करण्यासारखी नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतींचा विचार करता आज युतीकडे झेडपीत १०, पंचायत समितीत १९ आणि पालिका व नगरपंचायतीत ४१ सदस्य आहेत. तर भाजपकडे ३ आणि शिवसेनेकडे १ नगराध्यक्षपद आहे. काही फरकाने राष्ट्रीय काँग्रेसच्या बरोबरीने युतीची ताकद आहे.सातारा जिल्ह्यावर एकेकाळी काँग्रेसची मजबूत पकड होती; पण १९९१ नंतर या जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढू लागली. १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन जावळी विधानसभा मतदार संघातून सदाशिव सपकाळ यांच्या रुपाने पहिल्यांदाच शिवसेनेचा आमदार निवडून आला. याच्या दुसऱ्याच वर्षी १९९६ ला सातारा लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे हिंदुराव नाईक-निंबाळकर हे खासदार झाले. त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे दिग्गज समजले जाणारे व खासदार असणाऱ्या प्रतापराव भोसले यांचा पराभव केला होता. त्यामुळे सेनेचा विस्तार वाढू लागला. त्यानंतर शिवसेनेची ही ताकद अगदी २००४ पर्यंत कायम होती. त्यावर्षीच लोकसभेची निवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेचे हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचा राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव पाटील यांच्याकडून अवघ्या काही हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता.असे असलेतरी १९९९ ला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळेपासून जिल्ह्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच भारी ठरली. यानंतरच्या काळात राज्यात आघाडीचे सरकार आले आणि युती म्हणण्यापेक्षा शिवसेना कमकुवत होत गेली ती २०१४ मध्ये युतीचे सरकार येईपर्यंत; पण २०१४ ला देशात आणि राज्यात युतीचे सरकार आल्यापासून शिवसेनेपेक्षा भाजपची ताकद वाढण्यास सुरुवात झाली.यापाठीमागे भाजपच्या मंत्र्यांचे प्रयत्न आणि पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. शिवसेनेचा पालकमंत्री असलातरी त्यांनी कधीही पक्षवाढीकडे लक्ष दिले नसल्याचे कार्यकर्ते बोलून दाखवितात. तर युतीच्या राज्यातील सत्तेनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत काँग्रेसपेक्षा अधिक सदस्य सेना-भाजपचे आहेत. तर नगरपालिका आणि नगरपंचायतींचा विचार करता राष्ट्रवादीचे १२७ नगरसेवक असून, काँग्रेसचे ८५, भाजप २९ आणि सेनेचे १२ आहेत. जिल्ह्यातील नगराध्यक्षपदेही शिवसेनेकडे १ आणि भाजपकडे ३ आहेत.भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या काही वर्षांत अनेक मातब्बरांनी प्रवेश केल्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. हे सत्र गेल्या दोन दिवसांपर्यंत सुरूच होते. त्यामुळेच आज राष्ट्रवादी काँग्रेस नसली तरी राष्ट्रीय काँग्रेसच्या बरोबरीने युती जाऊ लागली आहे.विविध ठिकाणची पक्षनिहाय सदस्य संख्यापक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती पालिका व नगरपंचायतराष्ट्रवादी ४० ७० १२७काँग्रेस ७ १६ ८५भाजप ७ १० २९शिवसेना ३ ९ १२