शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

नव्यांना गुलाल.. सत्तांतरांची दिवाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. वर्षानुवर्षे सत्तेवर मांड ठेवून बसलेल्या प्रस्थापितांना जनतेने अक्षरश: उखडून काढले. या निवडणुकीतून अनेक तरुण नेतृत्वाच्या हातात लोकांनी सत्तेच्याचाव्या दिल्या आहेत. दरम्यान, मायणीत सत्तांतर झाले असून शिरवळमध्येसरपंच भाजपाचा परंतु, सत्ताराष्ट्रवादीची अशी विचित्र परिस्थितीनिर्माण झाली आहे.सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुलीतही सत्तांतर झाले असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. वर्षानुवर्षे सत्तेवर मांड ठेवून बसलेल्या प्रस्थापितांना जनतेने अक्षरश: उखडून काढले. या निवडणुकीतून अनेक तरुण नेतृत्वाच्या हातात लोकांनी सत्तेच्याचाव्या दिल्या आहेत. दरम्यान, मायणीत सत्तांतर झाले असून शिरवळमध्येसरपंच भाजपाचा परंतु, सत्ताराष्ट्रवादीची अशी विचित्र परिस्थितीनिर्माण झाली आहे.सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुलीतही सत्तांतर झाले असून, राष्ट्रवादीच्या शिवेंद्रसिंहराजे भोसले व शशिकांत शिंदे गटाने संतोष जाधव यांच्या भाजपा पॅनेलला चारी मुंड्या चित केले. सोनगाव अन् जकातवाडी उदयनराजे गटाकडे तर आसनगाव अन् .... सह बरीच गावे शिवेंद्रसिंहराजे गटाकडे गेली आहेत.कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी, काँगे्रसने आपले वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न केला असला तरी भाजपानेही जोरदार मुसंडी मारली आहे. खंडाळा तालुक्यातील असवलीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ यांच्या गटाला पराभवाचा जोरदार धक्का बसला. शिरवळमध्ये राष्ट्रवादीने जास्त जागा मिळवूनहीसरपंचपद गमावले. वाई तालुक्यात किकली, काळंगवाडी व गोवेदिगर ही गावे भाजपाकडे गेली असून, भुर्इंज, कवठे, पांडे काँग्रेसकडे, तर बोपर्डी राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिली.जावळीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सत्ताधारी गटाचे वर्चस्व कायम राहिले.भाजपाचा ५५ गावांत सत्ता आल्याचा दावासातारा जिल्ह्यातील ५५ गावांमध्ये भाजपची सत्ता आल्याचा दावा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. गेली अनेक दशके राष्ट्रवादी अन् काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असणाºया राजकीय बालेकिल्ल्याला भाजपाने हादरा दिला असून, मोदी अन् फडणवीस सरकारच्या सकारात्मक विकासाचाच हा परिपाक आहे, अशी प्रतिक्रिया पावसकर यांनी व्यक्त केली.वाईत धक्कादायक निकालवाई तालुक्यातील किकली, कवठे, पांडे, काळंगवाडी या ग्रामपंचायतीं-मध्ये वीस ते पंचवीस वर्षांची एकाधिकारशाही मोडीत निघत धक्कादायक निकाल हाती लागले.कोरेगावात भाजपाने उघडले खातेग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने अखेर कोरेगाव तालुक्यात खाते उघडले असून, सात ग्रामपंचायतींवर झेंडा फडकाविला आहे. जळगावमध्ये मात्र ‘गड आला पण सिंह गेला,’ अशी अवस्था भाजपाची झाली. राष्टÑवादी काँग्रेसने काँग्रेसच्या ताब्यातील अनेक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या असून, एकंबे व कुमठे ग्रामपंचायतीदेखील आता राष्टÑवादीकडे गेल्या आहेत.गिरवीत ‘काँग्रेस’ला धक्काफलटणमध्ये गिरवी ग्रामपंचायत काँगे्रसच्या ताब्यातून गेली. राजेगट व मित्रपक्ष मिळून १८, तर कॉँग्रेसने सहा ग्रामपंचायतींवर वर्चस्व सिद्ध केले. शिरवळ खंडाळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाºया शिरवळ व असवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी सत्ताधाºयांना नीरा नदीचा घाट दाखविला.