शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात गेलेल्यांसाठी राष्ट्रवादीचे दरवाजे बंद

By admin | Updated: August 20, 2016 00:26 IST

अजित पवार : पलूसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात भाजपवरही निशाणा; कार्यकर्त्यांचा उत्साह

पलूस : आपण केलेल्या चुकीच्या कामाचे पितळ उघडे पडेल, या भीतीने भाजपमध्ये गेलेल्यांना राष्ट्रवादीचे दरवाजे पुन्हा उघडले जाणार नाहीत, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी दिला. भाजपमध्ये गेलेल्यांना पुन्हा जवळही करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. येथे आयोजित पलूस-कडेगाव तालुक्यांतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार जयंत पाटील होते. यावेळी आमदार श्रीमती सुमनताई पाटील, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, अण्णा डांगे, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पाटील, किरण लाड, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शरद लाड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील उपस्थित होते.पवार म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून शेतकरी, व्यापारी, उद्योजक, कष्टकरी, नोकरदार हवालदिल झाले आहेत. अच्छे दिन आणण्याचे खोटे आश्वासन देऊन त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. महागाई, शेती, वीज, बेरोजगारी, उद्योग, व्यापार, शिक्षण, अर्थव्यवस्था अशा सर्वच आघाड्यांवर भाजप सरकार अपयशी ठरले आहे. त्यांच्या कामाला जनताच कंटाळली आहे. सरकार शेतकऱ्यांविषयी कोणतेही भाष्य करण्यास तयार नाही. मार्केट कमिट्या बंद पाडल्या. दहशत माजली असून, सरकार लक्ष देत नाही. मागेल त्याला शेततळे, ही योजना फोल ठरली आहे. विरोधात असताना वाघासारखे वागणारे शिवसेनेचे नेते शिवसैनिक आता बकरीसारखे वागत आहेत. पंतप्रधान मोदी यांची हिटलरशाही जास्त दिवस चालणार नाही.ते म्हणाले की, आम्ही पंधरा वर्षात भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात येत आहेत. मात्र आज चिक्की वाटप, विविध संस्था, आदिवासी मुलांना वस्तू वाटप यात भ्रष्टाचार करणारे मंत्री भाजपच्या मंत्रिमंडळात आहेत. एकनाथ खडसे यांच्याकडून बारा खाती का काढून घेतली, याचे भाजपकडे उत्तर नाही. इतरांना बदनाम करण्यापलीकडे भाजपच्या नेत्यांना काहीही येत नाही.साखर कारखानदारी अडचणीत असताना त्यांना मदत करणे दूरच, मात्र, विक्री केलेल्या साखरेवर भरमसाट कर लागू केला जात आहे. सध्या दुधाचे दर कमी झाले आहेत. महागाईने कळस गाठला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पदरी काहीच नाही. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्जाची घोषणा गेली कुठे? प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख ठेवण्याचे आमिष दाखवून केंद्राने लोकांना बँकेत खाती उघडण्यास भाग पाडले. पण या खात्यांवर दमडीही जमा झाली नाही. ही घोर फसवणूक असल्याचा आरोप आमदार पवार यांनी केला. आ. जयंत पाटील म्हणाले की, भाजप सरकारकडून शेतकऱ्यांची मुस्कटदाबी सुरू असून, विजेचे दर वाढत आहेत. पश्चिम महाराष्ट्राचा द्वेष सरकारकडून केला जात आहे. ताकारी, टेंभूसारख्या योजना पुन्हा सुरू करण्याची धमक सरकारमध्ये नाही.अरूण लाड म्हणाले की, जी. डी. बापू लाड यांनी आदर्श तत्त्वानुसार साखर कारखाना आणि संस्थांचे काम सुरू आहे. पलूस, कडेगाव तालुका राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोण कुठे गेले हे पाहण्यापेक्षा पक्षवाढीला महत्त्व देण्याची गरज आहे. त्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी सहकार्य करावे.मेळाव्याप्रसंगी विश्वासराव पाटील, नंदाताई पाटील, वैशाली मोहिते, उषाताई दशवंत, पी. एस. माळी, अण्णा सिसाळ, आनंदराव निकम, वसंतराव लाड, तानाजी पाटील, जे. पी. पाटील उपस्थित होते. श्रीकांत माने यांनी सूत्रसंचालन केले, तर पोपट संकपाळ यांनी आभार मानले. सर्जेराव खरात, दिगंबर पाटील, स्नेहल पाटील, दिलीप पाटील, इलियास नायकवडी यांनीही मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)सदाभाऊ, राजू शेट्टींना टोलाअजित पवार यांनी, राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. जे लोक पक्षातून गेले, ते त्यांच्या भानगडी उघड्या पडू नयेत यासाठी सत्तेच्या वळचणीला गेले, अशी टिपणी त्यांनी केली. बाजार समित्यांच्या बंद आंदोलनादरम्यान शेतकरी संघटनेने कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजीपाला विकला, याबाबत बोलताना, एक दिवस मंत्र्यांनी भाजीपाला विकून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, असा टोलाही पवार यांनी लगावला.सिंचन योजना : बनवाबनवी थांबवाअजित पवार म्हणाले की, भाजप सरकारकडून पश्चिम महाराष्ट्राचा दुस्वास केला जात आहे. सिंचन योजना बंद पाडल्या जात आहेत. सिंचन योजनांचे पंप सौरऊर्जेवर कसे काय चालवणार आहेत? मुख्यमंत्री असे आश्वासन देतातच कसे? ही बनवाबनवी थांबवा. आम्ही सत्तेवर असताना सार्वजनिक कामे मोठ्या प्रमाणावर करत होतो. त्यामुळे आताही आम्ही सांगितलेली सार्वजनिक कामे होतात.