शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात जिल्हाध्यक्षांचा ‘बालकिल्ला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक गावांमध्ये भाजपने मुसंडी मारत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घराच्या अंगणात दिवाळीचा किल्ला तयार करण्यात गुंतले होते. विशेष म्हणजे, ‘राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील जिल्हाध्यक्षांचा हा बालकिल्ला’ सोशल मीडियावर झळकला आहे.गेल्या दीड दशकांपासून सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक गावांमध्ये भाजपने मुसंडी मारत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घराच्या अंगणात दिवाळीचा किल्ला तयार करण्यात गुंतले होते. विशेष म्हणजे, ‘राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील जिल्हाध्यक्षांचा हा बालकिल्ला’ सोशल मीडियावर झळकला आहे.गेल्या दीड दशकांपासून सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी जिल्हाध्यक्षपदाच्या काळात पक्षाला अधिकाधिक उर्जितावस्था आणली. त्यानंतर डॉ. दिलीप येळगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जिल्हाध्यक्षाला व्यवस्थित काम करु देत नाहीत, स्वातंत्र्य अन् अधिकार देत नाहीत, अशी टीकाही केली गेली.येळगावकर भाजपमध्ये गेल्यानंतर रहिमतपूरचे सुनील माने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष झाले. त्यांच्या काळात जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या राष्ट्रवादीच्याच ताब्यात आल्या. जिल्हा परिषदेची सत्ताही अबाधित राहिली.मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील ५० पेक्षाही जास्त गावांमध्ये भाजपने आपला झेंडा फडकाविल्याचा दावा पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केला. १०० पेक्षाही जास्त ठिकाणी राष्ट्रवादीचीच सत्ता आली असली तरी भाजपने मारलेली मुसंडी राष्ट्रवादीसाठी आत्मचिंतनाची अन् चिंतेची बाब ठरली.इतकी वर्षे जिल्ह्यात काँग्रेस हाच राष्ट्रवादीचा प्रमुख विरोधक होता. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल पाहता भविष्यात भाजपची डोकेदुखी राष्ट्रवादीसाठी अत्यंत त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.अशा वेळी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी आपली आक्रमक भूमिका स्पष्ट करणे गरजेचे असताना घरात किल्ला बांधताना त्यांचा फोटो सोशल मीडियावर फिरु लागला आहे. खरं तर, संपूर्ण पक्षाची धुरा सांभाळणारा एक जिल्हाध्यक्ष आपलं मोठेपण उंबरठ्याबाहेर ठेवून लहान मुलांमध्ये सर्वसामान्यांसारखा वावरतो, ही कौतुकाचीच गोष्ट. मात्र, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला टिकावायचा असेल तर हा बालकिल्ला किती उपयोगाचा, याची चर्चा सुरु झाली आहे.