शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
3
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
4
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
5
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
6
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
7
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
8
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
9
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
10
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
11
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
12
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
13
IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
14
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
15
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
16
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
17
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा
18
पाकिस्तानी शेअर बाजारात भूकंप, पण भारतीय मार्केटवर झाला नाही परिणाम, 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
Swapna Shastra: प्रिय व्यक्तीचा स्वप्नात मृत्यू पाहणे शुभ की अशुभ? त्यातही स्वप्नं पहाटेचं असेल तर?
20
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले

राष्ट्रवादीमुळेच सहकार मोडीत निघाला

By admin | Updated: January 5, 2017 23:56 IST

पृथ्वीराज चव्हाण : फलटण तालुक्यातील कार्यक्रमात रामराजेंवर टीका; सामान्यांना देशोधडीला लावले

फलटण : ‘फलटण तालुक्यात सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या हिताच्या सहकारी संस्था मोडीत काढल्या. त्याचप्रमाणे केंद्रातील भाजपा सरकारने नोटाबंदीच्या नावाखाली अर्थव्यवस्था अडचणीत आणून शेतकरी व सामान्य माणसाला देशोधडीला लावले आहे. शेतकरी हिताच्या अनेक गोष्टी त्यांनी मोडीत काढल्या आहेत. फलटण तालुक्यासारखेच नेतृत्व देशाचे नेतृत्व करीत आहे,’ अशी घणघणाती टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव न घेता केली. वाठार निंबाळकर, ता. फलटण येथे स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी सुरू केलेल्या आयुर ट्रेडर्सच्या उद्घाटनप्रसंगी चव्हाण बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आयुर ट्रेडर्सचे प्रमुख दिगंबर आगवणे, पंचायत समिती सदस्या अ‍ॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य महादेवराव पोकळे, आयुर आॅरग्यानिकच्या प्रमुख जयश्री आगवणे, सेंट्रल बँकेचे जनरल मॅनेजर नरेंद्र सिंह, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयकुमार शिंदे, आमीरभाई शेख, पिंटू इवरे आदी उपस्थित होते. ‘माझ्या कर्तृत्वाला पृथ्वीराज चव्हाण यांनी झळाळी दिल्याने शेतकऱ्यांसाठी उभारलेले प्रकल्प यशस्वी झाले. आता दिगंबर आगवणे यांनी उभारलेला आयुर ट्रेडर्सही यशस्वी होणार असून, तालुक्यात पाचशे शेतकऱ्यांना कारखान्यामार्फत ट्रॅक्टर वाटप करून त्यांना मालक करणार आहे,’ असे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले. आगवणे म्हणाले, ‘रामराजे हे माझ्यावर चुकीचे आरोप करीत असतात. खरे तर तालुक्यातील संस्था त्यांनी मोडीत काढल्या. साधी पिठाची चक्की त्यांना उभारता आली नाही. आम्ही आमच्या कर्तृत्वावर शेतकरी व तरुणांच्या हितांसाठी उद्योग उभारत आहोत. सामान्य माणूस मोठा होत असेल तर त्यांच्या पोटात दुखत असते.’ (प्रतिनिधी) आयुरचेही नाव देशभरात होईल..रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्वराज व लोकनेते कारखान्याची उभारणी करताना जी कर्जे घेतली ती प्रामाणिकपणे फेडल्याने दोन्ही उद्योग सुस्थितीत आहेत. दिगंबर आगवणेही रणजितसिंह यांच्याप्रमाणे यशस्वी उद्योजक होऊन सेवा करतीलच; पण जनतेच्या हितासाठी उभारलेल्या आयुरचाही नावलौकिक देशभरात होईल,’ असेही चव्हाण म्हणाले.