शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

मुख्यमंत्र्यांच्या कऱ्हाडात राष्ट्रवादीची खलबते

By admin | Updated: August 31, 2014 00:20 IST

प्रचाराला बोलवा, मी हजर : जयंतराव म्हणे... काका, मैं हूं ना !

कऱ्हाड : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कऱ्हाड दक्षिणची संभाव्य उमेदवारी सध्या भलतीच चर्चेत आहे़ पण मुख्यमंत्र्यांना होमपीचवरच खिळवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खलबते सुरू केली आहेत़ म्हणूनच की काय, या आठवड्यात पालकमंत्री शशिकांत शिंदे, ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील यांचे दक्षिणेत जाहीर कर्यक्रम अन् उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांचा दक्षिण राष्ट्रवादीचा मेळावा झाल्याचे मानले जाते़ पृथ्वीराज चव्हाण यांनी दक्षिणेतून लढण्याचे संकेत दिल्यापासून हा मतदारसंघ चांगलाच ‘हॉट’ बनला आहे़ अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष याकडे लागले आहे़ मुख्यमंत्र्यांना दक्षिणेतच खिळवून ठेवण्यासाठी भाजप नेत्यांनीही खेळ्या सुरू केल्या आहेत़ मुख्यमंत्री उभे राहिले तर जशास तसा उमेदवार आमच्या संपर्कात असल्याचा भाजप नेते खासगीत दावा करत आहेत़ पण, यात मित्रपक्ष राष्ट्रवादीही कुठे मागे दिसत नाही़ ओंड येथे अ‍ॅड़ दीपक थोरात यांनी आयोजित केलेल्या भूमिपूजन समारंभाला पालकमंत्री शशिकांत शिंदे उपस्थित होते़ राष्ट्रवादीच्या नेत्यांसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भीमराव पाटील यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी होती़ पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मेळात दिसणारे भीमराव पाटील सध्या बंडखोरीच्या पवित्र्यात असणाऱ्या अतुल भोसलेंच्या गटात घुसले आहेत़ भोसलेंच्या व्यासपीठावरून थेट मुख्यमंत्र्यांच्यावर निशाणा साधणारे भीमराव पाटील राष्ट्रवादीचे मंत्री शशिकांत शिंदे यांच्या व्यासपीठावर दिसल्याने त्यांची उलट-सुलट चर्चा सुरू आहे़ रेठरे खुर्द येथे पाटबंधारे विभागाच्या भूमिपूजन समांरभास ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील व दक्षिणचे आमदार विलासराव पाटील यांचा संयुक्त कार्यक्रम झाला़ या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे स्थानिक नेते कोणीच उपस्थित नव्हते; पण या कार्यक्रमात मंत्री पाटील यांनी ‘विलासकाका उंडाळकर यांची पाठराखण करा,’ असे आवाहन तर केलेच; पण ‘माझा अन् काकांचा पक्ष वेगळा आहे़त्यामुळे मी त्यांना उमेदवारी देऊ शकत नाही; पण काका मला प्रचाराला बोलवा, मी नक्की येईन,’ असे सांगून विलासराव पाटील उंडाळकरांना बळ देत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कळच काढल्याचे मानले जाते़ (प्रतिनिधी)राष्ट्रवादीच्या मेळाव्यात निर्णय नाहीउत्तरेचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी नुकताच कऱ्हाड दक्षिणच्या राष्ट्रवादीचा मेळावा घेतला; पण त्यांना अजून दक्षिण मतदारसंघाचा मेळ घालता आलेला दिसत नाही़ कारण त्यांचं भाषण कऱ्हाड शहरासह दक्षिणेत समाविष्ट झालेल्या त्या १३ गावांभोवतीच फिरत होते़ अन् ‘तिसरा पर्याय देण्याबाबत प्रमुख कार्यकर्त्यांनीच दक्षिणेतील इतर गावातील लोकांशी चर्चा करावी,’ असं सांगत त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात चेंडू टाकला़ त्यामुळे दक्षिणेवर स्वारी करण्याबाबतचा निर्णय झालाच नाही़