शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

रहिमतपूर परिसरातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:39 IST

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरातील मोठ्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र वाठार किरोली ...

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरातील मोठ्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र वाठार किरोली येथे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांच्या राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत पॅनेलने दहा-तीन जागांच्या फरकाने पराभव करत दहा वर्षांनंतर ग्रामपंचायतीची सत्ता काबीज केली.

रहिमतपूर परिसरातील तारगाव, धामणेर, साप, सायगाव या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम राखले, तर वाठार व दुर्गळवाडी ग्रामपंचायत काँग्रेसने आपल्या ताब्यात घेतली. तारगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कांतिलाल पाटील यांच्या विचाराच्या पॅनेलने विरोधी पॅनेलचा ९-२ जागांच्या फरकाने पराभव करत ग्रामपंचायतीवरील आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळविले. धामणेर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे नेते आदर्श सरपंच शहाजी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सलग सहाव्यांदा सत्ता मिळवली. नऊपैकी आठ जागा बिनविरोध झाल्या होत्या. मात्र एका जागेसाठी निवडणूक लागली होती. परंतु प्रचंड मतांच्या फरकाने ही जागाही शहाजी क्षीरसागर यांच्या विचारांच्या उमेदवाराने जिंकली.

साप ग्रामपंचायतीसाठी दोन पॅनेलमध्ये अटीतटीची लढत झाली. ८-३ जागांच्या फरकाने दहा वर्षांनंतर सत्तांतर झाले. ही लढत राष्ट्रवादीच्या एका गटाविरोधात महाविकास आघाडी अशी थेट झाली. सायगाव ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी निवडणूक लागली होती. राष्ट्रवादीच्याच दोन गटात झालेल्या लढतीमध्ये मानसिंग घोरपडे यांच्या विचारांच्या पॅनेलने ५-२ जागांच्या फरकाने ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली. दुर्गळवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसच्या तुळशीदास यादव यांच्या विचारांच्या पॅनेलने विरोधी पॅनेलचा ५-२ जागांच्या फरकाने पराभव केला.

पंधरा वर्षांची सत्ता उलथवून ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली.

सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेल्या वाठार किरोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जोरदार घमासान झाले. जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांच्या विचाराच्या राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत पॅनेलविरोधात राष्ट्रवादीचे नेते संभाजीराव गायकवाड व भाजपचे युवा नेते विकास गायकवाड यांच्या विचारांच्या पॅनेलमध्ये तेरा जागांसाठी कडवा संघर्ष झाला. भीमराव पाटील यांनी १०-३ जागांच्या फरकाने संभाजीराव गायकवाड यांच्या विचाराच्या पॅनेलचा पराभव करत दहा वर्षांनंतर ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडविण्यात यश मिळविले.