शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

भाजपचा वारू रोखण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, सेना एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:42 IST

सातारा : राज्याच्या विधानसभेत ज्या पध्दतीने राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे सरकार तयार झाले, त्याच धर्तीवर सातारा ...

सातारा : राज्याच्या विधानसभेत ज्या पध्दतीने राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे सरकार तयार झाले, त्याच धर्तीवर सातारा जिल्ह्यातदेखील या तिन्ही पक्षांनी एकत्र येत भाजपला बाजूला ठेवण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकांत आघाडी कायम ठेवलेली आहे. सर्वच ग्रामपंचायतींमध्ये त्यांना यश आले नसले, तरी काही ग्रामपंचायतींमध्ये ही आघाडी झालेली आहे.

जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यातील १२३ ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध करण्यात नेत्यांना यश आले, तर ९८ ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. ६५४ ग्रामपंचायतींची निवडणूक लागलेली आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांमध्ये यशस्वी करण्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांना यश आले. त्या धर्तीवर ग्रामपंचायत निवडणुकीमध्येदेखील आघाडी करून भाजपला रोखण्याचा प्रयोग या पक्षांनी केला आहे. काही ठिकाणी त्यांना यश आले; मात्र काही ठिकाणी राष्ट्रवादी वगळता इतर पक्षांची ताकदच कमी पडत असल्याने राष्ट्रवादीनेच खिंड लढवायला घेतल्याचे चित्र आहे.

विशेषत: वाई, कऱ्हाड, जावळी, सातारा, माण, खटाव या तालुक्यांमध्ये भाजप हा तिन्ही पक्षांचा प्रतिस्पर्धी पक्ष म्हणून पुढे आलेला आहे. या तालुक्यांतील मूळचे काँग्रेस अथवा राष्ट्रवादीत असणारे नेते भाजपमध्ये गेले असल्याने राष्ट्रवादीने काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन निवडणुकीचे डावपेच आखले आहेत. आता निवडणुकीनंतरच खरे चित्र पुढे येईल. सध्या तरी निवडणुकीचा प्रचार त्वेषाने सुरू आहे.

निकालानंतर महाआघाडीचा खराखुरा चेहरा समोर येणार

n राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी जिल्ह्यातील काही गावांत एकत्र येण्यासाठी आवाहन केले. काही गावांत त्याला यशही आल्याचे पाहायला मिळते.

n राष्ट्रवादीवर नाराज असलेले जिल्ह्यातील स्थानिक नेते भाजपच्या कळपात गेले असल्याने अनेक ठिकाणी संघर्ष पेटला आहे. अशा गावांत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी युती करण्याबाबत स्थानिक नेत्यांना आवाहन करण्यात आले हाेते. काही ठिकाणी यश आले. पुसेगाव या मोठ्या ग्रामपंचायतीत भाजपला रोखण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढत आहेत.

- डॉ. सुरेश जाधव,

जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

शिवसेनेची जिथे ताकद आहे, अशा ठिकाणी स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. मात्र भाजपला बाजूला ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस या दोन्ही पक्षांसोबत आघाडी केलेली आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेचे सदस्य बिनविरोध निवडले आहेत. आगामी काळातदेखील तिन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढतील.

- चंद्रकांत जाधव,

जिल्हाध्यक्ष, शिवसेना

राज्याच्या विधानसभेत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्थानिक गट-तट असतात. एकाच पक्षाचे दोन गट एकमेकांपुढे उभे राहतात. यंदाही तसे झाले असल्याचे दिसते.

- सुनील माने,

जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

त्वेषाने लढून नंतर आघाडी

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आमदार विशेषत: लक्ष घालत नाहीत. मात्र ज्या ठिकाणी आपला गट कमकुवत होतोय, असे वाटल्यास आमदार स्वत: मैदानात उतरतात. मात्र, आपलेच कार्यकर्ते जर एकमेकांच्या विरोधात असतील, तर मात्र आमदार लक्ष घालत नाहीत. निवडणुका झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या राजकारणात विशेष लक्ष दिले जाते. विरोधकांचे कमकुवत दुवे ओळखून आघाड्या होतात.