शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

शेतकऱ्यांच्या आंदोलनात राष्ट्रवादी सक्रीय : शिंदे

By admin | Updated: June 4, 2017 22:37 IST

शेतकऱ्यांच्या आंदोलनात राष्ट्रवादी सक्रीय : शिंदे

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : गेल्या चार दिवसांपासून राज्यातील शेतकरी संपावर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून संप मिटवण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफी करण्याची सरकारची इच्छा असेल तर वाट कोणाची पाहताय, असा सवाल करत शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष कराल तर सरकार बदलण्याची ताकद या शेतकऱ्यांमध्ये आहे, असा इशारा आ. शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.दरम्यान, या शेतकरी संपास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असून कर्जमाफी मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा निर्धार त्यांनी केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, युवकचे बाळासाहेब महामुलकर उपस्थित होते. आमदार शिंदे म्हणाले, पाच जूनला शेतकऱ्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्रीय सहभागी होणार आहे. जिह्यातील सर्व घटकांनी, संघटनांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे. आंदोलनाला पाठबळ द्यावे. या आंदोलनाला कोणताही राजकीय रंग नाही. तशा पद्धतीची भाजपाची खेळी आहे, असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. यासाठी अनेक संघटना, शेतकरी या आंदोलनात उतरल्या आहेत. जिह्यात आमदारांनी प्रत्येक तालुक्यात जबाबदारी घेतली आहे. मात्र, हे सरकार पोलिस बळाचा वापर करत आहे. सामान्य शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असती तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या. परंतु खोट बोलून फसवण्याचे धोरण आहे. मुख्यमंंत्री कोणाची वाट पहात आहेत. आता जे त्यांनी जाहीर केले. छोटा शेतकरी आणि मोठा शेतकरी, हे साफ चुकीचे आहे. पश्चिम महाराष्ट्राला डावलण्याची भिती वाटत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे रात्रीपर्यंत बैठका होतात. हे आंदोलनाचे यश आहे. हे सरकार अस्थिर करण्याची ताकद शेतकऱ्यांच्यामध्ये आहे, असे त्यांनी सांगितले. आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. हे आंदोलन पक्ष विरहित आहे. आंदोलनाची धार वाढवण्याची जबाबदारी आमदारांवर आहे. काही लोकांवर केसेस करण्याचा सपाटा लावला आहे. हवेत गोळीबार करु लागलेत. दरोड्याचे गुन्हे दाखल करु लागलेत. ही हुकूमशाही आहे. एका बाजूला शेतकऱ्यांचे कैवारी आहेत म्हणून सांगायचे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल करायचे, असा टोलाही आमदार शिंदे यांनी लगावला.