शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

नव्यांना गुलाल.. सत्तांतरांची दिवाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. वर्षानुवर्षे सत्तेवर मांड ठेवून बसलेल्या प्रस्थापितांना जनतेने अक्षरश: उखडून काढले. या निवडणुकीतून अनेक तरुण नेतृत्वाच्या हातात लोकांनी सत्तेच्याचाव्या दिल्या आहेत. दरम्यान, मायणीत सत्तांतर झाले असून शिरवळमध्येसरपंच भाजपाचा परंतु, सत्ताराष्ट्रवादीची अशी विचित्र परिस्थितीनिर्माण झाली आहे.सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुलीतही सत्तांतर झाले असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. वर्षानुवर्षे सत्तेवर मांड ठेवून बसलेल्या प्रस्थापितांना जनतेने अक्षरश: उखडून काढले. या निवडणुकीतून अनेक तरुण नेतृत्वाच्या हातात लोकांनी सत्तेच्याचाव्या दिल्या आहेत. दरम्यान, मायणीत सत्तांतर झाले असून शिरवळमध्येसरपंच भाजपाचा परंतु, सत्ताराष्ट्रवादीची अशी विचित्र परिस्थितीनिर्माण झाली आहे.सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुलीतही सत्तांतर झाले असून, राष्ट्रवादीच्या शिवेंद्रसिंहराजे भोसले व शशिकांत शिंदे गटाने संतोष जाधव यांच्या भाजपा पॅनेलला चारी मुंड्या चित केले. सोनगाव अन् जकातवाडी उदयनराजे गटाकडे तर आसनगाव अन् .... सह बरीच गावे शिवेंद्रसिंहराजे गटाकडे गेली आहेत.कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी, काँगे्रसने आपले वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न केला असला तरी भाजपानेही जोरदार मुसंडी मारली आहे. खंडाळा तालुक्यातील असवलीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ यांच्या गटाला पराभवाचा जोरदार धक्का बसला. शिरवळमध्ये राष्ट्रवादीने जास्त जागा मिळवूनहीसरपंचपद गमावले. वाई तालुक्यात किकली, काळंगवाडी व गोवेदिगर ही गावे भाजपाकडे गेली असून, भुर्इंज, कवठे, पांडे काँग्रेसकडे, तर बोपर्डी राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिली.जावळीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सत्ताधारी गटाचे वर्चस्व कायम राहिले.भाजपाचा ५५ गावांत सत्ता आल्याचा दावासातारा जिल्ह्यातील ५५ गावांमध्ये भाजपची सत्ता आल्याचा दावा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. गेली अनेक दशके राष्ट्रवादी अन् काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असणाºया राजकीय बालेकिल्ल्याला भाजपाने हादरा दिला असून, मोदी अन् फडणवीस सरकारच्या सकारात्मक विकासाचाच हा परिपाक आहे, अशी प्रतिक्रिया पावसकर यांनी व्यक्त केली.वाईत धक्कादायक निकालवाई तालुक्यातील किकली, कवठे, पांडे, काळंगवाडी या ग्रामपंचायतीं-मध्ये वीस ते पंचवीस वर्षांची एकाधिकारशाही मोडीत निघत धक्कादायक निकाल हाती लागले.कोरेगावात भाजपाने उघडले खातेग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने अखेर कोरेगाव तालुक्यात खाते उघडले असून, सात ग्रामपंचायतींवर झेंडा फडकाविला आहे. जळगावमध्ये मात्र ‘गड आला पण सिंह गेला,’ अशी अवस्था भाजपाची झाली. राष्टÑवादी काँग्रेसने काँग्रेसच्या ताब्यातील अनेक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या असून, एकंबे व कुमठे ग्रामपंचायतीदेखील आता राष्टÑवादीकडे गेल्या आहेत.गिरवीत ‘काँग्रेस’ला धक्काफलटणमध्ये गिरवी ग्रामपंचायत काँगे्रसच्या ताब्यातून गेली. राजेगट व मित्रपक्ष मिळून १८, तर कॉँग्रेसने सहा ग्रामपंचायतींवर वर्चस्व सिद्ध केले. शिरवळ खंडाळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाºया शिरवळ व असवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी सत्ताधाºयांना नीरा नदीचा घाट दाखविला.