शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

रहिमतपूर परिसरातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:39 IST

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरातील मोठ्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र वाठार किरोली ...

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरातील मोठ्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र वाठार किरोली येथे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांच्या राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत पॅनेलने दहा-तीन जागांच्या फरकाने पराभव करत दहा वर्षांनंतर ग्रामपंचायतीची सत्ता काबीज केली.

रहिमतपूर परिसरातील तारगाव, धामणेर, साप, सायगाव या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम राखले, तर वाठार व दुर्गळवाडी ग्रामपंचायत काँग्रेसने आपल्या ताब्यात घेतली. तारगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कांतिलाल पाटील यांच्या विचाराच्या पॅनेलने विरोधी पॅनेलचा ९-२ जागांच्या फरकाने पराभव करत ग्रामपंचायतीवरील आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळविले. धामणेर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे नेते आदर्श सरपंच शहाजी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सलग सहाव्यांदा सत्ता मिळवली. नऊपैकी आठ जागा बिनविरोध झाल्या होत्या. मात्र एका जागेसाठी निवडणूक लागली होती. परंतु प्रचंड मतांच्या फरकाने ही जागाही शहाजी क्षीरसागर यांच्या विचारांच्या उमेदवाराने जिंकली.

साप ग्रामपंचायतीसाठी दोन पॅनेलमध्ये अटीतटीची लढत झाली. ८-३ जागांच्या फरकाने दहा वर्षांनंतर सत्तांतर झाले. ही लढत राष्ट्रवादीच्या एका गटाविरोधात महाविकास आघाडी अशी थेट झाली. सायगाव ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी निवडणूक लागली होती. राष्ट्रवादीच्याच दोन गटात झालेल्या लढतीमध्ये मानसिंग घोरपडे यांच्या विचारांच्या पॅनेलने ५-२ जागांच्या फरकाने ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली. दुर्गळवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसच्या तुळशीदास यादव यांच्या विचारांच्या पॅनेलने विरोधी पॅनेलचा ५-२ जागांच्या फरकाने पराभव केला.

पंधरा वर्षांची सत्ता उलथवून ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली.

सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेल्या वाठार किरोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जोरदार घमासान झाले. जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांच्या विचाराच्या राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत पॅनेलविरोधात राष्ट्रवादीचे नेते संभाजीराव गायकवाड व भाजपचे युवा नेते विकास गायकवाड यांच्या विचारांच्या पॅनेलमध्ये तेरा जागांसाठी कडवा संघर्ष झाला. भीमराव पाटील यांनी १०-३ जागांच्या फरकाने संभाजीराव गायकवाड यांच्या विचाराच्या पॅनेलचा पराभव करत दहा वर्षांनंतर ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडविण्यात यश मिळविले.