शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

राष्ट्रवादीचा नैवेद्य खाऊन उडून गेले कावळे

By admin | Updated: August 11, 2014 00:14 IST

सुनील माने : रहिमतपूरच्या कार्यक्रमात येळगावकरांवर टीका

रहिमतपूर : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वार्थासाठी आलेले निघून गेले, ते कावळे होते. कावळे आले आणि नैवेद्य खाऊन उडून गेले. आम्ही मात्र पक्षाचे सच्चे मावळे आहोत. त्यामुळे गेलेल्यांना भविष्यात पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही,’ असा टोला पक्ष सोडून गेलेल्या दिलीप येळगावकरांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी लगावला. रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे नगर परिषदेने आयोजित केलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. बाळासाहेब पाटील होते. पालकमंत्री शशिकांत शिंदे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आ. प्रभाकर घार्गे, माजी आमदार सदाशिव पोळ, नितीन भरगुडे-पाटील, मानसिंगराव जगदाळे, सुनील खत्री, बाळासाहेब सोळस्कर, सुरेखा पाटील, जितेंद्र पवार, किशोर बाचल, शाहूराज फाळके, नगराध्यक्षा उज्ज्वला माने आदी मान्यवर उपस्थित होते.सुनील माने म्हणाले, ‘काही लोक सत्तेसाठी राजकारण करीत आहेत. त्यांना वेळेतच रोखण्यासाठी निष्ठावान फळी निर्माण करणे गरजेचे आहे.’ पालकमंत्री शिंदे म्हणाले, ‘ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील काही विरोधक पाण्याच्या बाबतीत मुद्दाम चुकीचे राजकारण करीत आहेत. त्यांनी जनतेला विनाकारण भडकवू नये.’यावेळी मानसिंगराव जगदाळे, नितीन भरगुडे-पाटील, बाळासाहेब सोळस्कर, सुनील खत्री यांची भाषणे झाली.यावेळी पालकमंत्री शशिकांत शिंदे यांच्या हस्ते सुनील माने यांचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, वसंतराव कदम, शाहूराज फाळके, दाजी पवार, कांतिलाल पाटील, अ‍ॅड. नितीन भोसले, अरुण माने, तानाजी शिंदे, अमित कदम, सुभाष नरळे, कविता गिरी, श्रीमंत झांजुर्णे, अ‍ॅड. अशोक पवार, आनंदा कोरे, शशिकांत भोसले, संभाजी माने, सुखदेव माने उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांनी प्रास्ताविक केले. विकास पवार यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश माने यांनीआभार मानले. (वार्ताहर)