शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीचीच सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:40 IST

कोरेगाव : विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल सव्वा वर्षानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे कोरेगाव तालुका अक्षरश: ढवळून निघाला होता. राज्यात सत्तेवर असलेली ...

कोरेगाव : विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल सव्वा वर्षानंतर झालेल्या

ग्रामपंचायत निवडणुकीमुळे कोरेगाव तालुका अक्षरश: ढवळून निघाला होता.

राज्यात सत्तेवर असलेली महाविकास आघाडी मात्र या तालुक्यात दिसून आली नाही. आमदार महेश शिंदे विरुद्ध आमदार शशिकांत शिंदे अशीच लढत यावेळी पहावयास मिळाली. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने यश मिळवले आहे. मोठमोठ्या ग्रामपंचायतीवर आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आली आहे. वाठार (किरोली)मध्ये मात्र सत्तांतर झाले असून, कॉंग्रेसच्या विचारांची सत्ता ग्रामपंचायतीत आली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर सव्वा वर्षानी ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्याने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. ज्याप्रमाणे त्या निवडणुकीत मतदान झाले, अगदी त्याचप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान झाल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. बहुतांश ठिकाणी विशेषत: मोठ्या गावांमध्ये सत्ता परिवर्तन झाले आहे. सलगच्या सत्तेला ग्रामस्थ कंटाळले असल्याचे मतपेटीतून दिसून आले आहे. कोरेगाव तालुका हा सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघात, तर कोरेगाव, कऱ्हाड उत्तर आणि फलटण राखीव या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये मोडतो. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ज्या- त्या मतदारसंघातील गावांमध्ये विद्यमान लोकप्रतिनिधी निर्णय घेतात. ग्रामपंचायत निवडणुकीत देखील हीच प्रथा कायम ठेवण्यात आली. कऱ्हाक उत्तरमध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने यश मिळवले आहे. फलटण राखीव मतदारसंघात देखील राष्ट्रवादीने यश संपादन केले असून, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण व मुंबई बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळस्कर-पाटील यांच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायतीत यश मिळविले आहे. कऱ्हाड उत्तर मतदारसंघात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस अशीच लढत पहावयास मिळाली. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉँग्रेसने निवडणूक लढवली होती, तर काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांनी आव्हान दिले होते. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली संभाजीराव गायकवाड गटाची वाठार (किरोली) ग्रामपंचायतीत दहा वर्षे सत्ता होती.

काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांनी त्याला आव्हान दिले होते. यावेळेस निवडणूक रंगतदार झाली. त्यामध्ये भीमराव पाटील यांच्या गटाने दहा जागा मिळवत सत्तांतर केले. राष्ट्रवादीच्या पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे लागले.

तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींपैकी नागेवाडी, चिलेवाडी, तडवळे संमत, वाघोली, कोलवडी, होलेवाडी, भिवडी व बोधेवाडी (चिमणगाव) या ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झालेली असून, गावपातळीवर एकत्र बसून पक्षविरहित निवडणूक झाल्याचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले. एकूणच नजीकच्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची ही नांदी असून, सर्वच पक्षांनी आता निवडणुकीसाठी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे.